आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?
(एका पाकिस्तानी प्राध्यापकाचा काश्मीर प्रश्नावरचा आगळा-वेगळा व अतिशय वाचनीय लेख)
मूळ लेखक - प्रा. याकूब खान बंगाश, लाहोर,
अनुवाद - सुधीर काळे, जकार्ता
प्रा. याकूब खान बंगश हे लाहोरच्या 'फोरमॅन ख्रिश्चन कॉलेज'मध्ये इतिहासाचे प्राध्यापक असून, त्यांचा पहिलाच लेख मी अलीकडे वाचला. खरे तर 'आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?' हे लेखाचे शीर्षक वाचूनच मी त्यांच्या लेखाकडे आकर्षित झालो. वाटले होते की नेहमीप्रमाणे भारताला दोष देणारा लेख असेल. पण तो वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या लेखात लेखकाने पाकिस्तानची विशीतली पिढी काश्मीरबद्दल कशी उदासीन झाली आहे याची चर्चा केलेली आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न बाजूला ठेऊन इतर समस्यांकडे लक्ष देऊन आपले जीवनमान सुधारावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.
खाली मी या लेखाचा केलेला अनुवाद देत आहे. माझे स्वतःचे विचार लेखाच्या शेवटी दिलेले आहेत.
गेल्या वर्षी 'ट्रिब्यून'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या एका लेखात 'पाकिस्तानने काश्मीरबाबतचा आपला पवित्रा, केवळ काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठीच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानच्या कल्याणासाठी, बदालायला हवा', असे प्रा. याकूबसाहेबांनी लिहिले होते [१]! एरवीसुद्धा आम पाकिस्तानी जनतेपेक्षा पाकव्याप्त काश्मिरी जनतेने जास्त प्रगती करून घेतलेली आहेच. जर काश्मीर-तंट्यात पाकिस्तान अडकले नसते तर ते जास्त सुरक्षित, स्थिर, लोकशाही राज्यपद्धतीने सरकार चालविणारे आणि सुधारलेले राष्ट्र बनले असते यात शंकाच नाही, असेही याकूबसाहेबांचे म्हणणे आहे!
फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात याकूबसाहेबांनी आयोजलेल्या चर्चासत्रांच्या शृंखलेत त्यांनी 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हा विषय निवडला होता. भरगच्च भरलेल्या सभागृहात घेतल्या गेलेल्या बलुचिस्तान आणि तालिबान, या दोन विषयांवरील या आधीच्या चर्चेनंतर तशाच तर्हेची आवेशपूर्ण चर्चा काश्मीरवरही होईल, अशी याकूबसाहेबांची अटकळ होती. या चर्चासत्राला आणखी रंगत यावी म्हणून आणि जास्तीचे प्रलोभन म्हणून त्यांनी एके काळी पाकिस्तानी लष्करात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या आणि काश्मीरमधल्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आपल्या एका सहकार्यालाही आपले वैयक्तिक अनुभव आणि विचार सर्वांसमोर मांडण्यासाठी याकूबसाहेबांनी आमंत्रित केले होते. हे सहकारीही सध्या फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.
पण या चर्चासत्रात जे घडले ते बरेच काही नवे सांगून गेले. हा जो गट चर्चासत्राला आला होता त्याला सार्या पाकिस्तानचे प्रातिनिधित्व करणारा गट, असे काही म्हणता येणार नाही. पण हेही तितकेच खरे की पाकिस्तानच्या चारी मुख्य प्रांतांचे आणि गिलगिटचे [२] विद्यार्थी तिथे जमले होते. त्यात पुरुष होते आणि स्त्रियाही होत्या. बहुसंख्य ग्रामीण भागातले होते आणि समाजाच्या
सर्व सामाजिक आर्थिक स्तरातील विद्यार्थी तिथे जमले होते. चर्चासत्राची सुरुवात झाली तेव्हा खूप गर्दी होती पण या विषयात कुणाला फारसा रस नसावा असे याकूबसाहेबांना जाणवले.
