एका धूर्त आणि दुटप्पी
हुकुमशहाचे पुनरागमन!
लेखक: सुधीर काळे, जकार्ता
sbkay@hotmail.com
"मी पाकिस्तानला वाचवायला आलोय्" अशी शेखी मिरवत
मुशर्रफसाहेब पाकिस्तानला परत आले. यायच्या आधी स्वत: केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांच्या
आरोपांखाली त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी खटल्यांपायी होऊ शकणार्या स्वत:च्या
अटकेविरुद्ध जामीन घ्यायची खबरदारी त्यांनी घेतली होतीच. त्यांच्या 'चमच्यां’नी
त्यांना काय सांगितले होते कुणास ठाऊक, पण त्यांचे स्वागत करायला केवळ मूठभर लोकच-'गार्डियन'
या ब्रिटिश वृत्तपत्रानुसार फक्त १५०० लोकच-हजर होते. या विरुद्ध २००७ साली बेनझीरबाई
परतल्या तेंहां त्यांच्या स्वागताला लाखोंवर लोक हजर होते. इतक्या कमी संख्येने
लोक त्यांच्या स्वागताला आले याबाबबत त्यांच्या ’चमच्यां’नी मुशर्रफसाहेबांना सुरक्षेच्या
अडचणींची सबब सांगितली असावी. त्यांच्या आगमनापाठोपाठ योजण्यात आलेले त्यांचे
कराचीतले भाषणही सुरक्षेच्या कारणासाठीच रद्द करण्यात आले[१] व "आता ते भाषण
इस्लामाबाद/रावळपिंडी येथे होईल" असेही जाहीर करण्यात आले.
मुशर्रफना चांगल्यापैकी ओळखणार्या तलत मसूद या एका
सेवानिवृत्त जनरलने म्हटले आहे कीं " पाकिस्तानला आपल्या आगमनाचे किती महत्व आहे
याबद्दलचे मूल्यमापन मुशर्रफ यांनी पार एकतर्फी केले व स्वत:ला अत्याधिक महत्व
दिले. त्यांच्या आगमनाने पाकिस्तानी राजकारणाच्या महासागरात "सुनामी"[२]
तर सोडाच पण वादळी लाटाही निर्माण झाल्या नाहींत, कांहीं हलके तरंगच जेमतेम उठले
असतील. आज त्यांच्याकडे स्वत:चा असा राजकीय मतदारसंघही नाहीं, स्वत:च्या पक्षाची
संघटना नाहीं आणि त्यांना मिळणारे समर्थनही अगदी मर्यादितच आहे."
राजा रूमी हे "जिना वैचारिक संस्थे"चे एक संचालक
आहेत. ते म्हणतात, "माजी लष्करप्रमुखांना (मुशर्रफना) आपल्या थोरपणाच्या
भ्रमाने पछाडलेले आहे. त्यांना जनतेच्या खर्याखुर्या पाठबळाचा आधार नाहीं. कांहीं
शहरी मध्यमवर्गीय लोकांना ते आवडतात. त्यांना मुशर्रफ यांची कारकीर्द आर्थिक
दृष्ट्या चांगली होती असे वाटते, पण निवडणुकांकडे ऐतिहासिक नजरेतून पाहिल्यास
कुठल्याही राजकीय नेत्याला सत्तेवर येण्यासाठी आपला स्वत:चा राजकीय पक्ष लागतो आणि
आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्याभोवती गोवलेला अनुयायांचा पाठिंबाही लागतो. अशा
पक्षाची आणि अनुयायांची मुशर्रफ यांच्याकडे वानवाच आहे."
मुशर्रफसाहेबांच्यावर अनेक फौजदारी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांचे
आरोप आहेत. राज्यघटना रद्द करणे, न्यायमूर्तींना अटकेत टाकणे यासारख्या आरोपापासून
ते बेनझीर भुत्तो आणि बलोच नेते नवाब अकबर
खान बुगटी या दोन नेत्यांच्या वधात त्यांचा सहभाग[३] यासारखे गंभीर आरोप त्यात
आहेत. आता तर मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्याबाबतही
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात अर्ज देण्यात आलेला आहे. त्याची सुनावणी लवकरच सुरू
होईल.
लोकशाही मार्गाने पुन्हा सत्तेवर येण्याची त्यांची
(दिवा)स्वप्ने धुळीला मिळालेली आहेत. कारण त्यांनी चार मतदारसंघातून निवडणूक
लढविण्यासाठीची नामांकनपत्रें भरली होती पण त्यापैकी तीन मतदारसंघांबद्दलची
नामांकनपत्रें त्यांनी राज्यघटना रद्द केल्याच्या आणि न्यायमूर्तींना अटकेत
टाकल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाच्या स्थानीय पातळीवरच थेट फेटाळली गेली तर
’चित्राल’ या पेशावरजवळील मतदारसंघासाठीचे त्यांचे नामांकनपत्र स्थानीय पातळीवर
संमत करण्यात आले होते पण उच्च न्यायालयातील आव्हानानंतर ते फेटाळण्यात आले. अशा
तर्हेने निवडणूक जिंकण्याचे त्यांचे मनोरथ धुळीला मिळाले आहेत.[४]
२९ मार्च रोजी मुशर्रफ कराचीमधील सिंध उच्च न्यायालयात
त्यांच्या जामीन अर्जाच्या संदर्भात हजर होते तिथून जामीन मिळवून बाहेर पडताना सुमारे
वीस वकीलांचा जमाव त्यांच्या निषेधात "या हुकुमशहाला फाशी द्या!" अशा घोषणा
देत उभा होता त्यातल्या एकाने-तजम्मुल लोधी याने-त्यांच्या दिशेने बूट फेकला!
सुदैवाने तो त्यांना लागला नाहीं. पण यावरून त्यांच्या ’लोकप्रियते’चा अंदाज येतो!
मुशर्रफना अजूनही स्वत:बद्दलच्या सत्य परिस्थितीची पूर्ण
जाणीव झालेली नसावी कारण सिंध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायालयात आल्यावर
प्रथेप्रमाणे सारे उठले. मुशर्रफही उठले, पण असे उठून उभे रहाणे त्यांना
अपमानास्पद वाटले! थोडक्यात काय? "सुंभ जळाला आहे पण पीळ जळालेला दिसत नाहीं"!
निवडून आल्यानंतर नियोजित पाच वर्षें सत्तेवर रहाण्याचा
विक्रम जरदारी सरकारने नुकताच पूर्ण केला. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या
साठाहून जास्त वर्षात असे कधीच झाले नव्हते कारण कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच
लष्कर सत्ता ताब्यात घेत असे. या वेळी असे झाले नाहीं. ओसामा बिन लादेनला मारताना खास
अमेरिकन सैनिकांच्या "Seals" तुकड्यांनी हेलिकॉप्टर्स वापरून पाकिस्तानी हवाई हद्दीचा सहज
भंग केला व खोलवर आत घुसून बिन लादेनला त्याच्या घरीच गोळ्या घालून ठार मारले व
त्याचे शव घेऊन ते परतही गेले. या मोहिमेबाबत पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी
लष्कर या दोघांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलेले होते.[५] या मोहिमेच्या यशस्वी
अंमळबजावणीनंतर पाकिस्तानी लष्कराचे तर पूर्णपणे वस्त्रहरण झाले. त्यामुळे रागावलेले
लष्करी नेतृत्व सत्ता ताब्यात घेईल अशी भीती मुलकी सरकारला होती. पण तसेही झाले
नाहीं. याला कारण म्हणजे थेट तख्तापलट करून सत्ताग्रहण करणे हे आता जागतिक तसेच
स्थानिक पातळीवर अग्राह्य ठरलेले आहे त्यामुळे (पाकिस्तानी जनतेला लष्करी राजवटीचा
आलेला एक प्रकारचा वीट आल्यामुळे) थेट सत्ता घेण्यापेक्षा आपले कांही "पित्ते"
निवडणुकीच्या रिंगणात उतरवावेत असे लष्करी नेतृत्वाला वाटू लागले आहे असे दिसते व
मुशर्रफ, अमेरिकेचा कडवा विरोधक इम्रान खान, कॅनडास्थित एक मौलवी ताहीर उल काद्री,
बदनाम अणूशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान आणि एक जिहादी कंपू "दफा-ए-पाकिस्तान"
यांना लष्कराने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन राजकीय क्षेत्रात उभे केले
आहे. उद्देश? पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज यांची मुस्लिम लीग या दोन मोठ्या
पक्षांचा प्रभाव क्षीण करणे आणि पुढे
संसदेत त्यांच्या विरोधात उभे राहून त्यांना धड काम न करू देणे हाच!
एका बाजूला अमेरिकेच्या
बाजूने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत उतरायचे आणि दुसर्या बाजूला शत्रूच्या सेनानीला
सुरक्षित जागी लपू द्यायचे असा दुटप्पी खेळ खेळण्यात मुशर्रफ कसे गुंतले होते हे
आता उघड झाले आहे. ओसामा पाकिस्तानात रहायला आला ते मुशर्रफसाहेबांच्या काळातच आणि
ओसामाने आपले गढीसारखे घर बांधायला जागा निवडली तीही अबताबादच्या "पाकिस्तानी
लष्करी अकादमी"च्या (Pakistan Military Academy) अगदी शेजारी! मुशर्रफ जरी मारे "मला हे माहीतच नव्हते" असे सर्रास
सांगत फिरत असले तरी हे सारे त्यांना न सांगता वा त्याची परवानगी न घेता करण्याची
हिंमत कुठल्याही लष्करी अधिकार्याकडे नव्हती. त्यांनीच ही जागा सुचविलीसुद्धा
असेल, पण एरवीसुद्धा त्यांच्या होकाराशिवाय ओसामा तिथे PMA च्या इतक्या जवळ आपली गढी बांधून राहूच शकला नसता! म्हणूनच
आज अमेरिकेने मुशरफ यांचा पाठिंबा काढून घेतला आहे व मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तान
सरकारने अनेक गंभीर खटले ठोकलेले असतानाही अमेरिकेने त्यांच्या बाजूने एक शब्दही
काढलेला नाहीं हे लक्षणीय आहे. एके काळी तालीबान सरकारला मान्यता देणारे पाकिस्तान
हीकुलते एक राष्ट्र उरले होते. पण तालीबानलाही मुशर्रफ यांनी दगा दिल्यामुळे आता
याच तालीबानच्या तेहरीक-ए-तालीबान-पाकिस्तान (TTP) या पाकिस्तानी
शाखेने मुशर्रफला जिवे मारणाचा विडा उचलला आहे! थोडक्यात आज मुशर्रफना ना
अमेरिकेचा पाठिंबा आहे ना तालीबानचा. एका बाजूला अमेरिकेचे भूतपूर्व
राष्ट्राध्यक्ष (धाकल्या) बुशसाहेबांनी आपल्या आठवणीवजा पुस्तकात तक्रारीच्या
स्वरूपात लिहिले आहे, "मुशर्रफ यांनी दिलेली आश्वासने ते पुरी करू शकले
नाहींत वा त्यांना ती पुरी करायची नव्हती". खरे तर मुशर्रफ हे अमेरिकेच्या
बाजूने उभे राहिल्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारलेली होती व त्यांना legitimate dictator किंवा enlightened moderate Muslim leader अशा संज्ञा मिळाल्या होत्या. पण आता अमेरिकेच्या इस्लामाबाद
येथील दूतावासाने स्पष्ट केले कीं "मुशर्रफ यांच्या स्वदेशी परत येण्याबाबत
अथवा त्यांच्यावरील खटल्यांबाबत अमेरिका कुठलीच भूमिका घेऊ इच्छित नाहीं. हा
प्रश्न आपल्या राज्यघटनेनुसार आणि कायद्यानुसार पाकिस्तानी सरकारला सोडवायचा आहे.
अमेरिका आपला संपूर्ण पाठिंबा लोकशाही राज्यव्यवस्थेला देत असून कुठल्याही एका
पक्षाला किंवा उमेदवाराला तिचा पाठिंबा नाहीं."
या उलट TTP त्यांना "जहन्नुम"ला धाडायला सज्ज झालेली आहे व त्यासाठी त्यांनी आत्मघाती बॉम्बहला करणारी पथके
व दुर्बिण लावून नेम धरता येणार्या खास रायफली वापरून नेम धरून गोळ्या घालण्यात तरबेज
असलेल्या नेमबाजांची पथके आणि हाणामारीच्या द्वंद्वयुद्ध करण्यात पटाईत असलेली पथके
तयार ठेवली आहेत असे जाहीर केले आहे. यामुळे मुशर्रफना वाचविण्यासाठीही
सध्याचे तात्पुरते सरकार सज्ज झालेले आहे.
मुशर्रफ परतले होते ते नक्कीच निवडणूक लढविण्याच्या इराद्याने! पण केवळ आम जनतेच्या पाठिंब्यावर विसंबून न रहाता त्यांनी अनेक क्लृप्त्याही लढविल्या होत्या.
