Saturday 24 August 2013

संजय दत्तची माहिती-तो दयेस पात्र आहे काय?



संजय दत्तची माहिती-तो दयेस पात्र आहे काय?
लेखक-संकलक: सुधीर काळे, जकार्ता        (sbkay@hotmail.com)
अगदी अलीकडेच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तच्या 'curative petition' वर [१] विचार करून संजय दत्तची याचिका फेटाळून लावली व या निर्णयाबरोबरच संजय दत्तकडील स्वत:ला कैदेपासून मुक्त करायचा शेवटचा न्यायालयीन मार्गही संपला! आता त्याची केस न्यायप्रविष्टही (sub judice) राहिलेली नाहीं. मग आता या केसची चर्चा करायचे कारणच काय?
माझ्या बाबतीत आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती व सध्याचे भारतीय वृत्तपत्र परिषदेचे (Press Council of India) अध्यक्ष श्री. काटजू यांनी संजयच्या वतीने केलेला दयेचा अर्ज (आणि त्याचाच एक भाग म्हणून संजय दत्त दयेस पात्र आहे काय? याबद्दलचे ओघानेच माझ्या मनात आलेले विचार) हेच माझे या प्रकरणाकडे लक्ष खेचण्याचे मुख्य कारण झाले आहे!
खरं तर संजय दत्त ही व्यक्ती माझ्या मतें दखल घेण्याइतकी मोठी किंवा महत्वाची कधीच नव्हती व आजही नाहींय्. जरी मी स्वत: त्याचे "रॉकी" पासून दोन्ही "मुन्नाभाई"पर्यंतचे बरेच चित्रपट पाहिले असले तरी प्रदीपकुमार-छाप ठोकळाचेहेर्‍याच्या संजयचे अभिनय"कौशल्य" मला तरी नेहमीच यथातथा, दुय्यम दर्जाचेच वाटत आलेले आहे. अगदी दोन्ही 'मुन्नाभाई' चित्रपटांचा आत्मा म्हणजे एका बाजूला त्या चित्रपटांची कथाकल्पना व दुसर्या बाजूला बोमन इराणी आणि अर्शद वारसी यांचा सुरेख अभिनय हेच आहेत. 'मुन्नाभाई'च्या दोन्ही चित्रपटांच्या यशाचे श्रेय बोमन इराणी आणि अर्शद वारसी यांच्या अभिनयाला न देता संजय दत्तला देणे हे 'पडोसन'च्या यशाचे श्रेय मेहमूद व किशोरकुमार या दोघांच्या अभिनयाला न देता सुनिल दत्तना देण्यासारखेच आहे. संजयचे वडील सुनिल दत्त यांचे अभिनयकौशल्य 'ठाकठीक' म्हणता येईल इतपतच होते. पण त्याच्या आईचे-नर्गिसचे-अभिनयकौशल्य मात्र अलौकिक दर्जाचे होते, पण संजय अभियाच्याबाबतीत आईच्या वळणावर न जाता कांहींसा वडिलांच्या वळणावरच गेलेला आहे असे मला त्या दोघांचा अभिनय पाहून वाटते. पण वडीलांचे सगळे गुणही त्याने उचललेले दिसत नाहींत. आपल्या "अजंता आर्टस्"च्या चमूसोबत नित्य नेमाने आघाडीवर जाऊन आपल्या बहादुर सैनिकांचे मनोरंजन करणार्‍या, देशाच्या ऐक्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संपूर्ण प्रवास चालत करणार्‍या त्याच्या वडिलांना, सुनिल दत्त यांना, मी एक सच्चा देशभक्त म्हणून खूप मानत आलेलो आहे. तो गुण संजयमध्ये उतरला आहे काय याचे उत्तर त्यानेच द्यायला हवे! सुरुवातीला सुनिल व नर्गिस यांच्या पोटी जन्मलेल्या संजय दत्तबद्दल एक प्रेमाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भावना माझ्याप्रमाणेच अनेकांच्या मनात असणार. तरुणपणी मादक द्रव्यांच्या सेवनाची घातक संवय त्याला लागल्याची वृत्ते जरी वृत्तपत्रांत वाचली असली तरी त्यामुळे संजयबद्दलचे माझे मत प्रतिकूल झाले नव्हते. उलट सुनिल व नर्गिसबद्दल अनुकंपा व कणवच वाटली होती. पुढे तो मादक द्रव्यांच्या विळख्यातून बाहेर पडल्याचे वृत्त वाचून खूप आनंदही झाला होता. पण त्याला जेंव्हां मुंबई बाँबहल्ल्यातला एक आरोपी म्हणून अटक झाली तेंव्हा या सार्‍या सद्भावना एका क्षणात खाक झाल्या व "सूर्यापोटी शनैश्वर" ही म्हणच मनात येऊन गेली. "आपले चुकले तरी कुठे" हा प्रश्न सुनिल-नर्गिसलाच्या मनातही घर करून बसला असेल काय?
पुढे जेंव्हां या खटल्याबद्दलच्या बातम्या वाचनात आल्या तेंव्हा संजयची गुन्हेगारी जगतातल्या देशद्रोही लोकांबरोबरची मैत्री आणि ऊठबस याबद्दलच्या बातम्यासुद्धा कानावर येऊ लागल्या व त्या ऐकून-वाचून खूपच दु:ख वाटले. मुंबईच्या गुन्हेगारी जगताबरोबरच्या त्याच्या जवळीकीची उदाहरणेही प्रसिद्ध झाली उदा. १९९३च्या मुंबई बाँबहल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम, त्या टोळीतील आणखी एक गुन्हेगार छोटा शकीलसारख्यांबरोबरच्या दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाच्या पोलिसांनी प्रकाशित केलेल्या ध्वनीफिती! त्या बाहेर आल्या, त्यातल्या कांहीं मी ऐकल्यासुद्धा (कांहीं "यू ट्यूब"वरून गायबही झाल्या असाव्यात), त्यातले संजयचे चाळे पाहून त्याच्याबद्दलचे मत पार पालटले आणि त्याच्याबद्दलची सहानुभूतीही पार नष्ट झाली. म्हणजे हा "एक वाईट मार्गाला लागलेला तरुण" आता "देशद्रोह्यांच्या संगतीत वावरू लागलेला तरुण" आहे उघड झाले व म्हणून तेंव्हांपासून मी त्याच्या चित्रपटांवर माझा वैयक्तिक "बहिष्कार"ही घातला [२], [३].
त्याची "टाडा" आरोपातून मुक्तता झाल्यानंतर माझे त्याच्यावरील खटल्याबद्दलचे उरले-सुरले लक्षही नाहींसे झाले. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यावर न्यायालयासमोर तरी सारे भारतीय समान असल्याचे दिसले व त्यामुळे मला बरेही वाटले आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दल असलेला माझा आदर आणि निष्ठाही वाढली.
हा लेख एक संकलन आहे. माहिती बर्‍याच दुव्यांवरून जमवली आहे. त्यातले खरे-खोटे मला नक्कीच माहिती नाहीं, पण ज्याअर्थी ही माहिती या दुव्यांवर बर्‍याच वर्षांपासून आहे, यातले बरेचसे दुवे न्या.मू. काटजू यांच्या ब्लॉगवर अनेकांनी केलेल्या टिप्पणीत उपलब्ध आहेत, काटजूंनीही त्यांच्याबद्दल कांहीं आक्षेप घेतलेला नाहीं, त्या दुव्यांमधील माहितीबद्दल कुणी आक्षेप घेतल्याचाही उल्लेख वाचनात आलेला नाहीं त्याअर्थी ती माहिती खरी असावी असे अनुमान काढून मी तिथली माहिती मी या संकलनात वापरली आहे.
हा लेख लिहिताना मला कुठे कोर्टाने पक्षपात केल्याचा उल्लेखही सापडला नाहीं पण संजयच्या पहिल्या चार्जशीटमध्ये त्याच्या अनीस इब्राहिमबरोबर झालेल्या संभाषणांचा उल्लेख नाहीं. आजतक या वाहिनीवरील मजकुरावरून "पिंजर्‍यातल्या पोपटा"ने पोलिसांबरोबर संगनमत केल्याचाही आरोप आहे. याबद्दल मुद्दा क्र. ४ खाली सविस्तर माहिती आहे.
या लेखात अनेक दुवे वापरल्यामुळे कांहीं ठिकाणी एकाद्या माहितीची द्विरुक्तीसुद्धा झाल्याचे माझ्या लक्षात आलेले आहे व अशी द्विरुक्ती कमीत कमी ठेवण्याचा मी प्रयत्नही केलेला आहे. पण प्रत्येक माहितीत सगळी माहिती तंतोतंत सारखी नसल्यामु ळे व त्यावरचे अवधारणही (emphasis) सारखे नसल्यामुळे कधी-कधी माझा नाइलाजही झालेला आहे! आता तपशीलवार या केसकडे पाहू या.
१. संजयच्या घरात पोचविली गेलेली शस्त्रास्त्रें भारतात कशी व कुठून आली?
http://www.indiatimes.com/news/india/how-did-sanjay-dutt-become-involved-in-the-1993-mumbai-blasts-67595.html ("टाइम्स"च्या २१ मार्च २०१३ ) आणि http://www.indianexpress.com/news/sanjay-dutt-did-more-than-just-keep-a-gun-for-selfprotection-in-1993/1092232/ ('इंडियन एक्सप्रेस' २९ मार्च २०१३)
"टाइम्स"च्या २१ मार्च २०१३ रोजी आलेल्या "संजय दत्त १९९३च्या मुंबई बाँबहल्यात कसा गुंतला" या शीर्षकाखाली दिलेल्या बातमीत  आणि २९ मार्च २०१३ रोजी 'इंडियन एक्सप्रेस'ने "संजयने ही हत्यारे आपल्या घरी फक्त ठेवण्यापेक्षा बरेच कांहीं जास्त केले आहे" या शीर्षकाखाली दिलेल्या बातमीत खूपच विस्ताराने माहिती दिली आहे ती अशी:
१९९३ सालच्या मुंबई बाँबहल्याच्या दाऊदसारख्या प्रमुख सूत्रधारांच्या यादीत दोन मुख्य मुद्दे होते: (१) मुंबईत एका पाठोपाठ एक असे अनेक बाँबस्फोट घडवून आणणे आणि (२) या बाँबहल्यांपाठोपाठ भडकू शकणार्‍या जातीय दंगलींत आपल्या समाजाविरुद्ध होणार्‍या हल्ल्यांना तोंड देता यावे म्हणून आपल्या (मुस्लिम) समाजाला  शस्त्रास्त्रें पुरविणे.