पाकिस्तानच्या रूढ किंवा पारंपरिक पवित्र्याबाबत कुणाला काही बोलायचे आहे काय? असे याकूबसाहेबांनी तीन वेळा या विद्यार्थ्यांना विचारले, पण कुणीच तोंड उघडले नाही. आणखी जरा चुचकारल्यावर एका विद्यार्थ्याने एका उदासीन प्रयत्नात म्हटले, 'आपण काश्मीरला कधीच विसरता कामा नये. कारण आपले पाणी काश्मीरमधूनच वहात येते.' या एका प्रतिसादापलीकडे पाकिस्तानच्या पवित्र्याबाबत इतर कुठलाही उल्लेख कुणी केला नाही. कुणी भारतीयांच्या काश्मिरी जनतेवरच्या अत्याचारांचा उल्लेख केला नाही, कुणी फाळणीच्या वेळी न सुटलेल्या या समस्येचा उल्लेख केला नाही किंवा मुस्लिम बांधवांबद्दलही कुणी बोलला नाही. आधीच्या दोन चर्चासत्रांत बलुचिस्तान आणि तालिबान या दोन विषयांवर जशी आवेशपूर्ण चर्चा झाली त्या पार्श्वभूमीवर काश्मीर या विषयावरील चर्चा फारच कंटाळवाणी आणि जोशरहित झाली.
हळू-हळू विद्यार्थी सभेचे ठिकाण सोडून जाऊ लागले. जशी त्यांची संख्या घटू लागली तशी ही चर्चा याकूबसाहेबांना वेळेआधीच आवरती घ्यावी लागली! कारण कुणालाच या चर्चेत स्वारस्य वा आस्था दिसली नाही.
१९९० च्या दशकात वाढलेल्या याकूबसाहेबांचा पिंड तसा 'पाकिस्तान टीव्ही'वरच्या काश्मीरबद्दलच्या बातम्यांवर पोसलेला आहे, असे ते म्हणतात. म्हणून या चर्चासत्रात खूपच तावातावाने चर्चा होईल असे त्यांना वाटले होते. कदाचित हा वार्तालाप जर १९९२ साली आयोजला असता तर अगदी उत्कटपणे आणि कळकळीने या विषयावर चर्चा झाली असती. मग आता काय बदलले आहे?
याकूबसाहेबांच्या मते तीन गोष्टी बदलल्या आहेत!
पहिली गोष्ट ही, की पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा सरकारी प्रचाराद्वारा जिवंत ठेवला होता. भारतीय सैन्याच्या काश्मिरी जनतेवरील रोजच्या अत्याचाराच्या, जुलुमाच्या बातम्या-काही खर्या तर काही तिखट-मीठ लावून सांगितलेल्या-ऐकवून पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्ध भावनावेगाने भडकविणे हाच त्यामागचा मूळ हेतू असायचा. फक्त एकुलती एक दूरचित्रवाणी वाहिनी असल्यामुळे आणि जनतासुद्धा 'नियंत्रित' असल्यामुळे जनतेच्या मनात अशी भावना निर्माण करणे पाकिस्तानी सरकारला सोपे होते. सध्या प्रसारमाध्यमांना बरेच स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे आणि जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुधारल्यामुळे सत्य परिस्थिती आता लपून राहिलेली नाही, असे याकूबसाहेब म्हणतात.