त्यांनी सिंध प्रांतात प्राबल्य असलेल्या मुत्ताहिदा कौमी चळवळ
(MQM) या दुसर्या क्रमांकाच्या पक्षाशी करार केला होता. त्यानुसार तो पक्ष मुशर्रफ यांच्याविरुद्ध आपला उमेदवार उभा करणार नाहीं अशी
तरतूद होती व मुशर्रफ यांची "NA-250-क्लिफ्टन डिफेन्स" या मतदारसंघातून विजयी होण्याची शक्यता वाढली होती. याबद्दलच्या
वाटाघाटीत MQM चे प्रमुख नेते अल्ताफ हुसेन आणि सिंध प्रांताचे
राज्यपाल इश्रातुल एबाद यांनी खूप प्रयत्न केले होते.
लष्कर निवडणुकात कोणत्याप्रकारे ढवळाढवळ करेल याबाबत सर्वत्रच
शंका होती. पण मुशर्रफ यांच्या पुनरागमनाबद्दलच्या प्रतिक्रियांत
लष्कराकडून सत्ता हस्तगत केली जाण्याच्या भीतीपेक्षा मुशर्रफ यांच्याबद्दल संताप आणि
कुचेष्टाच जास्त होती व हे ट्विटरवरील त्यांच्याविरुद्धच्या कुचेष्टेवजा टिप्पणीत उघड
झाले. त्यात १८ एप्रिल रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून मुशर्रफ
यांनी घाबरून अक्षरश: पळ काढल्याच्या त्यांच्या शौर्याला
उद्देशून अनेक ट्वीट्स देण्यात आल्या त्यातल्या कांही टोमणेवजा ट्वीट्स नमुन्यादाखल
खाली दिल्या आहेत:
·
देखो, देखो
कौन भागा? कमांडो भागा, कमांडो भागा[६]
·
मुशर्रफ यांची
व्यायाम करतानाची छायाचित्रे कौतुकाने प्रसिद्ध झालेली होती त्यांना उद्देशून ही
ट्वीट: All
that exercise paid off. Musharraf ran out of the courtroom as fast as Usain
Bolt[७]." व्यायम करतानाचा मुशर्रफ यांचा फोटो पहा खालील
दुव्यावर!
https://twitter.com/P_Musharraf/status/317148634300952576/photo/1
·
Pakistan
have never done well chasing.
·
Has
anyone checked if Musharraf is at Mocca?
·
House
Arrest? His farmhouse is the size of a whole province. Esa house arrest hum sab
ko milay.....
·
Not
very long ago General Mush was telling us he never lead from behind. Now we
know, he escapes from 'behind'!
·
Real
commandos don't run[६].
·
Didn't
they teach evasion tactics at SSG school?
·
Parvaaz
Musharraf.
·
To
give Pervez Musharraf some credit, at least he had an exit strategy this time
around. Unlike Kargil."
·
Speaking
of awkward moments, those who 'Liked' Musharraf's fan page on facebook in bulk.
Marwa dya na!
·
Awkward
moment for all present and former members of PML-Q (२००८ सालच्या निवडणुकीतील मुशर्रफ यांचा पक्ष)
·
Musharraf
has clearly taken the running for president, the wrong way.
·
And
so Mushi took the slogan "Go Musharraf Go" too literally,
albeit very late
इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (Islamabad High Court-IHC) मुशर्रफ यांना पळून जाऊ दिल्याबद्दल त्यान्यायालयाचे
न्यायमूर्ती जस्टिस शौकत अजीज सिद्दीकी यांनी त्या भागचे इन्स्पेक्टर जनरल बानी
अमीन यांना जबाबदार धरले व त्यांना २४ तासात अटक करण्याचा हुकूम दिला. त्या
निर्णयाला अमीन यांनी आव्हान दिलेले असून त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. पण दुसर्याच
दिवशी पोलिसांनी त्यांना रीतसर अटक केली व न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेला असलेला धोका पाहून न्यायाधीशांनी त्यांच्या
फार्महाऊसचेच छोट्या कारागृहात रूपांतर केल्याचे जाहीर केले व तिथेच त्यांना घरकैदेत
ठेवण्याची आज्ञा दिली.
त्यांना तिथे फोनची सुविधा देण्यात आलेली नसून त्यांना कुणालाही
भेटायची परवानगीही नाहीं. पण ज्या कठोरपणे मुशर्रफनी नवाज शरीफना तुरुंगात
डांबले होते अथवा झिया उल हक यांनी (थोरल्या) भुत्तोंना ज्या अपमानास्पदपणे वागविले तो कठोरपणा अद्याप तरी मुशर्रफ यांच्या
वाट्याला आलेला नाहीं. भविष्यकाळात त्यांना कशी वागणूक दिली जाईल
हे आज कुणीच सांगू शकत नाहीं! निवडून कोण येतो याच्यावरही ते
कांहीं अंशी अवलंबून आहे असे मला वाटते.
एक सेनानी म्हणून मुशर्रफ यांची प्रतिमा आज कशी आहे? नक्कीच
चांगली नाहीं. कारण त्यांच्याशी जवळीक असणारे, त्यांच्या दूरच्या नात्यातले व
कारगिल मोहिमेच्यावेळी "ISI" मध्ये
उच्चपदावर असलेले सेवानिवृत्त सेनानी ले.ज. शाहिद अजीज यांनी त्यांच्या कारगिलच्या
दुस्साहसामधील मुशर्रफ यांच्या घोडचुकांबद्दलची माहिती नुकतीच एका पुस्तकाद्वारे जगापुढे मांडून त्यांची पार लाज काढली व त्यांच्या लज्जेची लक्तरे सार्या जगाला दाखविली. त्यात हे दुस्साहस कुणाही ज्येष्ठ सेनानींना विश्वासात
न घेता मुशर्रफ यांच्याकडून केवळ चार ’पित्त्यां’च्या जोखमीवर कसे आखले गेले होते,
त्यात भारत जिद्दीने हे आक्रमण परतवेल हा मुद्दाच कसा लक्षात घेतला गेला नव्हता,
त्या हल्ल्यात कशी Exit strategy नव्हती,
पाकिस्तानी सैनिकांना कसे वार्यावर सोडण्यात आले व त्यामुळे ते कसे हाल-हाल होऊन
मृत्युमुखी पडले याची हकीकत त्यांनी प्रसिद्ध केली. त्यामुळे एक युद्धकुशल सेनानी
म्हणूनही मुशर्रफ यांची प्रतिमा पार रसातळाला गेली!
एक राजकीय नेता म्हणून मुशर्रफ यांचे भवितव्य त्यांना लष्कराचा
किती पाठिंबा मिळेल याच्यावरच अवलंबून आहे. मुलकी सरकारने त्यांच्याविरुद्ध खटले चालवून जर त्यांना शिक्षा ठोठावली तर
ते लष्कराच्या राजकीय शक्तीमध्ये किती र्हास झालेला आहे याचे निदर्शक ठरेल.
पाकिस्तानी लष्कराची सत्तेची भूक अजूनही मंदावलेली नाहीं. गेल्या पाच वर्षांत लष्कराने मुलकी सरकाराकडून सत्ता बळकावण्याचे अनेक अयशस्वी
प्रयत्न केले. त्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे "मेमोगेट" म्हणून प्रसिद्ध असलेले कुलंगडे[८]!
त्यात अमेरिकेचे तत्कालीन राजदूत हुसेन हक्कानींवर लष्कराने सत्ता बळकावू
नये म्हणून दबाव आणण्यासाठी अमेरिकन सरकारला एक मेमो लिहिल्याचा आरोप करण्यात आला.
त्यात गुंतलेले मन्सूर अजीज हे न्यायालयासमोर आलेच नाहींत व चौकशी
यथातथाच झाली. तरी लोकशाही वाचविण्यासाठी हक्कानींनी आपला राजीनामा दिला. ओसामाच्या वधासाठी पाकिस्तानी लष्कराला व सरकारला न सांगता केलेल्या अचानक
आणि यशस्वी हल्ल्यामुळे (आणि ओसमाला लपवून ठेवण्यात लष्कराचा
हात असल्याच्या आरोपांमुळे) पाकिस्तानी लष्कराचे मनोधैर्य इतके
खचले होते कीं स्वत: जरदारींबद्दल व त्यांच्या पक्षाबाबत खोलवर रुतलेली घृणा असूनही लष्कराला
सत्ता काबीज करण्याची हिंमत उरली नव्हती.
लष्कराची स्थिती अशी अतीशय नाजूक असताना मुशर्रफ यांचे आगमन
त्यांना आणखीच अडचणीचे ठरणार असे दिसते कारण पाकिस्तानी लष्कर आज त्यांना सक्रीय मदत
करण्याच्या स्थितीतच दिसत नाहीं!
==============================
टिपा:
[१]
पाकिस्तानमध्ये (हल्ली आपल्याकडेही ) कुठल्याही घटनेचे स्पष्टीकरण देताना
सुरक्षेसंबंधींच्या अडचणींची सबब देण्यात येते.
[२] इम्रान खान
यांनी आपल्या प्रचंड संख्यच्या सभांना "सुनामी" म्हणायला सुरुवात केली.
त्यांना पाकिस्तानी जनतेला खात्रीने सांगायचे होते कीं त्यांच्या पक्षाच्या या
सुनामी लाटांत आजची विफल, परिणामशून्य व भ्रष्ट सरकारे नक्कीच वाहून जातील.
[३]आता तर
बेनझीर यांचे सुपुत्र (व कदाचित् भावी पंतप्रधान) बिलावल भुत्तो जरदारी यांनीही
मुशर्रफ यांच्यावर आपल्या आईच्या खुनाचा आरोप केलेला आहे.
(http://www.aljazeera.com/news/asia/2013/03/20133298916575269.html)
[४] निरोगी
लोकशाही केवळ प्रौढ मताधिकारावर Adult franchise आधारित असायला हवी. मुशर्रफ
यांच्यावरील आरोप नक्कीच गंभीर असल्याने त्यांच्या बाबतीत हा निर्णय कदाचित् योग्य
असेलही पण या वेळी अनेक उमेदवारांचे अर्ज अगदी क्षुद्र कारणांवरून नामंजूर करण्यात
आलेले आहेत व त्यावरून ही निवडणूक जास्त करून election राहिली नसून selection झाली आहे असे वाटते.
[५] पाकिस्तानी
सरकारला किंवा पाकिस्तानी लष्कराला याबाबत पूर्वकल्पना दिल्यास ही मोहीम गुप्त
रहाणार नाहीं व बिन लादेनला पूर्वसूचना मिळून तो हाती लागणार नाही याची खात्री
असल्यानेच त्यांना अंधारात ठेवण्यात आले होते.
[६] मुशर्रफ यांना "कमांडो" या टोपणनावाने संबोधले जाते.
[७] उसेन बोल्ट हा जमेकाचा
१०० आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपद विजेता व नवे विश्वविक्रम प्रस्थापित करणारा धावपटू
आहे.
[८] या भानगडीत अमेरिकेतील पाकिस्तानी वकील हुसेन हक्कानी यांच्यावर
अमेरिकेकडून पाकिस्तानी लष्करावर सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नांना अडविण्यासाठी मदत
मागविल्याचा आरोप केला गेला. हक्कानींची
एक राजदूत म्हणून अमेरिकन सरकार-दरबारी खूप ये-जा असूनही एका पाकिस्तानी वंशाच्या दांपत्त्याच्या पोटी अमेरिकेत जन्मलेल्या
म्हणजेच "जन्माने अमेरिकन" असणार्या
एका व्यावसायिकाची मदत का घेतली असावी हा एक अनुत्तरित प्रश्नच आहे. ती व्यक्तीही अशी निवडली की ती एक इन्व्हेस्टमेंट बॅन्करच नव्हे तर CNN,
Fox News, ABC, NBC अशा दूरचित्रवाणीकेंद्रांवर सातत्याने वावरणारी,
PBS Newshour आणि ABC News Nightline सारख्या कार्यक्रमात
भाग घेणारी तसेच Financial Times, New York Times, LA Times, Washington
Post, International Herald Tribune Newsweek, USA Today Times of India यासारख्या वजनदार वृत्तपत्रांच्या संपादकीय पृष्ठांवर लिखाण करणारी
व्यक्ती होती. हुसेन हक्कानींच्यावर आरोप ठेवला गेला कीं त्यांनी पाकिस्तानी
लष्कराला सत्ता घेण्यापासून रोखण्यासाठी आणि मुलकी सरकारची पाकिस्तानी लष्करावरील
पकड दृढ करण्यासाठी ओबामा सरकारकडे मदत मागण्यासाठी एक "मेमो" लिहिला व
तो सर्व सेनाप्रमुखांच्या चमूच्या अध्यक्षपदी असलेल्या (Chairman of the Joint Chiefs
of Staff) अॅडमिरल माईक मुलन यांच्याकडे सुपूर्त करण्यासाठी मन्सूर
इजाज यांच्याकडे सोपविला! आता अमेरिकन नागरिक असलेल्या मन्सूर इजाज यांची निष्ठा
पाकिस्तानी लष्करावर होती कीं लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारवर होती कीं
स्वत:च्या फायद्यावर होती ते देवच जाणे. पण या अॅडमिरल मुलन यांना लिहिलेल्या
गोपनीय "मेमो"मधला संपूर्ण वृत्तांत Foreign Policy या नियतकालिकाच्या संस्थळावर (website) १७ नोव्हेंबर
२०११ रोजी प्रसिद्ध झाला. ही घटनाच मग "मेमोगेट" म्हणून (कु)प्रसिद्ध
झाली. ही सारी कहाणी अतर्क्यच (आणि म्हणूनच
बहुदा खोटी) असावी. त्यात हुसेन हक्कानी या राजदूताचा नाहक बळी पडला असेच मला
वाटते!