यासाठी असॉल्ट रायफली, पिस्तुलें आणि हातगोळे (hand grenades) अशा शस्त्रास्त्रांचा साठा पाकिस्तानातून आणण्यात आला होता व अनेक भारतीय तरुणांना पाकिस्तानात पाठवून त्यांना ही शस्त्रास्त्रें वापरण्याबद्दलचे प्रशिक्षणही देण्यात आले होते याची आठवण वीस वर्षांपूर्वी या मुंबई  बाँबहल्ल्याबाबत चौकशी करणार्या पोलीस अधिकार्यांना आजही आहे असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐकल्यानंतर सांगितले.
ही शस्त्रास्त्रें रायगड जिल्ह्यातील दोन ठिकाणी तर गुजरातमधल्या एका ठिकाणी उतरविण्यात आली.  गुजरातमध्ये उतरविण्यात आलेली शस्त्रास्त्रें एका मोटारगाडीतल्या पोकळीत दडविण्यात आली व ती अबू सालेमने स्वत: गाडी चालवत रस्त्याने मुंबईला आणली. हाच अबू सालेम पुढे गुन्हेगारांच्या टोळक्याचा एक कुख्यात प्रमुख बनला.
वितळजोड केलेल्या (welding) पोकळ जागेतून ही शस्त्रास्त्रें बाहेर काढण्यासाठी सालेम व त्याच्या गुन्हेगारीत सामील असणार्‍या साथीदारांना एका निवांत जागेची गरज होती. त्यासाठी 'मॅग्नम प्रॉडक्शन्स'चे मालक असलेल्या हनीफ कडावाला व समीर हिंगोरा यांच्या लिंकिंग रोडवरील ऑफीसची जागा निवडण्यात आली. अनीस इब्राहिमने हिंगोरा व कडावाला यांना फोन करून सालेमला आपली जागा वापरण्याबद्दल सूचनाही दिल्या.
पण हिंगोरा-कडावाला यांचा त्यांच्या ऑफीसच्या जागेच्या मालकाशी कांहीं तंटा चालू होता व त्यामुळे त्याचे लक्ष वेधले जाईल अशी कुठलीही गोष्ट करण्याचा धोका त्यांना टाळायचा होता. म्हणून त्यांनी हे काम करण्यासाठी संजय दत्त याचे घर सुचविले.
त्यानुसार संजयला फोनवर विचारण्यात आले व त्याने या कामासाठी आपल्या गॅरेजच्या वापरासाठी संमती दिली. संजयच्या घरावरचे पहारेकरी आपल्याला आत जाऊ देणार नाहींत अशी सालेमला भीती होती म्हणून हिंगोरा सालेमबरोबर संजयच्या गॅरेजमध्ये त्याची गाडी घेऊन गेला.
१९९२-९३च्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई पोलीसां'नी सुनिल व संजय दत्त यांच्या घरावर सुरक्षिततेसाठी पहारेकरी पुरविले होते व हे गॅरेज या पहारेकर्‍यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होते. म्हणुन संजयने त्या पहारेकर्‍यांना दुसर्‍या गेटवर धाडले व मगच त्या मोटारगाडीच्या पोकळीतील शस्त्रास्त्रें काढली गेली. संजयने त्यासाठी अवजारे पुरविली व शस्त्रास्त्रें ठेवण्यासाठी कांहीं डफेल बॅग्जही पुरविल्या. त्यातली ३ एके-५६ रायफली, ९ काडतुसांच्या पट्ट्या (magazines), ४५० काडतुसांच्या क्लिप्स, एक ९ मिमिचे पिस्तुल व कांहीं हातगोळे अशी शस्त्रास्त्रें संजयने घरी ठेऊन घेतली. बाकीची शस्त्रास्त्रें अबू सालेम घेऊन गेला. पण नंतर संजयला हातगोळे ठेवणे असुरक्षित वाटू लागले म्हणून सालेमचा साथीदार-मन्सूर अहमद-त्याच्या घरी गेला व त्याने हातगोळे संजयच्या घरातून बाहेर काढली.
पुढे हिंगोरा आणि कडावाला या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांना संजयच्या सहभागाबद्दल कळले. तो त्यावेळी मॉरीशसला शूटिंग करत होता म्हणून तो परत येईपर्यंत पोलिसांनी गप्प रहायचा बेत आखला. पण एका वृत्तपत्राने याबद्दल वृत्त छापले. ते संजयला मॉरीशसला समजल्यावर त्याची गाळण उडाली. मग त्याने दाऊद टोळक्यातल्या युसुफ नळवालाला फोन केला व त्या शस्त्रास्त्रांची विल्हेवाट लावायला सांगितले.
युसुफने एके-५६ रायफली मरीन लाइन्स येथील एका फाउंड्रीत नेऊन तिथे त्यांना नष्ट करायचा प्रयत्न केला, पण एके-५६ची नळी कांहीं नष्ट होईना. मग त्याने ती आपल्या घरी नेली. पोलिसांनी नळवालाला अटक केल्यावर त्यांना ती नळी तिथे सापडली.
संजयने पुढे त्याने एके-५६ स्वसंरक्षणासाठी ठेऊन घेतली होती असे स्पष्टीकरण दिले. पण पोलिसांनी त्याच्या या स्पष्टीकरणाची टर उडवली. "जर संजयने अनीसकडून बेकायदेशीरपणे ९ मि.मि.ची पिस्तुले स्वसंरक्षणासाठी मागविली असती तर ते समजण्यासारखे होते, पण पोलिसांकडे संजय आणि अनीस यांच्यामधील फोनवरील संभाषणांबाबत पुरावा आहे. त्या संभाषणात [] संजयने अनीसकडे ग्रेनेड नेण्याबद्दल सांगितले होते व हा पुरावा पोलिसांनी कोर्टात सादरही केलेला आहे."
संजयविरुद्ध केवळ अवैधपणे शस्त्रे बाळगल्याबद्दल केस आहे असे सार्या जगाला जरी वाटत असले तरी त्याच्यावर संपूर्ण गुन्ह्याला मदत केल्याबद्दल व त्या गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याबद्दलही आरोप केले गेले होते व त्या आरोपांना सिद्ध करण्यासाठीचा पुरावाही त्यांच्याकडे होता[].
पण तरीही 'टाडा' कोर्टाने संजयला आतंकवादाला मदत व प्रोत्साहन दिल्याबद्दलच्या आरोपातून निर्दोष सोडले व हा खालच्या कोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला.
२. संजय मुंबई बाँबहल्ल्यात कसा गुंतला?
याची माहिती "टाइम्स"च्या २१ मार्च २०१३ रोजी आलेली आहे. (http://www.indiatimes.com/news/india/how-did-sanjay-dutt-become-involved-in-the-1993-mumbai-blasts-67595.html)
अनेक वर्षें रखडलेल्या त्याच्या खटल्याचा निकाल शेवटी लागला व त्यात सर्वोच्च न्यायालयाने संजयच्या शिक्षेवर एक वर्ष शिक्षा कमी करत शिक्कामोर्तब केले. आता त्याला आधीची १८ महिन्यांची कैद वजा जाता साडेतीन वर्षें कारावासात काढायची आहे. या निकालाविरुद्ध जनतेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. फिल्मी जगतातील ज्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या सर्वांनी संजयला पाठिंबा दिला. (सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत असे नाहीं.) काँग्रेस पक्षाच्या बर्‍याच नेत्यांनीही संजयबद्दल सहानुभूती दर्शवली असेच म्हणावे लागेल. या विरुद्ध भाजपासारख्या पक्षांनी त्या शिक्षेला समर्थन दर्शविले.
डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत व भारतात इतरत्र जातीय दंगली सुरू झाल्या. मुंबईत डिसेंबर ९२ ते जानेवारी ९३ च्या दरम्यान दंगलींचा आगडोंब उसळला. हिंदू-मुस्लिम जनता एकमेकाच्या नरडीचा घोट घ्यायला उभी ठाकली त्यात ५७५ मुस्लिम तर २७५ हिंदू लोकांचा बळी पडला. त्यानंतर मार्च ९३ मध्ये मुंबईमध्ये बाँबहल्ल्यांची एक मालिकाच घडवून आणली गेली व ती घडवून आणल्याचा आरोप गुन्हेगारी जगतातला म्होरक्या असलेल्या दाऊद इब्राहिमवर ठेवण्यात आला. या बाँबहल्ल्यांच्या मालिकेत अडीचशेहून जास्त लोक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले!
त्यानेच घडवून आणलेल्या मुंबईतल्या बाँबहल्ल्यांनंतर मुस्लिमांवर पुन्हा हल्ले होतील अशी भीती दाऊदला कशी वाटत होती, त्यासाठी आपल्या जमातीच्या रक्षणासाठी मुस्लिमांना हत्यारे देऊन कसे सज्ज करायचे होते, ही हत्यारे भारतात बेकायदेशीररीत्या कशी आली व ती आपल्या टोळीतील सदस्यांत कशी वाटली गेली, त्यातली कांहीं हत्यारें दाऊदच्या सहकार्‍यांनी संजय दत्तकडे कशी पाठविली आणि ती त्याच्या घरात कशी ठेवण्यात आली हा वृत्तांत वर मुद्दा क्र. १ खाली आलाच आहे.
ही हत्यारें आपल्याला दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमकडून मिळल्याचे संजयनेच संगितले. संजय आणि अनीसमधल्या दूरध्वनीद्वारा झालेल्या संभाषणाच्या पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार संजय सातत्याने अनीसच्या संपर्कात होता असा पोलिसांचा दावा आहे. या दूरध्वनी क्रमांकांमध्ये संजयने आपल्या घरातून अनीस-दाऊदच्या दुबईमधील "व्हाईट हाऊस" या घराच्या क्रमांकांचाही समावेश आहे.
अबू सालेम, बाबा मुसा चौहान आणि समीर हिंगोरा यांनी ही शस्त्रें संजय दत्तच्या घरी १६ जानेवारी १९९३ रोजी पोचती केली. या लोकांच्या जबानीनुसार ते जेंव्हां संजय दत्तच्या घरी पोचले तेंव्हां तो अनीसबरोबर फोनवर बोलत होता व शस्त्रांची उत्सुकतेने वाट पहात होता.
आपल्यावर पोलिसांचा संशय आहे असे कळल्यावर संजयने मॉरीशसवरून युसुफ नळवाला या सदस्याला कसा फोन केला व एक एके-५६ रायफल व कांही दारूगोळा व्यतिरिक्त बाकीची हत्यारें नेऊन नष्ट करायला कसे सांगितले हेही आधी आलेच आहे. 