दुसरी गोष्ट अशी, की अर्धी पाकिस्तानी जनता आता तिशीपेक्षा तरुण आहे आणि काश्मीरबरोबरच्या नात्यात त्यांना पहिल्यासारखी जवळीक वाटत नाही. काश्मीर समस्या पहिल्या पिढीच्या पाकिस्तान्यांना 'आपली' समस्या वाटत असे. पाकिस्तानच्या दुसर्या पिढीने त्या समस्येकडे एक 'वाडवडिलांकडून वारसाहक्काने आलेली' समस्या म्हणून पाहिले. पाकिस्तानच्या तिसर्या पिढीचे काश्मीरशी फारसे संबंध, फारशी जवळीक राहिलेली नाही. १९४७ साली पाकिस्तान कसर लागलेल्या आपल्या राष्ट्राचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात होता. पण सध्याची सरहद्द शाबूत ठेवणेच किती अवघड झालेले आहे, याची आताच्या तरुण पाकिस्तान्यांना चांगली कल्पना आहे. एक धर्म सोडला तर ज्या भागाचा आपल्या राष्ट्राशी इतर काहीच संबंध उरला नाही, त्या भागाचे आपल्या देशात विलीनीकरण करणे म्हणजे इजिप्तचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासारखे आहे असेच आताच्या तरुण पाकिस्तान्यांना वाटते. आजच्या तरुण पाकिस्तानी पिढीला एकाद्या उदात्त धर्माधिष्ठित कल्पनेच्या आहारी जाण्यात कुठलेच स्वारस्य उरलेले नाही. आपली प्रगती आणि आपले सुख एवढ्याच गोष्टींबाबत तो चिंतित आहे, ही या चर्चासत्राद्वारे बाहेर आलेली तिसरी गोष्ट. आजच्या पाकिस्तानी व्यक्तीला भारताविरुद्ध भांडखोर, आक्रमक प्रवृत्ती ठेवण्यापेक्षा भारतात एकादी चांगली नोकरी किंवा चांगले काम मिळविण्यात त्याला जास्त स्वारस्य उरले आहे, असेच याकूबसाहेबांना वाटते[३].
पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या उदासीनतेचे उत्तम उदाहरण सापडते ते दिफा-ए-पाकिस्तान परिषदेत! या परिषदेला प्रत्येक विषयावर टोकाची विचारसरणी असलेल्या वृद्ध पाकिस्तान्यांच्या एका विभिन्न आणि विजोड अशा टोळक्याचे स्वरूप आले आहे. ही परिषद आता दिवसेंदिवस असंबद्ध आणि कालबाह्य झालेल्या जनतेच्या जुन्या समस्या कशाबशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार्यांची मरणासन्न संघटना उरली आहे. जर पाकिस्तानी जनतेला काश्मीरबाबत खरोखर इतकी काळजी आणि आस्था असती, तर या परिषदेला मेळावे जमवून भारताचा तिरस्कार करण्याची आठवण सतत करून देण्याची आवश्यकताच वाटली नसती!
पाकिस्तान आता आपल्या भूतकाळाशी फारकत घेऊ लागला आहे आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आता एक फलनिष्पत्तीकडे आणि विकासाकडे डोळसपणे पहाणारे, परस्पर सहकारावर भर देणारे आणि शेजारी राष्ट्रांशी शांततेने, सौहार्द्राने रहाणारे राष्ट्र बनू इच्छित आहे. म्हणूनच काश्मीर समस्येवर दोन्ही बाजूंचा फायदा होईल असा समंजस तोडगा काढून आणि जुना अव्यवहारी आणि आदर्शवादी पवित्रा सोडून तसा करार करण्याची संधी घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असे याकूबसाहेब शेवटी सांगतात.