अवांतर वाचन: मुशर्रफ यांच्या ’कर्तबगारी’वर
प्रकाश पाडणारे कांहीं दुवे:
· http://www.nytimes.com/2013/03/25/world/asia/pervez-musharraf-the-former-president-returns-to-pakistan.html?_r=0
· http://www.latimes.com/news/world/worldnow/la-fg-wn-judge-orders-musharrafs-arrest-20130418,0,7096117.story)
· http://www.cnn.com/2013/04/18/world/asia/pakistan-politics/index.html
(Mush placed in house arrest)
· http://news.yahoo.com/musharraf-returns-pakistan-amid-death-threats-080248691.html
· http://en.wikipedia.org/wiki/Pervez_Musharraf#Return_to_Pakistan
· http://www.reuters.com/article/2013/04/18/us-pakistan-musharraf-idUSBRE93H06M20130418
· http://www.cnn.com/2013/03/24/world/asia/pakistan-musharraf-return
· http://www.washingtonpost.com/world/middle_east/pakistans-musharraf-flees-court-after-bail-revoked/2013/04/18/96238544-a7ff-11e2-a8e2-5b98cb59187f_story.html
· http://www.mail.com/int/news/world/2032942-pakistani-judge-orders-musharraf-held-2-weeks.html
· http://www.wral.com/pakistan-s-musharraf-lashes-out-after-arrest/12358043/
· http://www.theage.com.au/world/musharraf-takes-flight-from-court-20130419-2i3t8.html
· http://www.nytimes.com/2013/04/17/world/asia/musharraf-is-disqualified-from-pakistani-elections.html
· http://www.nytimes.com/2013/04/20/world/asia/pervez-musharraf-arrested-in-pakistan.html?pagewanted=all&_r=0
· http://tribune.com.pk/story/537214/the-lighter-side-of-musharraf-on-the-run/
http://tribune.com.pk/story/536227/musharraf-rejected-from-3-out-of-his-4-chosen-constituencies/
http://tribune.com.pk/story/535177/punishing-the-dictator/
http://tribune.com.pk/story/536227/musharraf-rejected-from-3-out-of-his-4-chosen-constituencies/
http://tribune.com.pk/story/535177/punishing-the-dictator/
harshal - मंगळवार, 25 जून 2013 - 01:18 PM IST
@ ठणठणपाळ :: तुमच्या logic प्रमाणे आता एक
काम करा जगातल्या सर्व हुकुमशहा आणि धूर्त लोकांची यादी काढा ...आणि त्या
सर्वावर तुम्ही आणि अनिता मिळून चर्चा करा इथे .. कारण फक्त मोदी राजीव
गांधी आणि सज्जन कुमारच का फक्त .. lets get out of this " constructive
criticism " .. ha ha ha
====================
====================
manish patil - मंगळवार, 25 जून 2013 - 01:12 PM IST
आता एखाद्याने एखाद्या कपटी राज्कार्ण्य्वर
लेख लिहला तर काय त्यात त्याने आज वर झालेल्या सर्व कपटी लोकांचा उल्लेख
करायचा का ? किवा जर आपल्या देशात कोणी कपटी राजकारणी असेल तर आपण बाकी
देशाच्या कपटी लोकांवर काहीच लिहू नये असा नियम आहे का ?
This is really foolish of Anita ji and others.. This article is about
Mushraff and Pakistan. There is no point in giving your free advice to
Sudhir Kale ( for eg उगाच पाकिस्तानच्या मूर्ख लोकांवर लेख लिहिण्यापेक्षा
आपलेच राजकारणी किती नालायक आहेत ते लोकांना समजाऊन सांगा ) .. If you
have any grudges against Modi or RSS .. you are free to write article on
that ..no one has stopped you ... Why to discuss the things that are
not related here .. आता thanthanpal RSS मध्ये आणत आहेत.. याची कुठलीही
गरज येथे दिसत नाही
@Sudhir Kale : Please dont respond to any of the comments regarding
Modi and Godhra.That is not relevant here.
====================
====================
ठणठणपाळ - मंगळवार, 25 जून 2013 - 10:09 AM IST
@विक्रांत - मुशरफ च्या लेखात मोदी कसे असा
जो तुम्हाला प्रश्न पडतो त्याचे एकच उत्तर म्हणजे मुशरफ जसा धूर्त व
दुट्टपी तद्वत मोदी पण हुकुमशाह. मोदीची मनमानी पण मुशर्फ च्या हुकुमशाही
शी मिळती जुळती. सज्जनकुमार, राजीव गांधीवर जर दंगलीमुळे टीका होते, तर नमो
नमः मोदी ला का spare करायचे? मी कॉंग्रेसवाला नाही परंतु तुम्हा
लोकांच्या constructive criticism च्या व्याख्या सर्वाना माहित आहेत.
सोनिया गांधी वर Italian म्हणून टीका करायची म्हणजे constructive
criticism परंतु मार्च १९, १९३७ साली RSS चे Dr बा शि मुंजे इटलीचा
हुकुमशहा मुसोलिनी याला "संघटना" कशी बांधावी यासाठी भेटले होते असे आम्ही
म्हटले कि आम्ही destructive / Negative criticism करतो. इटलीवरून सोनिया
माइनो (गांधी) तर आता आली पण मोदीची RSS १९३७ सालीच इटलीला पोहोचली होती.
मुसोलीनीचे हुकुमशाही facist बाळकडू RSS कडून मोदी कडे आले हि
वस्तुस्थिती.
====================
====================
Anita - सोमवार, 24 जून 2013 - 07:13 PM IST
@विक्रांत
तुम्हाला मुळ मुद्दा कळलाच नाही. पाकिस्तान ला असे वाटते कि भारताने
सियाचेन बळकावला (१९८४). सियाचेन बद्दल काय घडले ते वाचा. १९४९ चे
agreement internet वर उपलब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तान चे डोके फिरणे हे
काही धूर्तपणा किवा कपटीपणा या सदराखाली टाकण्यासारखे नाही.
And then Mushraff decided that they have to teach India a lesson for
occupying Siyachen illigally. The only thing Pakistan had done was to
approve the hiking missions in that area for the Western nationals. That
was enough for India to occupy Siyachen.
Now if you look at the situation from Pakistan's perspective, they were
upset about that. Then if they decide to attack Kargil and take that
land to settle scores, do you think that is unexpected?
Now about Kale ji's logic. He is sure that Mushraff is a bad person for
trying to settle scores with India as an Army officer, (And they were
winning before Clinton intervened) but Modi is good because of his work
in Gujraat.
====================
====================
सुधीर काळे, जकार्ता - शनिवार, 22 जून 2013 - 03:00 PM IST
ठणठणपाळ-जी, आपले "गोधरा हत्याकांडाचे
समर्थन करून एवढ्या लवकर आपल्या पत्रकारितेची हाराकारी स्वीकारलीत" हे
विधान सपशेल चुकीचे आहे. मी कधीच गोध्रा हत्त्याकांडाचे समर्थन केलेले
नाहीं. ज्यांनी ही निंदनीय कृती केली तेच गुजराथच्या नरसंहाराला व
इंदिराजींची हत्त्या करणारे त्यांचे शरीरसंरक्षकच दिल्लीतील व उत्तर
हिंदुस्तानातील हत्त्येला जबाबदार आहेत असे मी मानतो. शिखधर्मियांविरुद्ध
झालेल्या अत्याचारांबद्दल राजीव गांधींचा निषेध न करता फक्त मोदींच्यावर
टीका करणे हे बरोबर नाहीं. दोघांवर सारखीच टीका व्हायला हवी. पण आपल्यातले
कांहीं वाचक हे तारतम्य बाळगत नाहींत हेच खरे. याला मी "बेगडी
सर्वधर्मसमभाव" समजतो!
या प्रतिसादांची वारंवार पुनरुक्ती होत आहे. त्यामुळे आता या विषयावरचा हा
माझा शेवटचा प्रतिसाद!
हाराकिरी करायला मी पत्रकार नाहींच. केवळ हौस म्हणून विनामूल्य लेखन करणारा
मी एक metallurgist आहे. मी माझ्या मतांबाबत ठाम आहे. मी कुठल्याही
पक्षाचा नाहीं. ज्या घटना मला प्रभावित करतात अशा घटनांबद्दल मी लिहितो.
उदा. आधी अण्णांचे आंदोलन आणि इथे मुशर्रफचे पुनरागमन!
====================
====================
विक्रांत, Chicago - शनिवार, 22 जून 2013 - 05:16 AM IST
लेख आहे मुशर्रफ वर. ह्यात मोदींचा समंध
काय? प्रतिक्रिया देणार्यांनी एव्हढी औष असेल तर स्वत: लेख लिहावेत.
सत्तरीच्या वरचे असलेले काळे साहेब हे एक अब्भ्यासू लेखक आहेत. पाकिस्तान
ह्या विषयावर ते लिहितात कारण त्यात त्यांना व्यासंग आहे. पाकिस्तानात काय
चालले आहे ह्यावर प्रत्येक जाणकार भारतीयांनी लक्ष ठेवलेच पाहिजे कारण
मित्र निवडता येतात, शेजारी नाही. टीका करणार्यांकडे दुर्लक्ष करून
कालेसाहेबांनी असेच लिखाण चालू ठेवावे अशी विनंती आहे. कारण इथे
constructive क्रितीचीस्म झालेले दिसत नाही.
====================
====================
ठणठणपाळ - शुक्रवार, 21 जून 2013 - 10:40 AM IST
सुधीर काळे जी, स्व-नावाने लेख लिह्ल्यामुळे
किंवा टोपणनावाने प्रतिक्रिया लिह्ल्यामुळे असा काय फरक पडतो? फक्त आपण
आपले विचार लोकांपर्यंत पोहचवू शकतो का व आपला लेख/प्रतिक्रिया लिहण्यात
"originality" किती हा कळीचा मुद्दा. मुशारफ जितका धूर्त आणि दुटप्पी
हुकुमशहा तद्वत मोदी आणि "विकास पुरुष" हा त्यांचा "मुखवटा". कोणत्याही
हत्येचे समर्थन निंदनीय परंतु आपण मोदीना पाठींबा देऊन व त्यांच्या
राज्यवटितील गोधरा हत्याकांडाचे समर्थन करून एवढ्या लवकर आपल्या
पत्रकारितेची हाराकारी स्वीकारलीत. तसेच आपले बहुतेक लेखन अनुवादित (व
पाकिस्थानाव्रच) असल्यामुळे अनुवादित लेखक म्हणून अनुवादाच्या त्रीज्येत
स्वतः किती दिवस गोल-गोल (व पाकिस्थानावरच) फिरणार व लोकांनापण त्यात
फिरवणार?
====================
====================
anita - बुधवार, 19 जून 2013 - 06:02 PM IST
To Indian ,
Are you joking? Have you heard the expression, "The buck stops here"?.
There was enormous evidence against the Modi government and they did
everything to divert the attention, or discipline the people who were
going to be the whistle-blowers.
Even International Neutral organizations have found human rights abuses
and that's why modi became known to the entire world.
Both the Cogress and the BJP have committed such crimes and people
should get justice. That's all. Even some professors from reputed
American universities have sent letters to the American government about
the Modi government and how they acted.
siddhesh - शनिवार, 15 जून 2013 - 02:55 PM IST
सुधीर काळे जीने बिन साबून के धो डाला..........
====================
मुन्नाभाई - गुरुवार, 13 जून 2013 - 12:25 PM IST
मी मोजल्या. ७५ पैकी २५ लेखकाच्या आहेत!
====================
ठणठणपाळ - गुरुवार, 13 जून 2013 - 09:43 AM IST
@विवेक तारे - सगळ्या प्रतिक्रीया वाचून
आपल्याला वाईट वाटने साहजिकच आहे कारण ह्या लेखावरील ज्या प्रतिक्रिया आपण
वाचल्या त्यातील सुमारे ६०-७०% प्रतिक्रिया लेखकाच्याच होत्या.
====================
विवेक तारे - सोमवार, 10 जून 2013 - 11:10 PM IST
सगळ्या प्रतिक्रीया वाचून वाईट वाटल .
सकाळच्या वाचकांमध्ये लेख वाचण्याची आणी तो समजून घेण्याचीही परिपक्वता
निर्माण झाली नसेल तर सकाळ नी पत्रकारिताच बंद करावी
Sudhir Kale - शुक्रवार, 7 जून 2013 - 09:06 AM IST
ठणठणपाळ-जी, हा माझा लेख अनुवादित नसून
स्वतंत्र लेख आहे! व मी माझे सारे लेख माझ्या खर्या नावाने लिहितो,
टोपणनावाने नाहीं. मला ज्या विषयात स्वारस्य वाटते त्या विषयावर मी लिहितो.
आपल्या भ्रष्ट राजकारणी लोकांविरुद्धही मी लिहिले आहे उदा. अण्णा हजारे
यांच्यावरचे माझे दोन स्वतंत्र लेख! आता संजय दत्तवर एक स्वतंत्र लेख मी
लिहीत आहे. पण मला ज्यात स्वारस्य वाटत नाहीं असे कांहीं विषय मी
आपल्यासारख्या इतर वाचकांसाठी सोडून देतो. त्यावर इतरांनी (आपणही) लिहावे
अशी माझी अपेक्षा आहे.