मॉरिशसमधील शूटिंग संपवून तो परतला त्यावेळी त्याच्या १९ एप्रिल १९९३ रोजीच्या आगमनाची बातमी स्वत: सुनिल दत्तने पोलिसांना दिली. मॉरीशसहून रात्री परतल्यावर संजयला विमानतळावरच अटक करण्यात आली व त्याने ती रात्र एका पोलिस अधिकार्‍याच्या खोलीतील सोफ्यावर झोपून काढली. दुसरे दिवशी पोलिस सहआयुक्त (Joint commissioner of police) एम्. एन्. सिंग व त्यांचे उपायुक्त राकेश मारिया यांनी केलेल्या चौकशीत संजयचा धीर पार खचून गेला व त्याने सारी कहाणी झाली होती तशी सांगून टाकली व आपल्या सार्‍या चुका कबूल केल्या. मुंबई बाँबहल्ल्यात आपला मुलगा सहभागी आहे यावर सुनिल दत्तचा विश्वासच बसत नव्हता पण त्या दिवशी संध्याकाळी संजयने आपण असे केल्याचे आपल्या वडिलांना मारिया यांच्या समक्ष सांगितले. सुनिल दत्त यांनी त्याने असे करण्याचे कारण विचारले असता संजय म्हणाला "माझ्या धमन्यात मुस्लिम रक्त वहात आहे व शहरात जे चालले होते ते मला सहन होत नव्हते"! व मग त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली. संजयने मात्र आपल्याला बाँबहल्ल्यांबद्दल कांहींच माहिती नसून ती हत्यारे आपण आधीच्या जातीय दंगलींदरम्यान त्याला आलेल्या धमक्यांमुळे आपल्या कुटुंबियांच्या रक्षणासाठी मागविली होती असे सांगितले.
आपल्या घरी मागविलेली ही शस्त्रे गुपचुपपणे काढण्याची त्याला काय गरज होती? स्वसंरक्षणासाठी मागविलेली शस्त्रे उघडपणे न आणता लपवून का आणली गेली? त्याच्या अनीस इब्राहिमशी फोनवरून झालेले संभाषणांच्या नोंदी पोलिसांकडे आहेत व अशी संभाषणे झाल्याचे संजयने स्वत:ही कबूल केलेले आहे त्याचे काय? अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळायला हवीत.
आधी सांगितल्याप्रमाणे या खटल्याकडे माझे लक्ष खेचण्याचे "श्रेय" न्या.मू. मार्कंडेय काटजूंनाच द्यायला हवे. संजयच्या देशभक्तीबाबत मनात शंकेची पाल चुकचुकत असतानासुद्धा अशा व्यक्तीच्या शिक्षेविरुद्ध त्यांनी जेंव्हां दयेचा अर्ज केला तेंव्हा मला धक्काच बसला. पुढे त्यांनी या माफीच्या समर्थनार्थ जी कारणे दिली ती वाचून तर मी थक्क झालो व तेंव्हापासून या खटल्याची माहिती जमवायला लागलो. यात मला "गुगळेसाहेबां"ची (याने कि Google”ची) खूपच मदत झाली.
३. न्या. मू. काटजू यांनी संजयच्या माफीसाठी काय कारणे दिली आहेत?
a)    सर्वोच्च न्यायालयाने  संजयला परवान्याशिवाय निषिद्ध स्वयंचलित जातीची हत्यारे बाळगल्याबद्दल दोषी ठरवून शस्त्रास्त्रांबद्दलच्या २५ (१(अ) कलमानुसार कमीत कमी शिक्षा दिलेली आहे. पण न्यायालयाकडे १९५८च्या गुन्हेगाराच्या परिवीक्षेबद्दलच्या (probation) कायद्याच्या कलम ४ नुसार या परिस्थितीत कर्जरोखा घेऊन त्याला मुक्त करायचा अधिकार न्यायालयाला आहे.
b)    आपल्या राज्यघटनेच्या १६१व्या कलमानुसार राज्यपाल किंवा राष्ट्राध्यक्ष यांना न्यायालयाने दिलेली शिक्षेला पूर्णपणे माफ करण्याचा किंवा न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार आहे तो न्यायालयाच्या अधिकारापेक्षा वेगळा आहे. या आधी खुनाबद्दल अपराधी समजल्या गेलेल्या व जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कमांडर नानावटी यांना अशी क्षमा दिल्याचे उदाहरण आहे.
c)    संजय दत्तच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला १९९३ सालच्या मुंबई बाँबहल्ल्याबद्दल दोषी मानलेले नाहीं तर फक्त परवाना नसताना अवैध शस्त्रास्त्रें स्वत:जवळ बाळगल्याबद्दल दोषी मानले आहे. हा गुन्हा खुनासारख्या गुन्ह्याच्या तूलनेत खूपच किरकोळ गुन्हा आहे. म्हणून जर खुनाबद्दल शिक्षा झालेल्या नानावटींना क्षमा दिली गेली तर राज्यपाल संजय दत्तला नक्कीच क्षमा प्रदान करू शकतात. त्याच्या ताब्यात नक्कीच अवैध हत्यारे सापडली पण खालील कारणांमुळे त्यातील गांभिर्य कमी मानले जाऊ शकते:
o   ही घटना २० वर्षांपूर्वी घडलेली आहे व या काळात संजयने आधीच खूप भोगले आहे. कायम संशयाच्या छायेखाली वावरणार्‍या संजयला सातत्याने कोर्टात खेटे घालणे, परदेशी जायच्या आधी न्यायालयाची परवानगी मागणे, बॅन्कांकडून कर्ज न मिळणे यासारख्या अनेक तर्‍हेच्या छळवणुकीमुळे झालेल्या यातना व त्यापोटी झालेली अवहेलना व उपमर्द भोगावे लागले आहेत.
o   संजयने आधीच १८ महिने कारावास भोगला आहे.
o   आता त्याचा विवाह झालेला असून त्याला दोन लहान मुले आहेत.
o   त्याला दहशतवादी मानण्यात आलेले नाहीं व मुंबई बाँबहल्ल्यात त्याचा कांहींही सहभाग नव्हता हेही कोर्टाने मान्य केले आहे.
o   त्याच्या आई-वडीलांनी आपल्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या भल्यासाठी काम केलेले आहे, कित्येक वेळी आघाडीवरच्या आपल्या बहादुर जवानांना नैतिक आधार देण्यासाठी आघाडीवर जाण्याचे व इतरही असेच सामाजिका कार्य त्या दोघांनी केलेले आहे.
o   संजयने या २० वर्षांत आपल्या चित्रपटांमधून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतीला आणि त्यांच्या संदेशांना पुन्हा जागृत केलेले आहे.
o    या परिस्थितीत त्यांनी राज्यपालांना संजयला क्षमा करण्याबद्दल सविनय विनंती केलेली आहे.
o    ही कारणांची यादी वाचल्यानंतर संजयला दयापात्र ठरविण्यासारखे कुठलेच कारण मला तरी दिसले नाहीं!
४. संजयचे कैवारी कुठल्या मुद्द्यावर त्याला शिक्षा होऊ नये अशी मागणी करत आहेत?
He has got off quite lightly या शीर्षकाखाली दिलेली खालील दुव्यावरची माहिती वाचनीय आहे. http://www.hindustantimes.com/StoryPage/Print/1030638.aspx
"बिचार्‍या संजयने चूक केली पण तो निरपराधी आहे, चांगल्या घरचा आहे, बिचार्‍याने आधीच २० वर्षे खूप सोसले आहे. झालं-गेलं विसरून जावं कारण स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी प्राणघातक हल्ला करू शकणार्‍या रायफली (assault rifles) घरी ठेवल्या एवढीच चूक त्याने केलेली आहे. आता लग्न करून बिचारा कुटुंबवत्सल झालेला आहे, दोन छोटी मुले त्याला आहेत" वगैरे, वगैरे.
पण सत्य परिस्थिती काय आहे? संजय मुंबई बाँबहल्ल्याचे मुख्य सूत्रधार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या भावाच्या-अनीस इब्राहिमच्या-संपर्कात होता, परवान्यानुसार बाळगलेली तीन शस्त्रे स्वत:जवळ असूनही त्याने "स्वसंरक्षणार्थ" आणखी एके-५६ सारखी आक्रमक आणि दुसर्‍यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठीच प्रामुख्याने वापरली जाणारी प्राणघातक शस्त्रे कशाला मिळविली? मुंबई बाँबहल्ल्याची चौकशी करणारे संयुक्त पो. कमिशनर एम्. एन्. सिंग म्हणतात, "संजयचे स्पष्टीकरण पार पोकळ आहे. कारण स्वसंरक्षणासाठी सरकारी यंत्रणेकडे न जाता कुणी गुन्हेगारांकडे पळत नाहीं." एका खासदाराच्या मुलाने सरकारची मदत मागायला हवी होती कारण ती त्याला सहज मिळाली असती. तसेच त्याला स्वसंरक्षणासाठी हॅन्डग्रेनेड्स मिळवायची/ठेवायची काय गरज होती?
अशी लपवून कां आणली गेली? पहारेकर्‍याला दूर कां हटविले, वगैरेसारख्या प्रश्नांना काय उत्तर आहे? ही शस्त्रास्त्रें त्याच्याकडे आली तेंव्हां अनीसबरोबर फोनवर बोलला होता हे सिद्ध करणारी नोंद पोलिसांकडे आहे व हे स्वत: संजयने मान्यही केलेले आहे.
खरे तर ही हत्यारें व दारूगोळा भारतात आल्यावर त्या पकडल्या जाईपर्यंत ज्यांनी-ज्यांनी त्या प्रकरणात भाग घेतला ती एक लांबलचक शृंखलाच होती. या शृंखलेत अबू सालेम, समीर हिंगोरा, हनीफ कडावाला, युसुफ नळवाला यांच्यासारखे लोक खूपच वरच्या पातळीवर गुंतले होते तर झेबुन्निसा किंवा मन्सूर अहमद यांचा सहभाग खालच्या पातळीवरचा होता. त्यांच्या तूलनेत संजयचा सहभाग मध्यम पातळीवरचा होता असे म्हणायला हरकत नाहीं कारण हत्यारे मिळविण्यासाठी अनीस इब्राहिमसारख्यांशीच्या थेट संबंधांत तो गुंतला होता असे त्याच्याच चौकशीत त्याने कबूल केले आहे. CBI ने त्यांच्या या सहभागाबद्दलची माहिती त्याच्या विरुद्धच्या आरोपपत्रात घातलीच नाहीं त्यामुळे CBI व म्ंबई पोलिसांनी या प्रकरणातून त्याला सोडविण्यासाठी संगनमत केले असा आरोप टेहेलका या वृत्तसंस्थेने केला. त्याची माहिती "आजतक"च्या "हेडलाइन्स टुडे" या कार्यक्रमात प्रथम दाखविण्यात आली. http://www.youtube.com/watch?v=juwhFgGhMfA या दुव्यावर तो कार्यक्रम वाचकांना पहाता येईल. कारणे कांहींही असोत, पण संजयला सोडून बाकी सर्वांना टाडाच्या कडक कलमांखाली शिक्षा झाली पण संजय एकटाच टाडाच्या कलमातून सुटला. याचे सर्वात जास्त आश्चर्य संजय दत्तच्या वकीलांनाच झाले असावे कारण हरिंदर बावेजा या स्त्रीवार्ताहारबाईंनी आपण झेबुन्निसाची मुलगी आहोत असे खोटेच सांगून जेंव्हां मानेशिंदेंना आपल्या आईचे वकीलपत्र घेण्याची विनंती केली तेंव्हांचे संभाषण छुप्या कॅमेर्‍यावर टेप करण्यात आले. त्यावेळी श्री. मानेशिंदेच म्हणाले कीं "मला जर सर्वोच्च न्यायालयाने विचारले कीं बाकी सार्‍यांना जर टाडाखाली शिक्षा झाली तर संजयला कां नाहीं झाली तर मला त्याचे उत्तर देताच येणार नाहीं." पुढे मानेशिंदे यांनी झेबुन्निसाच्या "मुली"चे वकीलपत्र घेण्यास "परस्परविरोधी हिसंबंधां"चे कारण देऊन नकार दिला असला तरी या चोरून केलेल्या ध्वनी-चित्रफितीमुळे ही बाब उघडकीस आलीच! (http://tehelka.com/how-the-star-escaped-tada/)
थोडक्यात संजय हा खूप सुदैवी आहे कारण त्याच्यावर एक अतिरेकी म्हणून शिक्का बसला नाहीं किंवा त्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा झाली नाहीं. याबद्दल देवाचे आभार मानून त्याने तीन वर्षांची शिक्षा भोगावी व बाहेर यावे हेच त्याच्या हिताचे आहे!
माझ्यापुरते बोलायचे तर संजयला 'स्वसंरक्षणा'साठी हवी असलेली ही महासंहारक हत्यारें एकाद्या शस्त्रास्त्रे बनविणार्‍या कंपनीकडे 'ऑर्डर' देऊन विकत घेता आली असती. खासदाराच्या मुलाला ती मिळविण्यासाठी मुंबई बाँबहल्ल्यात गुंतलेल्या गुन्हेगारी व देशद्रोही टोळक्याकडून मिळविण्याची गरज नव्हती. पक्के देशभक्त असलेल्या सुनिल दत्त यांच्या मुलाने असे करावे हे चारचौघांसारख्या व्यक्तीच्या बुद्धीला किंवा मनालासुद्धा पटण्यासारखे नाहीं, मग आज Press Council of India चे अध्यक्ष असलेल्या व आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असलेल्या काटजू यांनी ज्या व्यक्तीची देशभक्ती संशयातीत नाहीं अशा व्यक्तीच्या शिक्षेबाबत असा नरम दृष्टिकोन कां ठेवावा याचे कुणालाही आश्चर्यच वाटेल.
एके काळी "माझ्या धमन्यात मुस्लिम रक्त वहात आहे व शहरात जे चालले होते ते मला सहन होत नव्हते" असे श्री एम्. एन्. सिंग यांना सांगणारा संजय हल्ली मात्र कपाळावर कुंकवाचे उभे गंध  लावून चालत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतो यावरून संजय पुन्हा हिंदू झाला आहे कीं काय अशी शंका कुणालाही यावी. पण आपला कायदा धर्म, लिंग, राजकीय पक्ष यासारख्या गोष्टींवर आधारून आपले निर्णय देत नाहीं असे असताना संजय हे सारे कशासाठी करत आहे या प्रश्नाचे उत्तर त्यालाच द्यायला हवे.
त्यानंतर संजयने त्याला उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर उपाय वापरले, सर्व न्यायालयांत-अगदी उच्च व सर्वोच्च न्यायालयांपर्यंत-त्याने याचिका दाखल केल्या, त्या सगळ्या फेटाळल्या गेल्यावर शेवटी त्याने सर्वोच्च न्यायालयात आधी review petition व त्यानंतर curative petition अशा याचिकासुद्धा दाखल केल्या होत्या पण त्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.
संजयने इतक्या वेळी इतक्या न्यायालयात अपीले केली पण संजयला टाडा कलमातून निर्दोषी सोडून दिलेल्या निर्णयाविरुद्ध सरकारने वा सरकारी वकीलांनी वरच्या न्यायालयात अर्ज कां केला नाहीं हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
या पार्श्वभूमीवर न्या.मू. काटजूंनी त्याच्यावतीने राज्यपालांकडे, राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज करावा याचे कुणालाही आश्चर्य वाटेल. त्यात या केसबद्दल जास्त-जास्त माहिती उपलब्ध झाल्यावरसुद्धा आपण केलेला दयेचा अर्ज त्यांनी मागे घेऊ नये याचे तर महदाश्चर्यच वाटले.
या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर आता संजयची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द संपली कीं तो बाहेर पडल्यावर पुन्हा उभी राहील हे काळच ठरवेल.
या लेखाच्या शेवटी 'इंडियन एक्सप्रेस'च्या शेखर गुप्तांनी त्यांच्या मुशर्रफच्या पुनरागमनाबद्दलच्या एका लेखात काटजूंना मारलेल्या कोपरखळीचा उल्लेख करावा असे वाटते. ते म्हणतात कीं मुशर्रफने उगाच कैदेला घाबरू नये कारण न्या.मू. काटजू त्यांच्या माफीसाठीही अर्ज करतील व त्यांना सोडविण्याचा यत्न करतीलच!
(Shekhar Gupta of Indian Express ended his article "National Interest: General Musharraf (deluded) with "The week's favourite internet/ SMS joke is that he need not worry. Justice Markandey Katju will soon appeal, seeking mercy for him. Chances are, even the good judge may not forgive him: at least for his stupidities, delusions and lack of intellect, if not for his sins of commission. - See more at:
http://www.indianexpress.com/news/national-interest-general-musharraf-(deluded)/1105109/0#sthash.CiOOGthA.dpuf)

हा लेख लिहिताना वापरलेले दुवे

न्या.मू. मार्कंडेय काटजू यांच्या ब्लॉगमधील दुवे
http://www.time.com/time/magazine/article/0,9171,361780,00.html
http://www.youtube.com/watch?v=F1I2tfIiSPA. (The Newshour Debate on Times Now: Does Sanjay Dutt deserve sympathy?)
http://tehelka.com/how-the-star-escaped-tada/
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=juwhFgGhMfA#! (Jujhar Singh)
http://simplykalam-kalam.blogspot.in/2013/03/the-strange-reasoning-of-mr-katju.html
http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Jethmalani-raps-Katju-says-Maharashtra-governor-lacks-power-to-pardon-Sanjay-Dutt/Article1-1031157.aspx
http://www.indianexpress.com/news/sanjay-dutt-did-more-than-just-keep-a-gun-for-selfprotection-in-1993/1092232/
http://www.ndtv.com/article/india/1993-bombay-blasts-same-crime-different-punishment-346294
http://www.indianexpress.com/news/sanjay-dutt-did-more-than-just-keep-a-gun-for-selfprotection-in-1993/1092232/3
http://ravijournal.wordpress.com/2013/03/26/an-open-letter-to-mr-markandey-katju/
http://tehelka.com/how-the-star-escaped-tada/ ('टेहेलका'वरचा एक लेख)
http://www.indianexpress.com/news/national-interest-general-musharraf-(deluded)/1105109/0#sthash.CiOOGthA.dpuf
इतर ठिकाणाहून वापरलेले दुवे
http://www.tehelka.com/if-tada-wasnt-applied-on-sanjay-it-should-not-apply-to-others-in-the-weapons-chain/#gsc.tab=0
http://archive.tehelka.com/story_main28.asp?filename=Ne240307Sanjay_dutt_CS.asp
http://www.hindustantimes.com/News-Feed/LetterToEditor/Vox-pop/Article1-1032718.aspx
http://www.hindustantimes.com/StoryPage/Print/1030638.aspx
https://www.google.com/search?q=Sanjay+Dutt%27s+20-year+old+story&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a#bav=on.2,or.r_qf.&cad=b&ei=vT3ZUarbCoPmrAeC1YHwBg&fp=1&q=Sanjay+Dutt%27s+20-year+old+story&rls=org.mozilla:en-US:official&sa=N&sei=7mniUfScBoSNrQeT-oCoDw&start=10 (Google search)
----------------------------------------------------
टिपा:
[१] Curative Petition (अन्यायनिवारक याचिका) म्हणजे शिक्षा झालेल्या व्यक्तीवर जर न्यायालयातर्फे न्याय देण्यात घोडचूक झाली असेल व त्यामुळे त्या व्यक्तीवर घोर अन्याय झाला असेल तर सर्वोच्च न्यायालयाकडे अन्यायनिवारक याचिका दाखल करता येते व त्यासाठी शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या वकीलाने तसा अर्ज करायचा असतो व त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे तीन सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश व खटल्याचे पुनर्विलोकन करणारे न्यायमूर्ती त्या प्रकरणाचा पुन्हा एकदा आभ्यास करतात असते व निर्णय देतात! संजयच्या बाबतीत हा निर्णयही त्याच्या विरुद्ध गेला.
[२] आजही माझा सलमान खानच्या चित्रपटांवर वैयक्तिक बहिष्कार आहे व त्याचे कुठलेही चित्रपट मी तिकिटाचे पैसे देऊन पहात नाहीं!
[३] मी त्याचे दोन्ही "मुन्नाभाई" त्यानंतरच पाहिले होते. पण हा लेख लिहितांना माझ्या लक्षात आले कीं त्याच्या "टाडा"खालील सुटकेत कांहीं गोच्याआहेत ज्या या लेखात पुढे आलेल्या आहेतच.  तेंव्हां आता हा बहिष्कार मला पुन्हा घालावा लागणार आहे.
[४], [५] असा पुरावा जर आहे तर खालील दुव्यावर हा पुरावा सादर न केल्यामुळे संजय 'टाडा'च्या आरोपांमधून सुटल्याचा आणि पोलीस व सीबीआय्'ने संगनमत करून त्याला सोडविल्याचा आरोप कशासाठी? शिवाय खालच्या कोर्टाने त्याच्या टाडा'आरोपांमधून मुक्तता केल्याविरुद्ध सरकारी वकीलांकडून अथवा सरकारकडून याविरुद्ध वरच्या कोर्टात अपील करून पुन्हा हा विषय धसास का लावला नाही याचेही उत्तर मिळत नाहीं. पहा 'आज तक' च्या 'हेडलाइन्स टुडे' या कार्यक्रमातील ही चित्रफीत

इतर कांहीं नोंदी:
संजय आणि छोटा शकील यांच्यादरम्यानच्या दूरध्वनी संभाषणाच्या चित्रफिती इथे पहाता येतील. या चित्रफिती पोलिसांनीच उघड केलेल्या आहेत:
https://www.youtube.com/watch?v=nZgT7kwWOPY
https://www.youtube.com/watch?v=daSYs3HA6uk
इथे संजय चक्क फिल्मी जगतातील बारीक-सारीक तक्रारी छोटा शकीलला ऐकवून "बघा या गोष्टी कशा होताहेत, त्या नाहीं व्हायला पाहिजेत" अशा अर्थाच्या तक्रारी सुनावतो आहे व त्या सोडविण्यासाठी त्याची मदत मागतोय्. म्हणजे बॉलीवूडचे "साम्राज्य" जणू हे सारे "सम्राट" दुबईहून चालवताहेत. हे सारे ऐकल्यावर कुणीही थक्क होईल! संजय शकीलबरोबर "जी-जी" करत किती आदबीने आणि कांहींसा घाबरून बोलत असल्याचेही चांगलेच जाणवते.