====================
ठणठणपाळ - शुक्रवार, 7 जून 2013 - 01:19 AM IST
@सुधीर काळे- आपण अनीताताईना जो सल्ला दिलात
तसाच आपण अनुवादित लेख न लिहिता,स्वबळावर, स्व-बुद्धी चातुर्याने "कारगिल"
युद्धावर लेख लिहा.उगाच धूर्त, दुटप्पी असे लिहून मुशर्रफला शिव्या
देण्यापेक्षा भारतीय नपुसक राजकारण्यावर"original" लेख लिहा,आपल्या"मूळ"
लेखात कारगिल युद्धातील खऱ्या गोष्टी लिहा.उदा. बिल क्लिंटन यांनी नवाज
शरीफना भेटण्याची परवानगी नाकारून १५ जून १९९९ला नवाज शरीफना फोन करून
प्रथम कारगिल मधून सैन्य माघे घेण्यास सांगितले व सैन्य मागे घेतल्यावरच
बोलू असे खडसावले.मग पाकीस्थानने जुलै ११ पासून सैन्य माघे घेण्यास सुरवात
केली.वाजपेयींनि मग जुलै १४ ला "विजय दिन" जाहीर केला.आता "विजय दिन" बिल
क्लिंटनमुळे साध्य झाला असे न लिहिता व वाजपेयींचे पण नाव न लिहता आपण
कारगिल "विजय दिन" यावर लेख लिहा,पण कृपया अनुवादित नको.वाटल्यास अनीताताई
आपल्या ह्या "मूळ" लेखाचा अनुवाद करतील.या लेखात युद्धातील POW,वायुसेना
मेडल विजेते विंग-कमांडर नचिकेत,मुडके छाटून विटंबना केलेले Sqn Ldrअजय
अहुजा,११ मैल शत्रू आत येवून झोपलेली RAW -वाजपेयी, आपल्या सैन्याची
मर्दमुकीवर लिहा
====================
सुधीर Kale - गुरुवार, 6 जून 2013 - 01:48 PM IST
इंडियनसाहेब, धन्यवाद. तुम्ही माझे काम खरंच
सोपे केलेत. शेजारी राज्यांनी मदत न दिल्याची माहिती माझ्या वाचनात आलेली
नव्हती! अनीताताई, माझे मत इंडियनसाहेबांशी तंतोतंत मिळते-जुळते आहे. तरीही
मी आपल्याला विनंती करतो कीं आपण नरेंद्रभाईंवर एक झणझणीत लेख जरूर
लिहावाच. लेख जास्त "स्वीकारार्ह" करण्यासाठी त्यात गोध्रा हत्याकांडाचा
अजीबात उल्लेख करू नका. तसेच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखधर्मियांवर
झालेल्या अत्याचारांबद्दलही एक झणझणीत लेख लिहा. हा लेखही जास्त
"स्वीकारार्ह" करण्यासाठी त्या दंगलीत शीखधर्मियांचे जीव वाचविण्यात राजीव
गांधी कसे कमी पडले याचा उल्लेख मात्र करू नका! नसती कटकट नको!! आपले
लेखनकौशल्य छान आहे. काळजी नसावी. मला आपले हे दोन्ही लेख वाचायला मनापासून
आवडेल. तरी लिहाच!
====================
Indian - गुरुवार, 6 जून 2013 - 05:07 AM IST
@anita, @Sudhir Kale:
Let me provide some analysis:
1. If your brother (or someone close to you) is involved in a criminal act, can you be held
responsible? Let alone the so called people belonging to ur party.
2. The Supreme Court appointed Special Investigation Team (SIT) on the riots has exonerated
Modi of all charges.
3. There have been 249 convictions in 19 cases as of August 2012. This includes 184 Hindus
and 65 Muslims. In which other case have we seen such convictions?
4. Modi requested 3 neighbouring states of MP, Rajasthan and Maharashtra for sending
their police to help curb the situation. All of them refused to help. Why?
5. Indian police (not just in Gujarat) is highly incompetent. Here, it was outnumbered too. If
policemen see see a very huge angry mob how many will risk their life? Should Modi himself
have gone with AK-56 to curb violence?
Think calmly about all this and decide.
====================
anita - बुधवार, 5 जून 2013 - 05:34 PM IST
@सुधीर काळे
Your Logic is astonishing. You are suggesting that there is no proof
that Modi was involved? The proof is everywhere. Nearly every foregion
government knows about it. Every politician and common man in Gujrat
knows about it. There are youtube videos of his associates explaining
how they did it. They were comparing themselves to Rana Pratap. For 3-4
days, they were given full permission to kill. Police didn't even go to
help these poor victims. In fact, they were guiding or directing the
crowds to certain areas.
Let's assume that what you are saying is true, then how many serious
independent investigations have you seen? Have you ever seen his
associates recorded under oath? What about Cops?
This is a very serious topic....
====================
सुधीर काळे - बुधवार, 5 जून 2013 - 10:34 AM IST
अमोल-जी, माझी स्मरणशक्ती बरी आहे असे
दिसते. भुत्तो ७३ साली लोकप्रियतेच्या शिखरावर होते व त्यांनी नॅशनल
असेंब्लीमध्ये ७४ टक्के जागा मिळविल्या. पण ७७ साली त्यांची लोकप्रियता खूप
ढासळली होती. पण त्यांच्या अनुयायांनी लांडी-लबाडी करून मतपेट्या आपल्या
मतपत्रिकांनी भरल्या. पण त्यांनी इतका अतिउत्साह दाखविला कीं त्यांनी लबाडी
केली हे उघड झाले व त्यातून पुढे प्रचंड दंगल उसळली. ती भुत्तोंना
पोलिसांकडून आवरली गेली नाहीं म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या कित्येक शहरात
मार्शल लॉ घोषित केला व त्यातूनच पुढे "कुदेता" झाला व झिया सर्वेसर्वा
बनले. तुमचा ई-मेल आयडी माझ्याकडे असल्यामुळे मी त्या पत्त्यावर
’न्यूक्लियर डिसेप्शन’ पुस्तकाची याबद्दल माहिती असलेली चार पृष्ठे
तुम्हाला पाठविली आहेत ती जरूर वाचावीत.
http://en.wikipedia.org/wiki/Muhammad_Zia-ul-Haq या दुव्यावरसुद्धा अशीच
माहिती आहे.
====================
ठणठणपाळ - बुधवार, 5 जून 2013 - 10:05 AM IST
जनरल मुशरफ सारख्या पाकिस्थानी राजकारणी
लोकांचा धूर्त, कपटी पणा कर्नल हुसेन यांनी आपल्या 'Witness to Blunder' या
पुस्तकात नमूद केला आहे तो असा कि - जन मुशर्रफ यांनी मार्च २८, १९९९ रोजी
LOC क्रॉस करून भारतीय हद्दीची पाहणी करण्यासाठी ११ किलोमीटर आत येउन
भारतीय हद्दीत एक रात्र राहिले व तेही कारगिल युद्ध सुरु व्हावयाच्या अगोदर
सुमारे २ महिने.आता त्याच्या विरुद्ध आपल्या राजकरणी लोकांचा अति उदारपणा
(कि भोंगळपणा?) असा.१ -कारगिल युद्धाच्या काही महिने अगोदर वाजपेयी नवाज
शरीफना "सदभावना" यात्रा म्हणून बसने/मोटारीने भेटायला गेले होते २ - १९६१
साली पंडीत नेहरू पंचशील म्हणून कबुतरे उडविण्यात व हिंदी चीनी भाई-भाई
म्हणवून घेण्यात दंग होते व चीनी फौजांनी "तेजपूर" पर्यंत धडक मारली
होती.३-आता आजची बातमी- पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ घातलेले
नवाझ शरीफ यांना पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारतभेटीचे निमंत्रण दिले..अशा
धूर्त कपटी सापांना उदार मनाने किती वर्षे आपले राजकरणी दुध पाजत राहणार?
====================
Sudhir Kale - बुधवार, 5 जून 2013 - 01:54 AM IST
I stand by my reply to Mr Chaitanya
Sawale's response. No doubt what happened in Gujarat (Godhra included),
Delhi, Mumbai was wrong and unjustifiable. But there is no evidence
against Modi. I always marvel at Modi's ability to lead his state even
though, unlike Rajiv Gandhi, he has been constantly persecuted! Still he
found time and enegy to lead his State to progress! I am sure he will
lead India with similar gusto and enthusiasm. The people who
hate/criticise Modi should write about him! Why ask me to write negative
articles about a person with such a positive attitude? As an ardent
admirer of Modi, how can I write a negative article about him? If Ms
Anita hates his gits, it is she who should write articles about Modi,
not me!
====================
anita - मंगळवार, 4 जून 2013 - 05:24 PM IST
@जिग्नेश,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. इकडे सगळा देश पेटला आहे आणि ह्या लोकांना असे
विषय मिळतात. जिन्ना चोर होते का डाकू? मुशाराफ्फ यांना लबाड म्हणायचे का
धूर्त ?
इथे आपले लोक आपल्याच लोकांना ठार मारतात आणि त्याची ह्यांना काहीही पडलेली
नसते. आश्चर्यकारक logic and ethical sense. And the horrible rationale
is: He improved Gujraat and therefore, we should forgive him for killing
2000+ innocent Indian citizens......:). Unbelievable.
====================
वाचक - सोमवार, 3 जून 2013 - 11:49 AM IST
@सुधीर काळे. तुमचे सामान्य ज्ञान आणि वाचन
उत्तम आहे. लेख सुद्धा छान लिहिता. पण एक चूक कायम करता, वाचकांच्या
प्रतिक्रियेवर react करण्याची. Never react on any responses. नाहीतर
तुमच्यात आणि वाचकांमध्ये काही फरक नाही. अवघड आहे पण जमेल.
sudhir kale - रविवार, 2 जून 2013 - 10:49 AM IST
Welcome back, Mr Jignesh! Since a long
time, I have missed your 'expert' but oblique comments! Now I feel at
home!!
====================
जिग्नेश - रविवार, 2 जून 2013 - 02:23 AM IST
अहो अनिता बाई, काळे साहेब यांचा वाचक
गांधीजीनी देशाची फाळणी केली आणि नेहरू आणि कॉंग्रेसने देशाची वाट लावली
असा सरळ धोपट आहे. आणि ते स्वत कॉंग्रेस येत्या निवडणुकीत बुडावी म्हणून
देव पाण्यात घालून बसले आहेत. पण पाकिस्तानबद्दल लेख लिहून ते काय साध्य
करीत आहेत हे समजत नाही. मी एक साधा सामान्य लेखक आहे असे म्हणतात पण पाणी
खोल आहे. सकाळ प्रतिक्रिया छापा.
====================
Sudhir Kale - शनिवार, 1 जून 2013 - 01:52 PM IST
Dear Mr Ghonchu,
I take note of your suggestion particularly after checking the
Merriam-Webster dictionary which defines backstabbing as "betrayal (as
by a verbal attack against one not present) especially by a false
friend". Aptly fits Zia Ul Haq whom Bhutto Sr promoted over the heads of
seven more senior generals than Zia himself!
====================
ghonchu - शनिवार, 1 जून 2013 - 12:00 PM IST
Dear Sudhirji,
With due respect, I would like to bring to your notice the phrase "
stab him in the back" instead you may use "back stabbed" which feels
queen's english
Regards
Sudhir Kale - बुधवार, 29 मे 2013 - 10:48 PM IST
Lt Gen Shahid Aziz who was a senior
officer in ISI at the time of Kargil misadventure has, in his expose on
Kargil war has also talked glibly saying Nawaz was probably not given
full info about this. According to me, an APPROVAL should have been
obtained from Nawaz before starting the war, but it seems he wasn't even
told what should have been told to him as a PM. Now you can believe
what you wish to believe! Nawaz has now planned to set up an enquiry
commission & hopefully it would put more light on this aspect!
====================
====================
Sanjay - बुधवार, 29 मे 2013 - 05:25 PM IST
@सुधीर काळे
मला आश्चर्य वाटते कि तुमचा शरीफ यांच्या थापांवर विश्वास बसला. Do you
know how Army protocols work? Do you know how many American and Russian
satellites monitor these areas? Do you know that Americans, Chinese,
Russia and and many other countries are constantly exchanging the
information?
The moment they crossed the LOC, and when Indian government knew, Sharif
had to know it unless he was living in a bubble. CIA was constantly
monitoring the situation and must have told both the Indians and
Pakistanis about what was going on. They even had captured the Nuclear
weapons movement . Therefore, just by believing in Mr. Najim Sethi is
not enough.
====================
====================
Sudhir Kale - बुधवार, 29 मे 2013 - 04:17 AM IST
Anita madam, I seriously believe that it
is not easy to imagine where LoC exactly is in an area which is hardly
populated. But Nawaz should have asked asked Mush to show LoC on that
map. He put his trust in actions of Mush whom he himself had promoted.
He was surely wrong there.
Ajay-ji, pl read comment of Mr Chaitanya Sawale and my response to it.
But let us stay on Mush, not digress to Modi.
====================
====================
Ajay - मंगळवार, 28 मे 2013 - 06:05 PM IST
@सुधीर काळे
ज्या भारतीय राजकारणी माणसाने २००० पेक्षा जास्त भारतीयांना मारले, तो तुम्हाला धूर्त आणि गुन्हेगार वाटत नाही.