संजयच्या आयुष्यावरील कांहींशा प्रचारकी थाटात बनविल्या गेलेल्या या दोन चित्रफितीही (ये है मेरी कहानी भाग-१ व २) पहाण्यासारख्या आहेत:
https://www.youtube.com/watch?v=tIA8-CJcf_M
https://www.youtube.com/watch?v=UocgofetnNc


प्रतिक्रिया
किशोर - पुणे - शनिवार, 14 डिसेंबर 2013 - 03:52 PM IST
ह्याला जर माफ केले तर इतर देशद्रोही माजतील. म्हणून ह्याला फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही.
सुधीर काळे, जकार्ता - शनिवार, 30 नोव्हेंबर 2013 - 04:06 PM IST
माझ्या वृत्तपत्रव्यवसायातील ओळखीच्या मित्रांना विचारून थकलो व शेवटी मला हवी ती बातमी गूगलतर्फे मिळाली. आमचे थोर अभिनेते अनेक फुसकी कारणे संपवून परत येरवड्याला गेले! जय हो! http://zeenews.india.com/entertainment/celebrity/after-four-weeks-parole-sanjay-dutt-returns-to-jail_145587.html पण एकंदर मीडियाची "Couldn't care less" अशी जी वृत्ती मला दिसली ती मात्र चटका लावून गेली! शी:!
सुधीर काळे, जकार्ता -3 नोव्हेंबर 2013
संजय दत्तची मुदतवाढ झालेली पॅरोलची 'सुट्टी' संपली कीं नाहीं? तो वेळेवर तुरुंगात परत आला कीं नाहीं इकडे मीडियाने डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवे. नाहीं तर कुणाचं लक्ष नाहीं असं लक्षात आल्यास घरीच मजा मारत बसेल!
सुधीर काळे, जकार्ता -28 ऑक्टोबर 2013
दोन-तीन दिवसांपूर्वीच वाचलं कीं आपल्या गृहमंत्रीमहोदयांनी महाराष्ट्र सरकारकडे संजयच्या शिक्षेत कपात करण्याबाबत विचारणा केलेली आहे. ते वाचून तीन गोष्टी मनात आल्या! (१) आपल्या गृहमंत्र्यांना काम नाहीं आहे कीं काय कीं ते इतक्या क्षुल्लक बाबीत लक्ष घालू शकतात (आणि इच्छितात)? (२) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर आता काय राष्ट्रपतींना दया दाखवायची हुक्की आली कीं काय? (आपल्या राष्ट्रपतींना फारसे काम नसतेच!) (३) न्या.मू. काटजूंच्या अर्जावर विचार चालू आहे कीं काय? राज्याचा कारभार हाकायला वेळ नाहीं तर या फालतू गोष्टी करायला कसा काय वेळ मिळतो? कीं हासुद्धा मतपेटीवर डोळा ठेवण्यातला प्रकार आहे?
अक्षय उत्तमराव लांडे -24 ऑक्टोबर 2013
वाह वाह वाह. खूप छान आहे हे. .त्याला तर फाशीच झाली पाहिजे. जय महाराष्ट्र.
Amol -24 ऑक्टोबर 2013
गुन्हा करताना लाज वाटत नाही मग शिक्षा भोगताना का वाटते आजारी वगैरे काही नाही नाटक करतात न्यायालयाने देखील यांना खूप कमी शिक्षा दिली यांना फाशीच दिली गेली पाहिजे
मुन्ना भाई - गुरुवार, 10 ऑक्टोबर 2013 - 07:50 AM IST
संजय दत्तच्या पॅरोलचे १४ दिवस संपले कीं नाहीं? एव्हांना संपले असणार. परत आतआला कीं नाही यावर मीडियाने लक्ष ठेवायला हवे. नाहीं तर तेरीभी-चुप-मेरीभी-चुपच्या (अ)न्यायाने बाहेरच उंडारेल!
निनाद कुलकर्णी -26 सप्टेंबर 2013
सुरेख विश्लेषण सध्या अजूनही काही वृत्त पत्रातून संजय दत्त तुरुंगात नाचत गात आहे कार्यक्रमाची तयारी करत आहे अशी वृत्ते नियमितपणे का प्रसारित होतात हे कळत नाही.
kiran deshmukh -23 सप्टेंबर 2013
doshila shisha zalich pahije .. nhai tr gunegari wadel..
प्रशांत शिर्के -23 सप्टेंबर 2013
हा तर न्यायव्यावास्तेवरचा अविश्वास वाटतो निकाल लागायला २० वर्षे लागली तो पर्यंत काय झोप काढल्या का?दुसरी गोष्ट वास्तविक आस वाटत नाही का ज्या वेळी गुन्हा घडला त्याच वेळी फासी होणे गरजेचे होते म्हणजे कमीतकमी असल्या पांढर्या पोशाख्वाल्यांना वेळीच चाप बसला असता
आनंद घारे -21 सप्टेंबर 2013
भाग १: अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असा लेख. यातल्या बहुतेक सगळ्या गोष्टी वीस वर्षांपूर्वीच प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने सर्वांना ठाऊक झालेल्या होत्या, त्यांची उजळणी झाली. संजयवर ठेवल्या गेलेल्या (पण न्यायालयाने मान्य न केलेल्या अशा) आरोपांचा विचार करता त्याला झालेली शिक्षा फार सौम्य आहे आणि निदान तेवढी तरी त्याला मिळालीच पाहिजे असा या लेखाचा रोख वरवर दिसत असला तरी त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहता बहुतेक लोकांची मते याबाबत किती जहाल आहेत ते स्पष्ट होते. आपली न्यायव्यवस्था कमालीची वेळखाऊ आहे, तिने केलेले न्यायदान समाधानकारक वाटत नाही या गोष्टींपेक्षा अशी एक व्यवस्था अजून तरी अस्तित्वात आहे हे माझ्या मते जास्त महत्वाचे आहे. तिच्यात सुधारणा आणायला हवी, पण कायद्याचा विचार न करता सामान्य लोक शिक्षा सुनावू लागले (आणि त्याची अंमलबजावणीही होऊ लागली) तर मात्र अराजक माजेल. (भाग २ पहा)
आनंद घारे -24 सप्टेंबर 2013
Part-2/2: एकादा सिनेमा पहातांना त्याच्या निर्मितीशी कोणाकोणाचे संबंध आहेत, आपण तिकीट काढतांना खर्च केलेल्या क्षुल्लक पैशांचा किती नगण्य असा हिस्सा कोणाकोणाच्या खिशात जातो हे आपल्याला माहीत नसते आणि त्याचा विचार आपण करत नाही. यामुळे एकादा सिनेमा किंवा नाटक पहातांना आपण ते स्वतःच्या करमणुकीसाठी पाहतो, ते चांगले आहे की वाईट हे त्यावरून ठरवतो. मला कळायला लागल्यापासून एकंदरीत सर्व चित्रपटसृष्टीच काळ्या पैशावर चालते असेच ऐकत आलो आहे, शिवाय अनेक चित्रपटांमध्ये कायदा, न्यायाधीश, पोलिस वगैरे सर्वांनाच अत्यंत हीन पातळीवर दाखवले जाते. त्यांना न जुमानता किंवा त्यांच्या सहकार्यानेच खलनायक संपूर्ण वेळ त्यांना वाटेल ते करत असतात आणि त्यात ते यशस्वी ठरतात, फक्त शेवटी एकाद्या वेळेस ते पकडले जातात असे थोडक्यात दाखवले जाते. त्यामुळे त्यातल्या कुणाकुणावर बहिष्कार घालणार? एकाददुसरा माणूस कायद्याचा भंग करतांना पकडला गेला तरी इतर सगळे सज्जन आहेत असे कसे मानणार? तिकीटांचा काळाबाजार करणा-यांच्याकडून जास्त किंमतीला तिकीट घ्यायचे नाही एवढेच मी आतापर्यंत पाळत आलो आहे. End
स्मिता सोनावणे -21 सप्टेंबर 2013
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम .... सुधीर काका सदर माहिती मिळविण्यासाठी आपल्याला किती मेहेनत घ्यावी लागली असेल. याची कल्पना आहे ... एकच लेख मध्ये सर्व माहिती मिळाली. मी आपल्या लेखांची नियमित वाचक आहे. धन्यवाद !!!
गणेश जगताप -14 सप्टेंबर 2013
संजय दत्त हा दयेस पात्र नाही, कारण तो करोडो रुपये कमावतो त्याने गोर गरिबांना, अनाथ अपंगांना, कधीच मदत केली नाही, जर त्याने त्यांना मदत केली असती तर त्यांच्या आशीर्वादाने त्याची सजा माफ देखील झाली असती.
nitin -13 सप्टेंबर 2013
लवकर सोडा त्याला, आम्हाला पिच्चर बगायचं हाय.
सुश्रुत कवर -12 सप्टेंबर 2013
पुराव्यांवर आधारित लेख, घटनांचा कालक्रम आणि तपशील अभ्यासपूर्ण आहे. पैसा, राजकीय आश्रय आणि लोकप्रियता ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे आसतील तर तुम्ही कितीही मोठा गुन्हा करून त्यातून सुटका करून घेऊ शकता हेच ह्या वरून सिध्द होते. हजारो निरपराधांचा बळीही त्यसाठी विसरवला जातो. कोणासाठी आपण अश्रू गाळतो हे देखील आपल्याला समजत नाही. खरा देशद्रोही संजय दत्त नाही त्याच्या साठी अश्रू गाळणारे लोक आहेत. काटजू सारखे त्याला पाठीशी घालणारे लोक आहेत. तुम्ही लेखाचा विषय बदलून संजय दत्तला पाठीशी घालणारे त्याच्या साठी अश्रू गाळणारे लोक कशे गुन्हेगार आहेत अश्या आशयाच करायला हवा होता.
सुधीर काळे, जकार्ता -11 सप्टेंबर 2013
भारतसाहेब, या नेत्यांवर खटले चालवून त्यांना शिक्षा देणे हे सरकारचे व न्यायसंस्थेचे काम आहे. त्यांनी शिक्षा दिल्यावर काटजूंसारख्याने जर दयेचा अर्ज केला तर मी त्यावर लिहेन. खटला चालवण्याचे बळ माझ्यासारख्याकडे कुठून येणार? ते काम सरकारनेच केले पाहिजे, माझ्यासारख्याने नव्हे!