मी थक्क झालो आहे......
====================
====================
Anita - मंगळवार, 28 मे 2013 - 05:59 PM IST
@सुधीर काळे
सुधीर जी, तुम्हाला खरेच असे वाटते कि पाकिस्तानच्या पंतप्रधानाला Line of control कुठे आहे ते माहिती नव्हते ? Are you serious?
====================
====================
सुधीर काळे - मंगळवार, 28 मे 2013 - 07:24 AM IST
पवन-जी, धन्यवाद! मी तो तीन भागातला
व्हीडियो पाहिलेला आहे! त्यावरूनच नवाज शरीफना नीट माहिती दिली गेली नव्हती
असे माझे मत झाले. जो नकाशा त्यांना दाखविण्यात आला त्यात Line of Control
च दाखविली नव्हती असे त्यात सांगितलेले आहे!
====================
====================
सुधीर काळे - सोमवार, 27 मे 2013 - 07:52 PM IST
पवन-जी, धन्यवाद! मी तो तीन भागातला
व्हीडियो पाहिलेला आहे! त्यावरूनच नवाज शरीफना नीट माहिती दिली गेली नव्हती
असे माझे मत झाले. जो नकाशा त्यांना दाखविण्यात आला त्यात Line of Control
च दाखविली नव्हती असे त्यात सांगितलेले आहे!
====================
====================
Pawan (Pune) - सोमवार, 27 मे 2013 - 06:47 PM IST
युट्युब वर जाऊन एकदा नजम सेठी ह्यांचा
कारगिल युद्धावरील व्हिडीओ बघाच. नजम सेठी हे पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार
आणि पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार आहेत. कारगिल
युद्धाच्या वेळेस पाकिस्तानने काय चुका केल्या आणि त्यात मुशर्रफ ह्यांची
काय भूमिका होती हे जाणून घ्या.
व्हिडीओ साठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=3QPeUX3_qfM
====================
====================
Sudhir Kale - रविवार, 26 मे 2013 - 06:31 AM IST
Thank you for your appreciation, AJ-saheb.
I will try to locate the book you have recommended & read it!
====================
====================
AJ - शनिवार, 25 मे 2013 - 11:27 PM IST
Thank you for a great article. The
following book is the most exhaustive account of Pakistan's recent
history - all Indians should read it. Ghost Wars - The secret history of
the CIA, Afghanistan and bin Laden. From Soviet Invasion to 9/11. By
Steve Coll. It is simply amazing how Pakistan has controlled the US
agenda in India's backyard for the last 40 years. India has proved that
it will never learn..
====================
====================
Sudhir Kale - गुरुवार, 23 मे 2013 - 08:17 PM IST
Dear Mr Chaitanya Sawale, thanks for your
comment. No doubt what happened in Gujarat, Delhi, Mumbai was wrong and
unjustifiable. But till now, in spite of constant persecution, nobody
has found any evidence against Modi. I always wonder to what lofty
heights Modi would have taken Gujarat if he has not been so constantly
persecuted! And with so much of non-stop persecution, how could he find
time and peace of mind to lead his State to so much of progress! I feel
he will lead India with similar skills to great progress!
====================
====================
चैतन्य Sawale - गुरुवार, 23 मे 2013 - 05:59 PM IST
अहो अनिता बाई
२००२ चे मोदी काय आणि १९८३ चे राजीव गांधी काय
, ९२ च्या दंगलीतले अल्पसंखाक धर्मांध ,९३ च्या दंगलीतले शिव्सैनिल्क
ह्यांनी पण हेच केले आहे आणि पाकिस्तान मध्ये पण हेच सर्व हिंदून वर होत
आहे.
पण लेखाचा विषय काय आणि तुमची प्रतिकिया काय आहे. जरा वाचत जा मग पत्र
लिहिण्याचे काम करा.
====================
====================
Anita - गुरुवार, 23 मे 2013 - 05:33 PM IST
@सुधीर काळे
अहो काळे जी, उगाच पाकिस्तानच्या मूर्ख लोकांवर लेख लिहिण्यापेक्षा आपलेच
राजकारणी किती नालायक आहेत ते लोकांना समजाऊन सांगा. ज्या नरेंद्र मोदीने
२००० + लोकांची कत्तल करवून आणली त्याला तुम्ही मागच्या एका लेखात आशेचा
किरण म्हटले होते. लहान मुलांना आगीत टाकणे, बायकांवर सामुहिक बलत्कार करून
मारणे, पेट्रोल प्यायला लावून लोकांना जाळणे हि कामे त्याच्या लोकांनी
३-४ दिवस केली....आणि आता त्याचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले जात आहे.
सांगण्याचा मुद्दा हा, कि जरा आपल्या घरात काय चालू आहे ते बघा.......
====================
====================
सुधीर काळे - मंगळवार, 21 मे 2013 - 03:33 AM IST
अमोल-जी, माझ्या आठवणीनुसार माझे विधान
’न्यूक्लियर डिसेप्शन’मधील माहितीनुसार बरोबर आहे पण सध्या मी प्रवासात आहे
व १ जूनला जकार्ताला पोचेन व त्या पुस्तकातील संदर्भ पाहून जास्त सविस्तर
उत्तर देईन. तरी तोपर्यंत थांबावे.
भुत्तो नक्कीच लोकप्रिय नेते होते व म्हणूनच त्यांच्या खटल्याच्या वेळी
किंवा त्यांना फासावर चढविल्यावर त्यांचे अनुयायी लाखोंनी कसे रस्त्यावर
आले नाहींत याचे मला आश्चर्य वाटत आलेले आहे.
====================
====================
अमोल - सोमवार, 20 मे 2013 - 06:32 AM IST
काळे सर, झुल्फिकार आली भुत्तो नी स्वतः
लष्कर शाही आणली? मला थोडेशे चुकीचे वाटते, उदाहरण द्यायचे झाले तर नजम
सेठी नी ह्यावर आपस कि बात मध्ये खूप छान विश्लेषण केले आहे. १९७१ च्या
युद्ध्यानंतर झुल्फिकार आली भुत्तो नी त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली
आहे. त्यांची भाषणे आणि त्या संदर्भातील इतर पुस्तक ही ह्या वाक्याला
अनुकूल माहिती देत नाहीत. लोक म्हणतात कि भुत्तो एवढा लोकप्रिय नेता आज
पर्यंत पाकिस्तानात झाला नाही. १९६५ किंवा १९७१ युद्धातील त्यांची भूमिका,
किंवा आम्ही गवत खावू पण अणुबॉम्ब बनवू हे सगळे असून हि लोकप्रियतेत east
पाकिस्तान मध्ये आजपर्यंत झुल्फिकार आली भुत्तो सारखा दुसरा नेता झाला
नाही. २०१३ च्या निवडणुकीत सगळीकडे पराभूत झालेली PPP सिंध provincial
असेम्ब्ली मध्ये बहुमतात आहे. कुणी योग्यच म्हणाले सिंध प्रांताला भुत्तो
च्या बलिदाना तून बाहेर पडायला अजून २ पिढ्या तरी लागतील. भुत्तो कल भी
जिंदा था, भुत्तो आज भी जिंदा है.
====================
====================
सुधीर काळे - रविवार, 19 मे 2013 - 01:24 AM IST
मोहन-जी, ३: मुशर्रफ यांचे In the line of
fire हे पुस्तक मी वाचले आहे. प्रचारी थाटाच्या या पुस्तकातली इंग्लिश भाषा
अतीशय सुंदर आहे. ते मुशर्रफनी स्वत: लिहिले आहे कीं त्यांनी कुणी ghost
writer वापरला आहे ते आठवत नाहीं. मुशर्रफ यांचे इंग्लिश भाषेवरचे प्रभुत्व
त्यांच्या अनेक भाषणांत जाणविलेले आहे. (आपल्या लष्करी अधिकार्यांचेही
इंग्लिश छान असते.) पण त्यातली आकडेवारी खरी आहे कीं नाहीं ते मला माहीत
नाहीं. पण बर्याच लोकांनी त्याची fiction म्हणून संभावना केलेली आहे!
पाकिस्तानी वृत्तपत्रांचा नियमित वाचक या नात्याने मी पाहिले आहे कीं
इंग्लिश येणार्याा शहरी लोकांचे प्रतिसाद पहाता ५० टक्के लोकांना ते
"तारणहार" मानतात तर उरलेले लोक त्यांना थापेबाज! पण त्यांच्या स्वागताला
जे १०००-१५०० लोकांचा किरकोळ जमाव जमला होता त्यावरून त्यांना कुणी फारसे
मानत नसावेत. सध्या मुलकी सरकार असूनही त्यांच्या समर्थनार्थ आतापर्यंत तरी
जनता उभी राहिलेली नाहीं! "न्यूक्लियर डिसेप्शन"चे भाषांतर करताना मुशर्रफ
यांचे अनेक "गुण" मला जाणविले आहेत. त्यावरून ते विश्वासघातकी नेतेच
वाटतात end
====================
====================
सुधीर काळे - शुक्रवार, 17 मे 2013 - 11:43 PM IST
मोहन-जी, (भाग-२) थोरल्या भुत्तोंनी
निवडणुकीत लांडी-लबाडी केली, खोट्या मतपत्रिकांनी मतपेट्या भरल्या या
मुद्द्यावरून त्यांच्याविरुद्ध इतकी तीव्र निदर्शने झाली. इतका हिंसाचार
झाला कीं तो भुत्तोंना आवरता आला नाहीं व त्यांनी मार्शल लॉ पुकारून
लष्कराकडे सत्ता दिली. झिया उल हक यांनी मग सत्ता तर सोडली नाहींच पण
भुत्तोंना फासावर लटकाविले. त्याविरुद्धही लोकक्षोभ झाला नाहीं. हा भाग
न्यूक्लियर डिसेप्शनमध्ये आलेला आहे! त्या आधी अयूबखान हेही मार्शल लॉ
ऍडमिनिस्ट्रेटरचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. पण आता पाकिस्तानात लोकशाहीचे
वारे जोरात वाहू लागले आहेत. एका लोकशाही सरकारच्या जागी दुसरे लोकशाही
सरकार थेट येण्याची ही पहिलीच वेळ आहे.लोकांना लष्करशाही नको झाली असावी
असाच रागरंग मला वाटतो! म्हणूनच तालीबानच्या धमक्यांना न घाबरता खूप मोठ्या
प्रमाणावर, आपल्याहून जास्त, मतदान झाले. पण यावेळी PPP सारख्या
उदारमतवादी, कांहींशा निधर्मी राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर प्राणघातक
हल्ले झाले त्यामुळे ही निवडणूक किती free-and-fair झाली याबाबत
प्रश्नचिन्ह आहेच. (भाग-३)
====================
====================
सुधीर काळे - शुक्रवार, 17 मे 2013 - 11:42 PM IST
मोहन-जी, लोकशाही राज्यपद्धतीच्या यशात
राजकीय-सामाजिक नेत्यांची मोठी जबाबदारी असते. म्हणूनच आपण भारतीय आपल्या
लोकशाहीच्या यशाचे श्रेय नेहरू-पटेल यांच्यासारख्या नेत्यांना देतो. याबाबत
एक बातमी मी वाचली होती. मुरारजी देसाई अयुब खानांच्या कारकीर्दीत
पाकिस्तानला गेले असताना त्यांनी पाकिस्तानातल्या एका मंत्र्याशी बोलताना
तिथल्या लष्करशाहीबद्दल चिंता व्यक्त केली. असे म्हणतात त्यावेळी
पाकिस्तानी मंत्री म्हणाले होते की "आज आम्ही जात्यात आहोत तर तुम्हीही
सुपात आहात." त्यावर मुरारजी म्हणाले होते कीं असे झाले तर मी गोळ्या
झेलायला सर्वात पुढे असेन. अशा नेत्यांमुळे आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे
दृढ झाली. आणीबाणी घोषित केल्यावर आपल्याकडे अनेक चळवळी झाल्या.
वृत्तपत्रांवर नियंत्रण असल्यामुळे त्या कुणाला फारशा कळल्या नाहीत पण त्या
झाल्या. बडोदा डायनामाईट केसमध्ये जॉर्ज फर्नांडिससारखे बरेच मोठे नेते
तुरुंगात गेले. असे नेतृत्व पाकिस्तानात ना तेंव्हा होते ना आज आहे.
आजसुद्धा राजकीय नेत्यांविरुद्ध पाकिस्तानात बंडाळी होते, पण लष्कराविरुद्ध
कधीच नाही! (भाग-२)
====================
====================
Mohan - शुक्रवार, 17 मे 2013 - 05:43 PM IST
@सुधीर काळे
Situation of the Pakistani people is very different from India. They can
get killed easily if they protest against any political party or
against groups like Taliban. Therefore, the "Armchair Theorization" of
comparing and equating the political situation in India and Pakistan is
meaningless.
Also, have you read Mushraff's book? Do you know what his side of the
story was? Did you find it necessary to read what he had to say?.
====================
====================
सुनील-जी, आपला प्रतिसाद आजच वाचला.