भारत -10 सप्टेंबर 2013
अहो संजय दत्तला शिक्षा हि योग्यच आहे आणि ती तो भोगत आहे, त्याचे समर्थन नाही परंतु आपण आपल्या राज्यातल्या नेत्यांविषयी काहीच बोलत नाही ते तर मोठमोठे घोटाळे, जातीय दंगली, खून खराबे , जमिनी बेकायदेशीर पद्धतीने हस्तगत करून खुशाल मोकाट/बिनधास अयेशो-आरामात राहत आहेत वारे जनता आणि न्यायव्यवस्था. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे पण न्याय/शिक्षा/शासन सर्वांना समान नाही.....
Prashant Solankar -10 सप्टेंबर 2013
संजू बाबा का जो फैसला है.ओ गळत है या सही ए तो जनता को हि मालूम है ,जो फेसाला करणा है तो जनता हि करेगी,संजू बाबा मेरा fan है और हमेश फान हि रहेगा .मेरी इतनी हि दुवा है कि संजू बाबा निर्दोष है..उणे उनका जरूर mita फळ मिलेगा,,, आपका प्रशांत सोलनकर
राहुल बंड -8 सप्टेंबर 2013
एक अभ्यासपूर्ण लेख दिल्याबद्दल तुमचा, आणि सकाळचा आभारी आहे....गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो....त्याला कुठलीही जात धर्म नसतो...संजय दत्त बद्दल कुणाला सहानुभूती वाटावी हि bhavna कदाचित वाचकांच्या, त्याच्या चाहत्याच्या मनात केवळ मानवतेच्या पोटी yete...पण हि मानवता सज्नय दत्त तेव्हा विसरून गेला जेव्हा ९२-९३ च्या दंगलीत शेकडो निरागस लोक बळी पडलीत...त्याला माफी म्हणजे आपण त्या निरपराध व्यक्तींवर अन्याय करण्यासारखे आहे....
प्रशांत पवार -7 सप्टेंबर 2013
त्याला फाशी दिली पाहिजे
रॉजर -6 सप्टेंबर 2013
हा जितका विद्रोही तितकाच रमेश किणी ला मारणारा खुनी आहे...ह्या दोघांना एका व्यक्ती मुळे खरी शिक्षा मिळाली नाहीच...
अमर -5 सप्टेंबर 2013
संजय दत्त ला मुळीच माफी नको .फक्त संजय दत्त सोडला तर बाकी सर्व जणांना टाडा नुसार शिक्षा झाली आहे. तसी याला पण कठोर शिक्षा झाली पाहिजे.फक्त नट आहे म्हणून सहानभूती नको.
गीता shinde -5 सप्टेंबर 2013
tyachya gunhyachya manane hi shiksha kahich nahi..fashi dya.nahitar tyala jantechya tabyat dya..gunhachi tivrata pahun kayde तीव्र kara..देश vachva
सुरेश -4 सप्टेंबर 2013
काळेसाहेब नेहमी प्रमाणे एक अभ्यासपूर्ण लेख दिल्याबद्दल तुमचा, आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सकाळचा आभारी आहे. पण मी @जीवन या वाचकाशी सहमत आहे. आपण दिलेला सर्व इतिहास लक्षात घेऊनच न्यायालयाने त्याला (नालायकाचे नाव लिहिण्याचीदेखील इच्छा नाही) शिक्षा दिली असे आपल्याला गृहीत धरावे लागेल. त्यामुळे आता या इतिहासाचे कायद्याच्या लेखी काही महत्व उरत नाही. आता त्याने दयेचा अर्ज केला कि कोणीतरी बाबू (माझ्या मते आपले न्यायाधीशसुद्धा याच प्रकारात मोडतात) "दिलेल्या" नियमांशी त्याचा अर्ज पडताळून बघेल आणि अर्थातच तो त्या नियमांमध्ये बसेल याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. एका वर्षात तो नराधम मोठ्या कौतुकासह बाहेर येईल. बॉलीवूडवाले आणि काटजूसारखे लोक असा जल्लोष करतील कि जसाकाही एक फार मोठा क्रांतिकारी देशासाठी सजा भोगून आला आहे. संसदेत त्याचा फोटो लावला नाही तरच तुमच्या-आमच्या सारखे समाधान मानतील.
दत्तात्रय जाधव -4 सप्टेंबर 2013
संजय दत्तचे कृत्य हे देश द्रोही कृत्य आहे . आणि देश द्रोहाला माफी नसतेच मुळी. त्याने देश द्रोह्याशी संगनमत करून आपल्याच देशातील हजारो माणसे आणि मालमत्ता नष्ट करण्यास हातभार लावलेला आहे . त्याच्या एका चुकीची देशाने फार मोठी किंमत मोजलेली आहे . त्याला माफी देणे म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावर पुन्हा अन्यायाच केल्या सारखे होईल.
ravindra -4 सप्टेंबर 2013
फितूर आहे. टकमक टोक ......
sunil -3 सप्टेंबर 2013
तो देशद्रोही आहे त्याला फाशीच जाली पाहिजे
जीवन -2 सप्टेंबर 2013
लेख अभ्यासपूर्ण आहे परंतु आपण दिलेल्या उदाहरण वरून व रेफरेन्सेस पाहून माझ्या मते संजय दत्त हा दयेस पात्र आहे. माझे मत हे तो एक अभिनेता किवा कुणा मोठ्या बापाची अवलाद आहे म्हणून नव्हे तर संजय दत्त नावाच्या एका कायद्याने शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या सद्य परिस्थिती वर अवलंबून आहे. या साठी मी खालील निष्कर्ष लावेन. १) या माणसाने या गुन्ह्य साठी एकूण किती काळ जेल मध्ये घालवला आहे? २) या माणसाची वर्तणूक गुन्हा झाल्या पासून कशी आहे व कायद्याचे उल्लंघन केले आहे काय ? ३) या व्यक्ती मुळे समाजाला काही आर्थिक किवा इतर लाभ होत आहेत काय? ४) गुन्हा झाल्या पासून या व्यक्तीने आपल्या वागणुकीत अमुलाग्र बदल दाखविला आहे काय? ५) हि व्यक्ती दया दाखविल्या वर पुन्हा गुन्ह्य कडे वळणार नाही याची काय खात्री देत येईल? मला असे वाटते कि वरील सर्व प्रश्नांची उत्तरे संजय दत्त याच्या फेवर मध्ये येतात. या बद्दल दुमत असू शकेल पण लक्षत घ्या कि गुन्हेगारांना देखील चांगल्या वागणुकीच्या आधारे माफ करण्याची कायद्यात तरतूद आहे.
बंटी -2 सप्टेंबर 2013
काळे सर, अतिशय माहितीपूर्ण लेख दिल्याबद्दल आभार आणि या निमित्ताने सकाळ परिवाराला पण धन्यवाद....मी काटजू याचा जाहीर निषेध करतो...
neema -2 सप्टेंबर 2013
संजय दुत्ता fans जागे व्हा हा एक देशद्रोही आहे याला टाडा खाली फाशीची शिक्षा जालीच पाहिजे , तो तर terrorist आहेच शिवाय त्याला सहानभूती देणाऱ्या काताळू सारख्यांना हि योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे
Munna bhai -2 सप्टेंबर 2013
जर संजय ला माफी मिळणार असेल तर बाकीच्या क्य्द्याना पण माफी द्या. न्या (न्याय) सगळयांना सारखा.
बापू शेट्ये -2 सप्टेंबर 2013
काटजू हा एक थर्ड क्लास माणूस असून तो फक्त प्रसिद्धीच्या मागे असतो. त्याचा इतर उचापती पहिल्या तर हेच दिसते. त्या मानांने संजय हा मुर्ख पण त्यातल्या त्यात सरळ माणूस आहे. तरी सुद्धा त्याला खास सवलत देण्याचे काहीही कारण नाही. इतर सामान्य माणसाप्रमाणेच त्याला शिक्षा व्हावयास पाहिजे. मी तुझे सर्व रेफेरेन्सिस वाचले नाहीत. पण संजयला अटक झाल्यावर सुनील दत्तने जाहीरपणे सांगितले होते कि संजय हा इतका द्रग्स्च्या (drugs) आहारी गेलेला आहे आणि त्याचा IQ इतका कमी आहे कि त्याला शिक्षण सुद्धा नीट देत आले नाही आणि जेव्हा काही त्याने शस्त्रे जमवली त्याचा अंतिम परिणाम काय होऊ शकतो याचा विचार करण्याइतकी सुद्धा बुद्धी संजयला नाही आहे. अर्थात बुद्धी कितीही कमी किंवा जास्त असली तरी गुन्हा हा गुन्हाच असतो आणि त्यासाठी शिक्षा हि झालीच पाहिजे. मला संजय बद्दल काहीही सहानुभूती नाही. फक्त तो तेरारीस्त (terrorist) नव्हता आणि त्याचा मुंबई ब्लास्ट मध्ये हात नवता.
नितीन kamble -1 सप्टेंबर 2013
संजयला फाशी होणे खूप गरजेच आहे.
, -1 सप्टेंबर 2013
NO .नो,,,,,,, नो .
ashish -1 सप्टेंबर 2013
aani हा बेशरम दयेचा अर्ज भरतोय..
विनायक सोहोनी -1 सप्टेंबर 2013
जो पर्यंत दाउद चा पत्ता सापडत नाही तोपर्यंत त्याला डांबून ठेवा. विनायक सोहोनी
शशिकांत benurwar -31 ऑगस्ट 2013
त्याच्या आगामी चित्रपटांवर बहिष्कार घालावा मग तो कोणाचाही असो
max -31 ऑगस्ट 2013
"संजय दत्त दयेस पात्र आहे का?" मुळात हा प्रश्न विचारणारा माणूसच बावळट आहे.
विजय USA -31 ऑगस्ट 2013
काळेजी बर्याच दिवसानंतर लेख लिहिलात. माझ्या मते जर सर्वसामान्य घरातल्या मुलाला हीच सवलत मिळाली, तुरुंगात चमचमीत खाणे, खाजगी doctor वगैरे तर संजय दुत्त दयेस पत्र आहे. जर दिल्लीतल्या बलात्कार्याला ३ वर्ष सुधार गृहात रवानगी करतात तर संजय दुत्त दयेस पत्र आहे. आणि शेवटी संजय ची बहिण हि आईसाहेबांच्या खास मर्जीतली आहे म्हणून संजय दुत्त दयेस पत्र आहे.
विक्रांत, Chicago -31 ऑगस्ट 2013
काळे साहेब, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समर्पक लेख. बर्याच माहितीचे मेहतानीने संकलन करून आपली सडेतोड मते समर्पकपणे मांडली आहेत आणि माझ्याप्रमाणे अनेकांच्या मनातलेच विचार व्यक्त केले आहेत. ह्या वयातील आपल्या व्यासंगाबद्दल 'hats off to you!'. सुनील दत्त आणि नर्गिस म्हणजे हिंदू मुसलमान धर्मातीत दोन सज्जन भल्या व्यक्तींचे मिलन होते. तमाम भारतीयांना अभिमान वाटण्यासारखे त्यांचे कर्तुत्व होते. अशांच्या पोटी असे नादान कार्टे जन्मायला येते आणि पूर्ण वाया जाते आणि इतकेच नव्हे तर देश्द्रोह्हि करायला मागेपुढे बघत नाही हे चकित करणारे आहे. मुन्नाभाई चित्रपटानंतर सहानभूती वाटत असेल तर हा लेख वाचवा आणि संजुबाबाबद्दल भ्रमनिरास होईल. मार्केंडेय काटजू ह्यांच्या मर्कट लीलांपुढे दुर्लक्ष करून न्यायालयाने शिक्षा कायम ठेवतील अशी आशा आहे.
भारतीय -31 ऑगस्ट 2013
९३ च्या स्फोटात मृतझालेल्याच्या नातेवाईकांना विचार हा माणूस? कश्याच्या पत्रास आहे, हा देश खरच विचित्र आहे जिथे निष्पाप लोक बळी पडतात आणि ह्याच्या सारखी गिधाड आपली पोट भरतात.
अरविंद भिडे -31 ऑगस्ट 2013
हे सर्व आधी थोड्या फार फरकाने माहित होते .पण आता नव्याने सर्व गोष्टींचा विचार केल्यावर लक्षात आले कि हा प्राणी अत्यंत नालायक आणि कोणतीही नीती तत्वे नसलेला नीच प्राणी आहे. देशप्रेमाचा तर लवलेश हि नाही. उलट स्वार्थ करता दुबई/ पाकिस्तान स्थित गुंडांना हा साथ देत आहे. त्याचे सोडा ह्या बोलण्या वरून हे पण लक्षात आले कि बहुतांशी सिनेमा जगतातले लोक दाउद मुले आणि त्यांच्या स्वतः च्या कमकुवत पण मुले त्याचे दास झाले आहेत .काय हि आपल्या देशातल्या प्रथित यश लोकांची कहाणी . लाज वाटते त्यांची नालायाकांची अरविंद भिडे
Jayant Kulkarni -31 ऑगस्ट 2013
संजय दत्त नराधमाला सार्वजनीक चौकात फाशी द्यायला हवी.
दिलीप डोंगरे -30 ऑगस्ट 2013
संजय दत्ताच्या चित्रपटावर तिकीट विकत घेऊन न पाहणे शहाणपणाचे व देशभक्ती असण्याचे प्रमाण आहे . अर्थात हे सर्वांना पटणे वाटते तितके सोपे नाही . मात्र माझा निर्णय zala
अजिंक्य -30 ऑगस्ट 2013
@सुधीर काळे - खूप आभारी आहे. एवढ्या अभ्यास पूर्ण लेखा बद्दल...
पंकज काळे -30 ऑगस्ट 2013
कुणाच्या मागे किती जायचे .....आपणच घाम गळून तक्ष (tax) भरतो.....तोच पैसा आस फुकट जायला नको ....याहानंतर तरी....सो हे प्रकरण इतेच साम्पावांद मोवे ओं... (संपवा and move on)
pande -30 ऑगस्ट 2013
अभ्यास पूर्ण लेख. आमच्या पिढीला ह्यातला काहीच माहिती नव्हत कारण हे प्रकरण झाले तेव्हा आम्ही शाळेत होतो आणि नंतर असा लेख वाचनात आला नव्हता. मी पण ह्याचे पिक्चर टोकीज पैसे देवून पाहणार नाही ....
विशाल मुलीक -30 ऑगस्ट 2013
संजय दत्त किती नाटकी आहे हेय आज समजले...माहिती बद्दल धन्यवाद ..नाना पाटेकर बरोबरच बोलले होते...याला कधीच माफ करू नये...साला..जिस थाळी मे खाता ही ..उसी मे छेद किया...हरामी आहे...जाल्म्थे प मिलायेला हवी...याला...सगळे माहित होते याला...काय होणार आहे मुंबईत ते...हा काटजू कोण दलाल आहे का...याचा..
Mahesh Patole -30 ऑगस्ट 2013
बाप मेला ह्याचा, ह्याच्या टेन्शन ने ........
रवी सराफ -30 ऑगस्ट 2013
ह्याला फाशी हवी होती...
लस -30 ऑगस्ट 2013
हे सगळा वाचून असे वाटते कि त्याला आता बहर सोडूच नये
गणेश -30 ऑगस्ट 2013
संजय दत्त चे ठीक आहे पण राजकारण्यांचे काय ??
सोमनाथ कुंभार -30 ऑगस्ट 2013
या देशद्र्ह्याला झालेली शिक्षा खूपच कमी आहे. याचा विचार व्हायला हवा
मनीष -30 ऑगस्ट 2013
ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांनी संजय दत्त च्या चित्रपटावर बहिष्कार टाकावा
जयेश -30 ऑगस्ट 2013
फाशी द्यायलाच हवी
आशुतोष महाजन -30 ऑगस्ट 2013
सिने-कलाकारांच्या चित्रपटातील प्रतिमेवर भाळून त्यांच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. सिनेकलाकार पडद्यावर जसे असतात तसे खाजगी व सामाजिक आयुष्यात नसतात हे संजय दत्त, सलमान खान, ओंम पुरी, आदी कलाकारांनी चांगले दाखवून दिले आहे.
sv -30 ऑगस्ट 2013
@अनिरुद्ध अहो त्याने जी गांधीगिरी सिनेमात केली ती त्याने त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून केली.त्या कामासाठी त्याला पैसे पण मिळाले.म्हणून तो काही माफ होत नाही. आपल्या देशातील लोकांचे बिनडोक भावनेचा तो आणि त्याचे सहकरी मदतनीस गैरफायदा घेतात.

राहुल र -30 ऑगस्ट 2013
हा लेख वाचला आणि वाटलं कि P.H.D. करता हा विषय खूपच चांगला आहे. "पिंजर्यातला पोपट" खरच "पोपट आहे" तिथली सर्व काम करणार्यांना सक्तीचे निवृत्ती दिली पाहिजे... असे किती तरी उदाहरण असतील "पिंजर्यातल्या पोपटाचे".
रणजीत -30 ऑगस्ट 2013
मुख्य बातमी वाचल्यावर वाटल कोणाला परत पुळका आला याचा .. पण जेव्हा काळे सरांचं नाव वाचाल म्हटलं यांनी का हि चूक केली लेख लिहिण्याची कोणताही वातावरण नसताना ... पण लेख वाचायला सुरवात केली तर वाटलाच नाही कि केव्हा वाचून संपला .. अप्रतिम संशोधन .... खरच तुम्ही परत एकदा चांगला दृष्टीकोन दिला ... धन्यवाद काळे साहेब
vijay -30 ऑगस्ट 2013
कोणतीही दया माया नसावी अशा माणसाबद्दल जो देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी होता .....एव्हडा वाचल्यावर हे समजले कि याला तर फाशी व्हायला पाहिजे होतो, पण पैश्याच्या जोरावर वाचला......जनतेने संजय दत्त आणि सलमान खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे. आपणच त्यांना डोक्यावर घेतल असल्यामुळे हि परिस्थिती आली आहे.
अमोल तुळजापूर -30 ऑगस्ट 2013
पूर्ण history समजली
ek bharatiya -30 ऑगस्ट 2013
बापरे, सुधीर साहेब, संजय दत्त सारख्या वर इतका अभ्यास करून इतका वेळ कशाला वाया घालवलात?
मंदार -30 ऑगस्ट 2013
नायक नही खलनायक हु मै.....हे गाण ह्या नालायाकाने खर करून दाखवलाय
S -30 ऑगस्ट 2013
लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे ..धन्यवाद ..लेख वाचून संजूबाबानी लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाची व्याप्ती दिसून आली ..कोणतीही दया माया नसावी अशा माणसाबद्दल जो देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी होता ..जी हिंद
Jagannath Patil -30 ऑगस्ट 2013
Khup chhan lekh ahe ,Kale saheb tumhi great ahat , jabardast abhyas kelat tumhi. Lekhavarun kalate ki yala " Janmathep " dyayala pahije hoti !!!! Turungatun sutalyanantar dusarya gunhakhali atak zali pahije ,hya terroristala.
ओमकार -30 ऑगस्ट 2013
मला वाटते अजिबात नाही ...! त्याच्या एवढ्या मोठ्या गुन्ह्याला खरतर अजून शिक्षा व्यायला पाहिजे होती !!
sudarshan -30 ऑगस्ट 2013
सिनेमात दाखवतात तसा संजूबाबाने स्वतःच्या आयुष्यात खाराखुरच सिनेमा आणला आहे. सिनेमात कित्येक वेळेला दाखवतात कि वडील मास्तर आणि पोरगा चोर, तेच ह्याने स्वतःच्या आयुष्यात घडवला. ह्याला जर माफी किंवा दया दाखवायची तर मुंबई बोंब स्फोटात बळी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांवर अन्याय आहे. त्याचे मदतनीस म्हणतात कि संजूबाबाने खूप सोसलं आहे तो आता पिता आणि पती आहे, परंतु ज्या लोकांनी आपले प्राण गमावले त्यातही काही पिते आणि काही पती आणि काही दोनही होते. शरम कशी वाटत नाही अशी दयेची याचना करताना. आपल्याला इतकी थोडी शिक्षा झी ह्याच्या बद्दल त्याने जाणीव ठेवावी. बेशरम माणूस, सिनेमात मात्र गांधीगिरी करून दाखवतो. चोर तो चोर वर शिरजोर.
प्रकाश -30 ऑगस्ट 2013
खूपच छान लेख....प्रचंड आभ्यास व मेहनत घेतलीय आपण. आपण सगळ्यांनी तो तुरुंगातून सुटल्यावर तरी त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे.
baaL -30 ऑगस्ट 2013
एक उत्तम अभ्यासपूर्ण लेख आहे ... सकाळ ने प्रसिद्धी दिल्याबद्दल आभार
दिलीप शिर्के -30 ऑगस्ट 2013
संजय दत्त बाबत मला हा लेख वाचल्या पासून अत्यंत घृणा निर्माण झाली आहे. अतिशय नीच माणूस आहे तो.देशद्रोही.काटजू ला लाज वाटायला पाहिजे.
हिंदूंचा शुभचिंतक -30 ऑगस्ट 2013
तुमचे खूप आभारी आहे सर ह्या अप्रतिम लिखाणाबद्दल. भविष्यात ह्या प्रकरणावर आवश्यक ते संशोधन करून संजयला तो एक प्रकारचा दहशतवादी असून सुद्धा का त्याला टाडामधून का मुक्त केले ह्यावर मी नक्कीच विचार करून जनहित याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न करेन. जर आवश्यकता वाटली तर तुमच्या मदतीची तर तुम्हाला नक्कीच विनंती करेन. आपला एक शुभचिंतक...