क्षमस्व! "उसेन बोल्ट हा जमेकाचा 100 आणि 200 मीटर शर्यतीती सुवर्णपद
विजेता व नवे विश्वविक्रम प्रस्थापित करणारा धावपटू" हे वाक्य 'त्या'
ट्वीटध्ये उसेन बोल्टचे नाव असल्यामुळे व कांहींना "हा कोण उसेन बोल्ट" असा
प्रश्न पडेल असे वाटल्याने लिहिले आहे. त्या ट्वीटमध्ये लिहिलेले आहे "All
that exercise paid off. Musharraf ran out of the courtroom as fast as
Usain Bolt."
====================
Mala-ji, Part-2: One must remember that
relative power equation between the army and the civilian govt has
always been against the latter. Army wields far power than what civilian
government can wield. Zia, who was promoted by Bhutto, stabbed him in
the back and hanged him. Unlike in India, Pakistani people keep quiet
when such atrocities are committed by Army! Mush put Sharif in jail and
gave him third degree treatment, but Mush is under 'house arrest' in थे
comfort of his own palatial farmhouse, not in prison. These are ground
realities! Therefore "Armchair theorization" is meaningless.
====================
====================
Sudhir Kale (Part 1 of 2 parts) - गुरुवार, 16 मे 2013 - 03:22 AM IST
Mala-ji, Part-1: I just saw the video link
यौ sent. At 5' 45" the person (I don't know who) clearly says that
Nawaz didn't know everything that was happening in his country. In
Nuclear Deception also there is an incident describing how Benazir
didn't know what was happening in her own country. So Army bulldozing
civilian government is not new. But I wonder if you saw Najam Sethi
interview wherein he gives finer details to the names of cabinet members
and army top brass who attended that fateful meeting where Sharif was
taken for a ride, how LOC was not shown on the maps presented and how
all facts came out on their return trip. We shouldn't forget that it was
Sharif who had promoted Musharraf, so he might not have thought that
Mush would stab him in the back & believed in what Mush was telling.
His only mistake was that he didn't dismiss Mush on his return from
USA, but it is possible that he was 'instructed' not to fire Mush by
Clinton. (Part-2)
====================
====================
Sudhir Kale - गुरुवार, 16 मे 2013 - 02:06 AM IST
Mala-ji, let me listen to what Clinton
boys said & then revert, but have you listened to Najam Sethi's
interviews? Pl do listen to all the three parts. BTW, Najam Sethi is
presently transitional Chief Minister of Punjab till the newly-elected
MLAs/MPAs elect a new CM and he takes over.
====================
====================
Mala - बुधवार, 15 मे 2013 - 04:57 PM IST
@सुधीर काळे
The entire story by Mr. Nawaz Shariff is not believed by the anyone in
the Clinton administration. Clinton openly said, that if he didn't know
about the nuclear weapon movement near the border, he was the greatest
actor he had seen. From Clinton's talk, it was clear in the meeting that
Shariff was essentially not telling the truth. Finally, Clinton forced
him to take the army back. The entire discussion by President Clinton
and the admin. officials is available:
http://www.youtube.com/watch?v=2CQbxi8T1Cc
====================
====================
Sudhir Kale (Part-3 of 3 parts) - बुधवार, 15 मे 2013 - 06:46 AM IST
Actually the real break came when the
taped conversation between Gen. Musharraf and Lt Gen Muhammad Aziz (not
Shahid Aziz, the recent whistleblower) was made public and everybody
knew that the aggression was not by mujahideen but Pakistany regular
army!
Shahid Aziz, who acted like a whistleblower on Kargil war wrote that he
was personally not aware of what information had been shared with then
prime minister Nawaz Sharif, but he felt that Mr Sharif “was not fully
in the picture”. Shahid Aziz, however, recalls a general (unspecified)
telling him that Nawaz Sharif asked “when are you giving us Kashmir?”
during an informal discussion. This suggests, says Gen Aziz, that Mr
Sharif was not completely in the dark. Quite an oblique way to quote a
hearsay piece from an informal meeting to evade the issue!
So that is the full story of coup and Sharif's not being told of Kargil!
====================
====================
Sudhir Kale (Part-२ of 3 parts) - बुधवार, 15 मे 2013 - 06:08 AM IST
Nawabshah is a couple of hundred
kilometers from Karachi. By then Army took control of Control Tower at
Karachi airport and the rest is history! (Pl see
http://en.wikipedia.org/wiki/Nawabshah for location of Nawabshah).
In a well-respected journalist Najam Sethi's interview with Muneeb
Farooq on Zem TV (http://www.youtube.com/watch?v=qs9TS_ddeEg), you can
hear yourself (at 9 min 50 seconds of Part-1) that the misadventure was
launched in January 1999 without anybody (including Sharif) knowing. The
Indian Press broke the story in May. Till then nobody knew on Indian
side as well as on Pakistani side. You can see how he was misled even
during the "briefing" of the joint meeting of Nawaz Sharif, his many
cabinet ministers with the Corps commanders. On the way back he
understood that Pakistan had incroached 10 km inside Indian territory.
(in early part of Part-2 http://www.youtube.com/watch?v=V6QFHb5PRVQ)
====================
====================
Sudhir Kale (Part-1 of 3 parts) - बुधवार, 15 मे 2013 - 06:06 AM IST
Mala-madam, there is no doubt that Sharif
played a heavy (and silly) hand in Musharraf saga. But there are more
than one stories about the roo1t cause of the coup d'etat. (pl see the
link http://en.wikipedia.org/wiki/1999_Pakistani_coup_d%27%C3%A9tat for
details) Actually the problem started when Sharif dismissed Musharraf as
COAS while Musharraf was in Sri Lanka and appointed then ISI chief
Ziauddin Butt to that post. Soon Sharif realized that the top brass of
Pakistani Army was not obeying Ziauddin. So selecting him was an error
of judgement of Sharif. When Musharraf came to know of this development,
he cut short his visit to Sri Lanka and boarded a PIA plane. Then he
was looking for an excuse to stage the coup. By making a silly mistake
of refusing the landing permission, Sharif gave Musharraf that excuse.
When he realized that Ziauddin was not able to control the Army and the
situation became tense, permission to land at Nawabshah airport. (See Pasrt-2)
====================
====================
Mala - मंगळवार, 14 मे 2013 - 06:26 PM IST
@Sudhir kale
You haven't mentioned why Musharaff took over the power in the first
place. The article is very non-linear. When Musharaff's helicopter was
not allowed to land by Nawaj Sharif, the helicopter was running out of
fuel and his life was in danger. Somehow Mushraff managed to land and
then taught Sharif a lesson by grabbing the power. (Similar to what
Indira Gandhi did)
Also, it is not true that Sharif didn't know about the Kargil details.
Shariff was so concerned about the war results, he requested Clinton to
intervene. Even Clinton didn't believe his story that Shariff didn't
know anything about the movement of the nuclear weapons.
All these issues including Kashmir are created by the British, and we
are all paying a heavy price for it. Even we have corrupt leaders like
Modi who have killed thousands of innocent Indian citizens. (And
Congress, who killed innocent Sikhs in 1984)
====================
====================
सुनील - मंगळवार, 14 मे 2013 - 02:18 PM IST
काळे साहेबाना "पाकिस्तान" बाधा झाली आहे.
====================
====================
सुधीर काळे - सोमवार, 13 मे 2013 - 10:34 PM IST
राहुल-जी, मलाही हे पटते! "चट मंगनी, पट ब्याह" या तत्वावरच मुशर्रफसाहेबांचा 'निकाल' लावायला हवा!!
====================
====================
राहुल - सोमवार, 13 मे 2013 - 08:59 PM IST
सुधीर काळे साहेब अपेक्षेप्रमाणे नवाझ
जिंकून आलेत... त्यांनी आता कारगिलच्या ह्या "खलनायका"चा सद्दाम हुसेन,
गडाफी यांच्याप्रमाणे ताबडतोब 'निकाल' लावावा म्हणजे बरे!! धूर्त, कावेबाज,
दुटप्पी हि विशेषणे त्याला योग्यच आहेत.. आग्रा शिखर परिषदेत वाजपेयींनी
ह्याला खिंडीत गाठून चांगला रडकुंडीला आणला होता, पण भाजपच्या 'तोंडाळ'
नेत्यांमुळे ह्याला आयती नामी संधी मिळाली आणि हा ताबडतोब पाय लावून
पळाला... ("काश्मीरसहित सभी मुद्दोपर चर्चा हो राही ही और.. उसपर संयुक्त
निवेदन जारी किया जायेगा..." हे वाक्य शिखर बैठक चालू असतांना मीडियासमोर
बोलायची काहीच गरज नव्हती पण.. मूर्खपणा आणि अतिउत्साह!!!!!!!!!! बिचाऱ्या
वाजपेयींनी मेहेनतीने कमावलं आणि भाजप नेत्यांनी तोंडाने घालवलं)... असो
आता अशा नापाक पाकिस्तानींना चांगला धडा शिकवून सुतासारखे सरळ केले
पाहिजे..
====================
====================
सुधीर काळे, जकार्ता - सोमवार, 13 मे 2013 - 11:26 AM IST
सत्यभाऊ, "पैलतीर"वरील माझ्या नियमित
वाचकांना माहीत आहे कीं मी जर एकाद्या लेखाचे भाषांतर केलेले असेल तर मूळ
लेखकाची मी परवानगी घेतो, त्याचे नांव तर देतोच, पण त्या मूळ लेखाचा
दुवाही मी न विसरता देतो.
हा लेख संपूर्णपणे माझा स्वतंत्र लेख असून त्याबद्दलची माहिती मी अनेक
ठिकाणांहून मिळविलेली आहे व मग तिचे संकलन केलेले आहे. त्यातील बरीचशी मते
आणि निष्कर्षही माझे स्वत:चे आहेत.
====================
====================
Satyabhau - रविवार, 12 मे 2013 - 06:27 PM IST
Hindi tun marathit kelele samarth bhashanter...
====================
====================
सुधीर काळे - रविवार, 12 मे 2013 - 01:08 PM IST
गोखलेसाहेब, आपण म्हणता ते अगदी खरे आहे. या
वेळी ६० टक्क्यांहून जास्त पाकिस्तानी लोकांनी उत्साहात मतदानाचा हक्क
बजावला. संपूर्ण देशाच्या पातळीवत इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान भारतात
झाल्याचे कधीच वाचनात आलेले नाहीं. ते २०१४ साली व्हावे असे प्रत्येक
भारतीयाला वाटते व तसे होवो हीच ईश्वरचणी प्रार्थना!
====================
====================
Vijay Gokhale in US - रविवार, 12 मे 2013 - 09:22 AM IST
Hats off to average Pakistanis; the only
people who could and who did rise to the occasion.! Hope the Indians do
the same in 2014.
====================
====================
sulakshana - रविवार, 12 मे 2013 - 12:35 AM IST
खूप छान सर.....
आता संजू बाबा च्या लेखाची वाट बघू...
====================
====================
Dear Mr Gokhale, thanks for your inputs. I
often feel Imran is like Acharya Atre who could pull huge crowds but
hardly ever won an election except during heydays of Samyukt Maharashtra
Samiti. I think all Pakistanis know that he can't run the government.
Let's see what happens!
====================
====================
सुधीर काळे - शनिवार, 11 मे 2013 - 11:07 AM IST
बिपीन-जी, माझ्या "शामभटाच्या तट्टाणी"ची
तूलना तुम्ही विजय साळुंखे, विजय कुवळेकर यांच्यासारख्या "ऐरावतां"बरोबर
केलीत त्याच्या पाच सेकंद गुदगुल्या झाल्या हे खरं, पण कुठे ते आणि कुठे मी
एक पोलाद बनविणारा मेटलर्जिस्ट! वाचायला आवडतं, त्यातून लिहायचा झटका येतो
व मी लिहितो. वाचकांना आवडतं असं वाटतं म्हणून लिहीत रहातो इतकंच. पण
कौतुकाच्या शब्दांबद्दल धन्यवाद. मी नक्कीच लिहीत राहीन.
====================
====================
स्वैर परी मॅडम, धन्यवाद! "आपण असेच लिखाण
करून मज पामराचे ज्ञान वृद्धिंगत करावे, हि विनंती" या सूचनेला उद्देशून मी
एवढेच म्हणेन कीं "जोवर आपल्यासारखे कौतुक करणारे वाचक आहेत तोवर "म्या
पामराला जमेल तितके लिखाण मी नक्कीच करत राहीन." पुढचा लेख ’संजूबाबा’वर
लिहायचा संकल्प आहे! बघू हा लेख कसा वठतो ते!
====================
====================
Vijay Gokhale in US - शनिवार, 11 मे 2013 - 05:21 AM IST
Mr. Kale congratulations for authoring a
very well researched article. However there are a few factors that could
affect the outcome of this election as well as post-election
operations:
1. The first factor is Imran Khan, he was not a part of the original
election calculations but the youngsters are attracted to him. Imran
Khan is very photogenic person who speaks very well. His being Pathan
gives him an edge, but the US does not trust him.
2. If it is a hung parliament then small parties will be king makers,
and they could block Shariff’s bills in parliament and create
roadblocks.
3. The Taliban influence is going to be tremendous, especially in Punjab
province and Afghan border.
4. If Ashfaq Kiyani even gets a hint that the disorder caused by
civilian government they will take over. Contrary to the prevailing
opinion in India Pak Army is efficient and well trained. Kiyani is
backed by US who is scared if nukes falling in wrong hands.
====================
====================
सुनील - शुक्रवार, 10 मे 2013 - 11:23 PM IST
काळे साहेब, आपण सदर लेखात " टीपा" मध्ये
"(*7) उसेन बोल्ट हा जमेकाचा 100 आणि 200 मीटर शर्यतीती सुवर्णपद विजेता व
नवे विश्वविक्रम प्रस्थापित करणारा धावपटू आहे" हे वाक्य आहे, त्याचा सदर
लेखाशी असलेला सन्धर्ब कळला नाही. बहुतेक चुकून चुकीचे वाक्य पेस्ट झाले
असावे. कळावे , आभारी
====================
====================
काळे काका, सर्वप्रथम नमस्कार! आणि धन्यवाद
तुमच्या या उत्कृष्ट आणि सुटसुटीत लेखाकरिता! किती अभ्यास आणि विचार करून
लिहिले आहे आपण! Hats Off to you! तुमच्या या लेखामुळे माझ्या ज्ञानात अधिक
भर पडली! कृपया आपण असेच लिखाण करून मज पामराचे ज्ञान वृद्धिंगत करावे, हि
विनंती!
====================
====================
बिपीन देशमुख - शुक्रवार, 10 मे 2013 - 07:51 PM IST
सुधीर काळेजी, अथिशय अभ्यासपूर्ण लेख. आपले
लेख हे research article सारखे असतात. अनेक मराठी वृतपत्रे जे
आंतरराष्ट्रीय विषयावर लेख प्रसिध्ध करतात त्यात खोल अभ्यासाचा अभाव असतो
आणि ते लेखकाचे स्वताचे मत असते. Facts काय आहेत आणि त्याचा भारतासाठी काय
अर्थ याचे विश्लेषण क्वचितच वाचायला मिळते. त्याला सन्माननीय अपवाद आहेत,
विजय साळुंखे, विजय कुवळेकर. असेच लिखाण करत राहा.
====================
====================
sagar - शुक्रवार, 10 मे 2013 - 07:10 PM IST
धन्यवाद अत्यंत अभ्यासपूर्ण लेख .. अशाच
प्रकारे कॉंग्रेसने देशाचे तुकडे केले .नेहरूंचे अय्याशी जगणे नेहरूंनी
सियाचीन चीनला देणे . पाकिस्तान विरुद्ध दोन युद्ध करूनही भारताचे हाथ कसे
खालीच राहिले . याबाबतीतही अभ्यास करून देशवासियांना अवगत करावे
====================
====================
Prasanna - शुक्रवार, 10 मे 2013 - 05:57 PM IST
एवढा मोठ्ठा लेख लिहिण्याच्या लायकीचा हा
माणूस (मुशर्रफ) नाही...वाजपेयीं बरोबर करार न करता पळून गेलेला हा पळपुटा
आहे...
====================
====================
prakash - शुक्रवार, 10 मे 2013 - 05:49 PM IST
हाच तो मुशाराफ्फ ज्याने सियःचीन वर हल्ला
केला होता आणि जो भारतीयांनी परतवून लावला .. यानेच नंतर तालिबानी संघटनान
प्रशिक्षण देवून भारतात कारवाया करण्यासाठी पाठवले .. त्याचाच परिणाम
म्हणून काशिमी ९० मध्ये अशांत होते ...... काळे सर खरच तुमचे लेख छान असता
.. लिहित जा मधून मधून
====================
====================
काळे साहेब , तुमचे प्रसिद्ध झालेले पत्र
म्हणजे एक छान अभ्यास पूर्ण लेख आहे .आणि ह्या आधी पण मी तुमचा असच
माहितीपूर्ण लेख कम पत्र इजिप्तच्या सद्य शितीबद्दल वाचले होते .वाचन ,
श्रवण (बातम्यांचे) व मनन ह्याच्या तून हा लेख उतरला आहे म्हणून खूपच
वाचनीय व माहिती पूर्ण झाला आहे .माझ्या सद्यस्थितीच्या ज्ञानात भर
घालणारा लेख आहे . धन्यवाद एक चांगले वाचले असेच वाटले . अरविंद भिडे
====================
====================
व.र.Tadas - मंगळवार, 7 मे 2013 - 10:56 AM IST
खूपच विस्तृत माहितीपूर्ण लेख.तुमच्या अभ्यासाची करावी तेवढी तारीफ कमीच आहे.धन्यवाद.
====================
====================
प्रभाकर पेठकर. - मंगळवार, 7 मे 2013 - 02:16 AM IST
अतिशय मुद्देसुद आणि विस्तृत विवेचन.
मुशर्रफ ह्यांचे टांगते भवितव्य खरोखरच आता येणार्या सरकारवर आणि कुठल्या
तडजोडी केल्या जातात ह्यावर अवलंबून असणार.
-प्रभाकर पेठकर.
====================
====================
विक्रांत, Chicago - मंगळवार, 7 मे 2013 - 01:11 AM IST
काळेसाहेब, मुशर्रफ हा खतरनाक साप आहे.
त्याची अशी अवस्था झाल्याचे सविस्तर वर्णन वाचून कोणत्याही भारतीयाला आनंदच
होईल. उत्तम लेख आणि सविस्तर विवेचन. कुठल्याही हुकुम्शहचि वाट लागली नाही
असे पाकिस्तानात झाले नाही. हा साप धूर्तपणे अजगराच्या थाटात पाकिस्तानला
विळखा घालण्याची स्वप्न बघत होता. पाकिस्तानात त्याला कोणतरी ठेचणार हे
नक्की!
====================
====================
Sudhir Kale - मंगळवार, 7 मे 2013 - 01:03 AM IST
माझे याचा विषयावरचे पणजीहून प्रसिद्ध
होणाऱ्या "नवहिंद टाइम्स"ने प्रकाशित केलेले "Aziz’s Disclosures on
Musharraf" या शीर्षकाखालील पत्र (वरून तिसरे)!
http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-808
====================
====================
जयंत मनोहर - मंगळवार, 7 मे 2013 - 01:25 AM IST
फारच छान लेख. एकच म्हणावेसे वाटते कि
पाकिस्तानी मिलिटरी दोन गोष्टी करेल. एकतर न्याय संस्थे वर दबाव आणून
मुशर्रफ ला वाचवण्या चा प्रयत्न करेल व कदाचित पुन्हा सरकार उलथवून टाकेल.
हि पाकिस्तान ची history आहे व त्या साठी लागणारे वातावरण हि आहे असे मला
वाटते.
====================
====================
सुधीर काळे, जकार्ता - सोमवार, 6 मे 2013 - 11:47 PM IST
चेतन-जी, आपण लिहिलेत कीं "मुशर्रफ यांनी
स्वतः काबुल केले आहे के ते कारगिल युद्धाच्या आखणी मध्ये सामील होते". हे
तर कांहींच नाहीं! ले. ज. शाहिद अजीज यांच्या पुस्तकातील स्वत:च्या
वस्त्रहरणाला उत्तर देताना हे निर्लज्ज गृहस्थ आजही बिनदिक्कतपणे म्हणतात
कीं कारगिलची मोहीम लष्करी दृष्टिकोनातून पाकिस्तानचा निखालस विजय होता पण
आपल्या (पाकिस्तानच्या) भित्र्या पंतप्रधानाने (नवाज शरीफ) राजकीय
पटांगणावर त्याचे पराजयात रूपांतर केले. म्हणजे वार्यावर सोडलेल्या
सैनिकांच्या मृत्यूचे त्यांना आजही सोयरसुतक नाहीं, केलेल्या चुकीबद्दल
पश्चात्तापही नाहीं आणि स्वत:च्या घोडचुकीबद्दल दुसर्यालाच दोष देण्याचा
निर्लज्जपणा मात्र पुरेपूर भरलेला आहे अंगात!
मुशर्रफना आपल्या सरकारने "persona non grata" ठरवून तसे जाहीर केले पाहिजे
====================
====================
Milind - सोमवार, 6 मे 2013 - 10:42 PM IST
कारगिलच्या युद्धात मरण पावलेल्या ५२७
भारतीय जवानांच्या रक्ताने याचे हात माखलेले आहेत. याचा योग्य बदला घेतलाच
पाहिजे!
====================
====================
अरुण कुलकर्णी - सोमवार, 6 मे 2013 - 10:25 PM IST
श्री सुधीर काळे यांस
सप्रेम व आदरपूर्वक नमस्कार.
आपला लेख अति-उत्तम आहे. पत्रकारिता कशी असावी, पुरावे, व references
[foot-note = तळ-टीप ] म्हणून कसे द्यावेत याचे छान उदाहरण आहे. आपल्या
कामाबद्दल आभार.
I really appreciate your efforts. With your this article, I have become
your fan & follower.
सकाळ-ला सुद्धा अनेक धन्यवाद.
माझा email : solace.to.all@gmail.com
आपला नम्र
अरुण
====================
====================
शशिकांत मरकले - सोमवार, 6 मे 2013 - 07:03 PM IST
फारच छान लेख आहे. असा लेख वाचायला मिळणे दुर्मिळ म्हणायला हवे !!!!!!
====================
====================
Ravindra kadam - सोमवार, 6 मे 2013 - 07:00 PM IST
Awesome
====================
====================
सुनील चौधरी - सोमवार, 6 मे 2013 - 06:28 PM IST
आपण दिलेले शीर्षक बरोबर असून मुशर्रफ हा
अत्यंत धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहा आहे , परंतु त्याचा आता खरोखर धोबी का
कुत्ता झाला असून , पाक जनता आणि पाक , अफगाण अतिरेकी त्याला अमेरिकेचा
हस्तक म्हणून जवळ करत नाहीत , तसेच ओबामा आणि बुश ह्यांच्या कार्यशैलीत फरक
असल्यामुळे ओबामा मुशर्रफ ला जवळ करण्याची शक्यता कमी आहे.
====================
चेतन - सोमवार, 6 मे 2013 - 05:29 PM IST
चेतन - सोमवार, 6 मे 2013 - 05:29 PM IST
खूपच साव्स्तर वृतांत. मला वाटता आता जेव्हा
मुशर्रफ यांनी स्वतः काबुल केले आहे के ते कारगिल युद्धाच्या आखणी मध्ये
सामील होते आणि त्याचे बाकी सहकारी पण मुशर्रफ च्या सहभाग बद्दल खुले आम
बोलताय, भारताने त्यांचे या पुढ स्वागत न करता, त्यांच्या विरुद्ध
राष्ट्रध्रोहाचा खटला दाखील करावा.
====================
हेमंत आठल्ये - सोमवार, 6 मे 2013 - 05:26 PM IST
हेमंत आठल्ये - सोमवार, 6 मे 2013 - 05:26 PM IST
सही!!!
====================
====================
arun - सोमवार, 6 मे 2013 - 05:02 PM IST
सुधीर काळे यांनी मुशर्रफ यांची नवी ओळख
करून दिली. जागतिक पातळीवरून, देशांतर्गत पातळीवरून त्यांनी केलेले मुशर्रफ
यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण फार अभ्यासपूर्ण आहे.पाकिस्तानातील राजकीय
अवस्था पहिली तर आपल्याला नेहरू, पटेल यासारखे सुरवातीला चांगले राज्यकर्ते
मिळाले म्हणूनच आपण एवढे पुढे गेलो असे वाटते.तो देश अजूनही अस्थिरच
वाटतो.
====================
====================
वाह ! - सोमवार, 6 मे 2013 - 04:27 PM IST
मस्त लेख रे मामा.
====================
====================
अरविंद - सोमवार, 6 मे 2013 - 04:13 PM IST
उत्कुष्ठ आर्टिकल !! धन्यवाद काळे साहेब.
मुशर्रफ ची गत सुद्धा झुल्फिकार आली भुत्तो सारखीच होईल असे वाटते.
====================
====================
shambhu आवरी - सोमवार, 6 मे 2013 - 03:46 PM IST
उत्तम लेख . माहितीपूर्ण आणि परिपूर्ण ...
खूप काही शिकायला मिळाले. पाकिस्तानविषयी आणि मुशर्रफविषयी
====================
====================
विद्या - सोमवार, 6 मे 2013 - 03:31 PM IST
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. मुशर्रफ
यांच्याविषयी एवढी ताजी आणि अचूक माहिती इंग्रजी माध्यमाच्या वृत्तातही
दिसली नाही. अभिनंदन.
====================
Ketan - सोमवार, 6 मे 2013 - 03:18 PM IST
Ketan - सोमवार, 6 मे 2013 - 03:18 PM IST
Great article. Its really nice to see such
detailed articles. Otherwise, we are tired of reading some bullshit
news and same kind of political stuff. Thanks Sakal for publishing this
article. Kale Sir has written a deep and well-thought out article. Nice.
LIKE !
====================
हा लेख "मी मराठी" या संस्थळावरही मी प्रकाशित केला होता. या संस्थळाच्या वाचकांचे प्रतिसाद:
{हा माणूस मला कधी समजलाच नाही,}
====================
हा लेख "मी मराठी" या संस्थळावरही मी प्रकाशित केला होता. या संस्थळाच्या वाचकांचे प्रतिसाद:
{"वाह्यात माणूस"}
गब्बर सिन्ग यांनी मंगळ, 07/05/2013 - 01:37 ह्यावेळी प्रकाशित केले.