दिलीप शिर्के -30 ऑगस्ट 2013
संजय दत्त बाबत मला हा लेख वाचल्या पासून अत्यंत घृणा निर्माण झाली आहे. अतिशय नीच माणूस आहे तो.देशद्रोही.काटजू ला लाज वाटायला पाहिजे.
sunil chaudhari -30 ऑगस्ट 2013
सुनील दत्त ह्यांनी देशसेवा चांगली केली ह्यात वाद नाही , पण आपल्या सुपुत्राचा बॉम्ब स्फोट प्रकरणात सहभाग बाहेर आल्यावर संजूबाबाला वाचाविण्या करिता ज्या हालचाली चालू होत्या त्या अंत्यंत केविलवाण्या होत्या आणि त्याकरिता त्यांनी आपली लोकसभेची जागा सुद्धा सोडली , हे सर्व नर्गिसचा ( mother India ) पती , आणि एक चांगल्या समाजसेवी कडून अपेक्षित नव्हते , एक तर मुलावर चांगले संस्कार टाकण्यात ते कमी पडले किवा एकमेव पुत्र म्हणून अति लाड केलेत!!!
प्रकाश -30 ऑगस्ट 2013
मुख्य बातमी वाचल्यावर वाटल कोणाला परत पुळका आला याचा .. पण जेव्हा काळे सरांचं नाव वाचाल म्हटलं यांनी का हि चूक केली लेख लिहिण्याची कोणताही वातावरण नसताना ... पण लेख वाचायला सुरवात केली तर वाटलाच नाही कि केव्हा वाचून संपला .. अप्रतिम संशोधन .... खरच तुम्ही परत एकदा चांगला दृष्टीकोन दिला ... धन्यवाद काळे साहेब
मंदार कुलकर्णी -30 ऑगस्ट 2013
एका खासदाराच्या मुलाने सरकारची मदत मागायला हवी होती. कारण ती त्याला सहज मिळाली असती... धन्यवाद .. बाप खासदार नसेल हि मदत सहज मिळत नाही हे अप्रताक्ष्य रित्या सांगितल्याबद्दल ..
shilpa -30 ऑगस्ट 2013
संजय दत्ताचा एवढा विचार का करता आहात ? त्याने जे काही केले त्या घोष्टींचा विचार करा . तय्चामुळे किती जनाचे नुकसान झाले . त्याचावर दया का करावी. ज्या घोश्तीस तो सामील होता त्या घोष्टींचा विचार आणि त्याचे परिणाम त्याला काळात नाव्त्ठेय का.? दया करू नये आणि शिक्षा हि झालीस पाहिजे.
रवि सोडये -30 ऑगस्ट 2013
संजय दत्तला फाशी व्हायला हवी होती.
संदीप पवार -30 ऑगस्ट 2013
अजिबात नाही....त्याने संपूर्ण शिक्षा भोगली पाहिजे. खरे पाहता हि शिक्षा त्याच्या साठी कमी आहे. त्यच्या जागी कोणी गरीब असता तर त्याला जन्मठेप झाली असती.
सचिन -30 ऑगस्ट 2013
जनतेने संजय दत्त आणि सलमान खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे. आपणच त्यांना डोक्यावर घेतल असल्यामुळे हि परिस्थिती आली आहे.
आशा लाड -30 ऑगस्ट 2013
लेख वाचल्या वर वाटते कि त्याला फारच कमी शिक्षा झाली आहे. सुधीर सर धन्यवाद पूर्ण माहिती दिल्या बद्दल
मनोज -30 ऑगस्ट 2013
नही फाशी व्हायला पाहिजे होतो
amit -30 ऑगस्ट 2013
Apratim sankalan tumche Khup Khup Abhar....
श्रीनिवास वारुंजीकर -30 ऑगस्ट 2013
संजय दत्तच्या घरात शस्त्रे आली, त्यावेळी त्याचे वडील सुनिल दत्त हे खासदार होतेच. मुंबईच्या सीमारेषांवर तपास अधिकाऱ्यांना गप्प करण्यासाठी हे खासदारकीचे वजन परस्पर वापरण्यात आले. एक कलर टीव्हीही जकात चुकवून मुंबईत नेणे श्नय नसताना, नाकाबंदी मोडून शस्त्रास्त्रे संजयच्या घरापर्यंत कशी पोहोचली, याचे रहस्य यातच दडले आहे. ही माहितीही एका लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या निरीक्षकाने मुंबई पोलिसांकडे नोंदवली होती, हे विशेष.
प्रसाद चयनी -30 ऑगस्ट 2013
सर्व सामान्य घरातल्या माणसाने असा गुन्हा केला असतातर एवढी सहानभूती मिळाली असती ? त्याचे अक्खे खानदान रस्त्यावर आले असते ..कायद्या पेक्ष्या संजय दत्त / किंव्हा त्याचे कुटुंबीय मोठे नाही.. त्याने त्याला दिलेली शिक्षा भोगलीच पाहिजे.
र.रा.अघमकर -30 ऑगस्ट 2013
सामान्य लोकांपर्यंत यापूर्वीच अशी सविस्तर देशद्रोही कथा यायला हवी होती.थोरामोठ्यांसाठी भारतातील कायदा निराळा आहे असे म्हणण्यास वाव आहे.पोलिस ,शासन यांनी प्रमानिल्क असावे हि सामन्याची अशा फोल ठरते .
अश्विनी -30 ऑगस्ट 2013
जबरदस्त लेख. समाजाचे डोळे उघडतील आता. माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल मनपुर्वक आभार.
राहुल -30 ऑगस्ट 2013
अप्रतिम लिखाण.......
hari -30 ऑगस्ट 2013
हा हा हा हा हा हा हा हा हा हा आ साधू संताना शिवी गाली आणी JAIL आणी चोर नेता ,कसब आणी संजय ची पूजा केली जाते......मी आता शिर्डी जाने बन करेन आणि ह्याचीच पूजा करेन ..
Sanjubaba -30 ऑगस्ट 2013
मला आत्ता माझे नाव बदलून घ्यावे लागेल ... affidavit च करतो तहसील कार्यालयात जाउन .......
दीपक -30 ऑगस्ट 2013
याला लात्कावला ते बरे जाले, नाहीतर समाजात चुकीचा message गेला असता. २० वर्ष सजा जाली असती तर बरे जाले असते असे वाटत लेख वाचून.
Rohit -30 ऑगस्ट 2013
हिरो आहे म्हणून एवढा.. वाचवा, करा, माफी द्या .... आणि सामान्य माणूस असला तर एवढी life स्टोरी पण आली नसती....
अंकुर -30 ऑगस्ट 2013
जबरदस्त लेख. त्याला कोणतीही दयामाया दाखवू नये. त्याने भले बॉम्बस्फोट घडवले नसले तरी ते करण्यासाठी त्याने शस्त्रास्त लपवून खूप मोठी चूक केली आहे. त्यावेळी तो इतका लहान नव्हता कि आपण कोणते कृत्य करतो आहे याचे त्याला भान नव्हते. सलमान खानाचे हि तसे आहे त्याला हि लोकांना मारल्याबद्दल शिक्षा व्हायला पाहिजे.
सचिन जाधव -30 ऑगस्ट 2013
खूपच छान लेख....प्रचंड आभ्यास व मेहनत घेतलीय आपण. :)
अजय सचदे -30 ऑगस्ट 2013
@प्रीतेश: "मी पण संजय दत्त व सलमान खानचे चित्रपट पैसे देऊन पाहत नाही ..." <== हे वाक्य नक्कीच बरोबर नाही. "पैसे (न) देऊन" ह्या गोष्टीचा अर्थ काय??? एक तर चित्रपट बघा किंवा बघू नका -- ह्या मध्ये 'मधला' असा काही मार्ग नाही. असो.
prashant -30 ऑगस्ट 2013
पैसा असला की काहीही शक्य आहे. त्याला फासी हवी
विठोबा -30 ऑगस्ट 2013
मी हर्षल नाईक यांच्याही सहमत आहे.......
प्रितेश -30 ऑगस्ट 2013
फारच उत्तम लेख. आपल्या सर्व लेखनाचा मी चाहता आहे. मी पण संजय दत्त व सलमान खानचे चित्रपट पैसे देऊन पाहत नाही. कोणत्या पण माणसा पेक्षा आपला देश कैकपटीने मोठा असतो.
अजय सचदे - 30 ऑगस्ट 2013
एक जबरदस्त संकलन. हा लेख लिहून समाज सेवा केल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आणि "संजय" बद्दल थोडी फार वाटणारी आत्मीयता पण नाहीशी झाली. अत्यंत बेदरकर वागला आहे "संजय" -- कुठे नर्गिस (मुस्लिम पण माणूस म्हणून उत्तम), कुठे "सुनील" (खासदार आणि माणूस म्हणून ठीक) आणि कुठे हा डमरू "संजय". तीन वर्षे हा डमरू वाजविला पाहिजे आणि नंतर bollywood मध्ये लटकविला पाहिजे "अग्निपथ" मधल्या बापासारखा, सर्व actors ना धाक बसावा म्हणून. दाउदच्या नानाची टांग.
sv -30 ऑगस्ट 2013
फाशी देऊन देखील १० वर्षे उलटायला पाहिजे होती. ह्याच ठिकाणी जर सर्सामान्य माणूस असता तर फाशी होऊन १५ वर्षे उलटली असती.
सुजाण नागरिक -30 ऑगस्ट 2013
मुळात त्याला पोलिस संरक्षण दिले होते तर मग त्याने का असे केले?त्याला कुणाकडून धोका होता हे कळलेच नाही.कदाचित त्याला चित्रपट चांगले काम मिळण्यासाठी त्याचा वापर करायचा होता.त्यामुळे त्याने कडावाला (दिब्या भारती प्रकरण अनुत्तरीत) ला मदत केली असेल आणि त्याला त्यात बरोबर गुंतवले.त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही.सदर प्रकरणात खरा मुद्दा लपविल्याचा गेलायचा संशयास वाव आहे.या प्रकरण कडे लक्ष वेधून संजय ला थातूर मातुर शिक्षा करून मोठ्ठा आरोप केलेला आरोपी पळून जायला मदत झाल्याचा संशय येतो आहे त्यावर काय काम झाले?मोठ्ठे पुरावे यात नष्ट झाले आहेत असे वाटते.कायदे तज्ञांनी यावर देशाच्या सुरक्षे साठी उहापोह करून सत्य बाहेर काढावे.
हर्षल नाईक -30 ऑगस्ट 2013
एव्हडा वाचल्यावर हे समजले कि याला तर फाशी व्हायला पाहिजे होतो, पण पैश्याच्या जोरावर वाचला.