दोन आठवड्यांपूर्वी इंडियन एक्स्प्रेस चे संपादक शेखर गुप्तांनी एक लेख लिहिला होता
त्या लेखानुसार वाजपेयी यांनी मुशर्र्फ यांची "वाह्यात" अशा शब्दात संभावना केली होती. वाजपेयींची अॅसेसमेंट म्हंजे एकदम सुयोग्य असते असे मला म्हणायचे नाही पण ...
व "ये खामोशी कहा तक" बद्दल वाचले. हा एक डाव ही असू शकतो की - कारगिल ऑपरेशन हे मुशर्रफ व त्यांच्या समर्थकांनी केलेली आगळीक होती व पाकिस्तानी आर्मीचा यात सहभाग नव्हता व पाकिस्तानी आर्मी ही निर्दोष आहे व सगळा दोष हा मुशर्रफ यांचाच आहे - असे दाखवायचा डाव असू शकतो. An attempt to absolve the Pakistani Army of the charges.
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell
-----------------------------------------------------------------
{जगाने वाळीत टाकलेल्या 'मुश'ना आग्र्याला बोलावून "माणसात आणला"}
त्या लेखानुसार वाजपेयी यांनी मुशर्र्फ यांची "वाह्यात" अशा शब्दात संभावना केली होती. वाजपेयींची अॅसेसमेंट म्हंजे एकदम सुयोग्य असते असे मला म्हणायचे नाही पण ...
व "ये खामोशी कहा तक" बद्दल वाचले. हा एक डाव ही असू शकतो की - कारगिल ऑपरेशन हे मुशर्रफ व त्यांच्या समर्थकांनी केलेली आगळीक होती व पाकिस्तानी आर्मीचा यात सहभाग नव्हता व पाकिस्तानी आर्मी ही निर्दोष आहे व सगळा दोष हा मुशर्रफ यांचाच आहे - असे दाखवायचा डाव असू शकतो. An attempt to absolve the Pakistani Army of the charges.
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell
-----------------------------------------------------------------
सुधीर काळे यांनी मंगळ, 07/05/2013 - 22:06 ह्यावेळी प्रकाशित केले.
वाजपेयींचे "वाह्यात" असे मुशर्रफबद्दलचे मत त्यांच्या आग्रा
भेटीनंतर झाले असावे. कारण सार्या जगाने वाळीत टाकलेल्या मुशर्रफना
वाजपेयींनी आग्र्याला बोलावून "माणसात आणला"!
वाजपेयींचे निमंत्रण मिळताच तोपर्यंत स्वतःला केवळ CEO म्हणवून घेणार्या मुशर्रफनी स्वतःचा President म्हणून "राज्याभिषेक" करून घेतला आणि २१ तोफांची सलामी घेत ते भारतात आले. इथल्या मुक्कामात त्यांनी ज्या अनेक वाह्यात गोष्टी केल्या त्या आपल्याला माहीतच आहेत! - सुधीर काळे
वाजपेयींचे निमंत्रण मिळताच तोपर्यंत स्वतःला केवळ CEO म्हणवून घेणार्या मुशर्रफनी स्वतःचा President म्हणून "राज्याभिषेक" करून घेतला आणि २१ तोफांची सलामी घेत ते भारतात आले. इथल्या मुक्कामात त्यांनी ज्या अनेक वाह्यात गोष्टी केल्या त्या आपल्याला माहीतच आहेत! - सुधीर काळे
आदीजोशी यांनी मंगळ, 07/05/2013 - 16:03 ह्यावेळी प्रकाशित केले.
अप्रतिम लेख. डिटेलिंग मस्तच.
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
राजे यांनी मंगळ, 07/05/2013 - 22:08 ह्यावेळी प्रकाशित केले.
हा माणूस मला कधी समजलाच नाही, कधी कधी बिन्डोक वाटतो तर कधी कधी महाधुर्त!
पण हा महाधुर्त आहे या मतावर मी गेल्या काही वर्षात ठाम आहे
something terribly wrong with this country, isn't there?
-----------------------------------------------------------------
{मला असं का वाटतं ते माहीत}
पण हा महाधुर्त आहे या मतावर मी गेल्या काही वर्षात ठाम आहे
something terribly wrong with this country, isn't there?
-----------------------------------------------------------------
{मला असं का वाटतं ते माहीत}
अर्धवट यांनी गुरू, 09/05/2013 - 17:44 ह्यावेळी प्रकाशित केले.
मला असं का वाटतं ते माहीत नाही, पण ह्याही व्यक्तीचा अंत इतर अनेक
लष्करी हुकुमशहांसारखाच, त्यांच्याच राष्ट्रातील जनता करेल असं वाटतं.
-----------------------------------------------------------------
{Wishful thinking}
सुधीर काळे
-----------------------------------------------------------------
{Wishful thinking}
सुधीर काळे यांनी रवी, 12/05/2013 - 12:14 ह्यावेळी प्रकाशित केले.
मन वैयक्तिकरीत्या जे इच्छिते (Wishful thinking) तेच सत्य आहे असे वाटू लागते त्यातलीच गत असावी! सुधीर काळे
{"चट चौकशी, पट निकाल" असेच करायला हवे}
मलाही हे पटते! चट चौकशी, पट 'निकाल' असेच करायला हवे!!
सुधीर काळे-----------------------------------------------------------------
==================================
हा लेख "मायबोली" या संस्थळावरही मी प्रकाशित केला होता. या संस्थळाच्या वाचकांचे प्रतिसाद:
----------------------------------------------
सुधीर काळे यांनी सोम, 13/05/2013 - 22:32 ह्यावेळी प्रकाशित केले.
या लेखाच्या 'सकाळ'वरील एका वाचकाने छान प्रतिसाद दिला आहे. ते
म्हणतात, "'नवाज शरीफ यांनी कारगिलच्या ह्या "खलनायका"चा सद्दाम हुसेन,
गडाफी यांच्याप्रमाणे ताबडतोब 'निकाल' लावावा म्हणजे बरे!!"मलाही हे पटते! चट चौकशी, पट 'निकाल' असेच करायला हवे!!
सुधीर काळे-----------------------------------------------------------------
{अगदी असेच होईल असे वाटत आहे!}
{+१.
सत्तेच्या मोहात आपलीच कबर}
राजे यांनी सोम, 13/05/2013 - 22:36 ह्यावेळी प्रकाशित केले.
अगदी असेच होईल असे वाटत आहे!
something terribly wrong with this country, isn't there?
-----------------------------------------------------------------
something terribly wrong with this country, isn't there?
-----------------------------------------------------------------
झकासराव यांनी मंगळ, 14/05/2013 - 13:20 ह्यावेळी प्रकाशित केले.
+१.
सत्तेच्या मोहात आपलीच कबर खोदलीये.
भारताने मुत्सद्दीपणाने हाताळाल्यास अजुन दबाव वाढेल..
----------------------------------------------------------------- सत्तेच्या मोहात आपलीच कबर खोदलीये.
भारताने मुत्सद्दीपणाने हाताळाल्यास अजुन दबाव वाढेल..
==================================
हा लेख "मायबोली" या संस्थळावरही मी प्रकाशित केला होता. या संस्थळाच्या वाचकांचे प्रतिसाद:
उत्तम लेख आणि विश्लेषण.
काळेसाहेब बर्याच दिवसांनी दिसले माबोवर.
----------------------------------------------
काळेसाहेब बर्याच दिवसांनी दिसले माबोवर.
----------------------------------------------
छान माहिती
----------------------------------------------
छान माहिती
sudhirkale42 बर्याच दिवसांनी !!
आणखी एक जबरदस्त लेख.
----------------------------------------------
आणखी एक जबरदस्त लेख.
----------------------------------------------
छान माहिती.. आज पैल्यांदा पाकिस्तानच्या राजकारणात घुसलो..
----------------------------------------------
----------------------------------------------
काळेसाहेब पुनरागमन दणक्यात केले. सुंदर विश्लेषण.
----------------------------------------------
----------------------------------------------
सुधिर काळेसाहेब
तुमचे लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. तेथील पत्रकारांच्या लिखाणावरून काढलेल्या तुमच्या निष्कर्षांशी एरवी मी सहमत नसतो.
पण या लेखातील बर्याच भागाशी सहमत.
सरतेशेवटी आय एस आय आणि लष्कर हेच पाक मधे काय होणार ते ठरवतात. बाकी तेथील लोकशाहीचा दिखावा आपल्यासाठी शून्य किमतीचा असे मला वाटते. आता आलेल्या नवाज शरिफांनाही लष्कर देईल तितकीच किंम्मत! त्यांची स्वताची ध्येय धोरणे कितीही चाम्गली वाटली तरी त्यात कांही अर्थ नाही.
----------------------------------------------
तुमचे लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. तेथील पत्रकारांच्या लिखाणावरून काढलेल्या तुमच्या निष्कर्षांशी एरवी मी सहमत नसतो.
पण या लेखातील बर्याच भागाशी सहमत.
सरतेशेवटी आय एस आय आणि लष्कर हेच पाक मधे काय होणार ते ठरवतात. बाकी तेथील लोकशाहीचा दिखावा आपल्यासाठी शून्य किमतीचा असे मला वाटते. आता आलेल्या नवाज शरिफांनाही लष्कर देईल तितकीच किंम्मत! त्यांची स्वताची ध्येय धोरणे कितीही चाम्गली वाटली तरी त्यात कांही अर्थ नाही.
----------------------------------------------
मी-भास्करसाहेब, मी अनुवाद केलेल्या लेखांतील मते त्या मूळ लेखकाचीच
असतात पण ती मला बरीचशी पटली तरच मी त्यांचा अनुवाद करून प्रसिद्धीला
देतो. बर्याचदा या लेखांत भारताच्या हिताच्या गोष्टी असतात. उदा. कारगिलचे
दुस्साहस हा ई-सकाळवरचा लेख! (http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5006231042185477204&Se...)
समस्या ही आहे कीं पाकिस्तानी जनता आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ कधीच निदर्शने करीत नाहीं. त्यामुळे लष्कर जे मनात येईल ते करते. तसेच जरदारींच्या काळात मी पाकिस्तानी वृत्तपत्रात सतत वाचले आहे कीं प्रत्येक कॅबिनेट स्तरावरील बैठकीत ज. कियानींना निमंत्रण असायचे व ते या बैठकांत सहभागी व्हायचे. यामुळे लष्करी अधिकार्यांनाही एक तर्हेचा माज येतो. त्यात अमेरिकेचे राजदूत किंवा सरकारी भेटीवर आलेले ज्येष्ठ नेतेही पाकिस्तानी जनरल्सची न चुकता भेट घेतात. त्यामुळेही जनरल्सना माज चढतो.
आपल्याकडे लष्करप्रमुखाला कॅबिनेट स्तरावरील बैठकीसाठी कुठे बोलावणे असते? गरज असेल तेंव्हां त्याच्याशी सल्लामसलत जरूर केली जाते पण शेवटी सरकारचा निर्णय त्याला कळविला जातो व त्यानुसार कारवाई करण्यास सांगितले जाते. इतर लोकशाही राष्ट्रांतही असेच असते.
पाकिस्तानमध्ये आता शरीफ बदल घडवून आणतील काय हे पहाणे मनोरंजक ठरेल. निवडणुकांच्या आधीच्या प्रचारसभांमधील भाषणात ते लष्कराला आपल्या सरकारमधील एक विभाग (department) म्हणून वागवतील अशी विधाने केली होती ती ते कितपत पाळू शकतात ते आता पहायचे!
समस्या ही आहे कीं पाकिस्तानी जनता आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ कधीच निदर्शने करीत नाहीं. त्यामुळे लष्कर जे मनात येईल ते करते. तसेच जरदारींच्या काळात मी पाकिस्तानी वृत्तपत्रात सतत वाचले आहे कीं प्रत्येक कॅबिनेट स्तरावरील बैठकीत ज. कियानींना निमंत्रण असायचे व ते या बैठकांत सहभागी व्हायचे. यामुळे लष्करी अधिकार्यांनाही एक तर्हेचा माज येतो. त्यात अमेरिकेचे राजदूत किंवा सरकारी भेटीवर आलेले ज्येष्ठ नेतेही पाकिस्तानी जनरल्सची न चुकता भेट घेतात. त्यामुळेही जनरल्सना माज चढतो.
आपल्याकडे लष्करप्रमुखाला कॅबिनेट स्तरावरील बैठकीसाठी कुठे बोलावणे असते? गरज असेल तेंव्हां त्याच्याशी सल्लामसलत जरूर केली जाते पण शेवटी सरकारचा निर्णय त्याला कळविला जातो व त्यानुसार कारवाई करण्यास सांगितले जाते. इतर लोकशाही राष्ट्रांतही असेच असते.
पाकिस्तानमध्ये आता शरीफ बदल घडवून आणतील काय हे पहाणे मनोरंजक ठरेल. निवडणुकांच्या आधीच्या प्रचारसभांमधील भाषणात ते लष्कराला आपल्या सरकारमधील एक विभाग (department) म्हणून वागवतील अशी विधाने केली होती ती ते कितपत पाळू शकतात ते आता पहायचे!
’ई-सकाळ’च्या आधी /ब्लॉग’वर व नंतर /पैलतीर’ या सदरात हा लेख प्रकाशित झाला व वाचकांना खूप आवडला. तिथल्या प्रतिक्रिया:
====================