मूळ लेख वाचा या दुव्यावर -
http://tribune.com.pk/story/477777/maybe-we-have-forgotten-kashmir/
टिपा -
[१] Time to forget Kashmir या लेखात याकूबसाहेब यांनी फक्त मनमोहन सिंग यांच्या 'पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर भर न देता आपल्या अंतर्गत समस्यांकडे जास्त निकडीने लक्ष द्यायला हवे', या विधानाचाच उल्लेख करून न थांबता, त्यांनी मौलाना फजलूर रहमान यांच्या पाकिस्तानच्या 'जमीयत उलेमा इस्लाम (फजल गट) या विरोधी पक्षाचे नेते मौलाना फज़ल उर रहमान 'अर्थातच पाकिस्तानला राजनैतिक तोडगा हवा आहे. पण परिस्थिती खूपच बदललेली आहे. आता 'पाकिस्तान कसे वाचवायचे' ही समस्या मोठी झाली असून त्यामुळे काश्मीर जिंकून घेण्याची संकल्पना मागे पडली आहे', या विधानाचाही उल्लेख केला आहे. याकूबसाहेब पुढे म्हणतात, की असे न परवडणारे भांडण करण्याचा मार्ग पाकिस्तानने निवडला नसता तर पाकिस्तानी लष्कर आपल्याच मुलकी सरकारला चार वेळा बरखास्त करण्याइतके मजबूत झालेच नसते. '१९८९पासून प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थिती असली तरी भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरने साक्षरता, आर्थिक प्रगती आणि दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत पाकिस्तानपेक्षाही जास्त प्रगती केलेली आहे. मग ते कशाला पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छितील? पाकिस्तानकडे त्यांना देण्यासारखे काय आहे?' असाही प्रश्न याकूबसाहेब या लेखात विचारतात!
पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते असेही ते लिहितात.
शेवटी ते म्हणतात, की जोवर पाकिस्तान आपले घर सावरत नाही, तोपर्यंत त्याने भारताच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याचे सोनेरी स्वप्न सोडून दिले पाहिजे. कारण जिथे आपल्या ताब्यात असलेल्या कित्येक भागावर आपल्या सरकारचे नियंत्रण नाहीं आणि जिथे पाकिस्तानी जनता आर्थिक आणि सुरक्षेसंबंधीच्या काळजीत व्यग्र आहे तिथे गेली सहा दशके प्रगतीच्या वेगळ्याच कक्षेत असलेला आणखी एक मोठा मुलुख काबीज करण्याची आशा बाळगणे अगदीच हास्यास्पद आहे.
शेवटी ते म्हणतात, की काश्मीरबाबतचा आपला आक्रमक पवित्रा आपण केवळ काश्मीरमधील दुःख भोगणार्या मुस्लिम बांधवांसाठीच नाहीं तर भारतामध्ये असेच दुःख भोगणार्या १४ कोटी मुस्लिम बांधवांच्या हितासाठी सोडला पाहिजे कारण जोवर पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण आक्रमक आणि प्रतिकूल आहे तोपर्यंत हिंदू बहुसंख्य भारतात या मुस्लिमांकडे संशयी नजरेनेच पाहिले जाईल.
४ जुलै २०११ रोजी प्रकाशित झालेला हा संपूर्ण लेख वाचा या दुव्यावर:
http://tribune.com.pk/story/202209/time-to-forget-kashmir/
[२] गिलगिट हा पूर्वीच्या काश्मीर राज्याचा भाग होता व १९४८ सालच्या युद्धबंदीनंतर या काश्मीर संस्थानाचा गिलगिट-बाल्टिस्तानसह ४० टक्के भाग पाकिस्तानकडे राहिला तर जम्मू आणि लडखसह ६० टक्के भारताकडे. (http://en.wikipedia.org/wiki/Gilgit)
[३] आज भारतात बॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणावर पाकिस्तानी कलाकार घुसले आहेत तिकडे पहाता हे खरेच वाटते.
मूळ लेख ७६० शब्दांचा असून त्याला आलेल्या १०४ प्रतिसादांतील शब्दसंख्या आहे ७००० पेक्षा जास्त आहे. सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या वाचकांनी-भारतीय आणि पाकिस्तानी-प्रतिसाद दिलेले आहेत. अनेक वाचकांनी टोपणनावाने प्रतिसाद लिहिलेले असून, त्यात भारतीय मुस्लिम वाचकांचा समावेश असल्यामुळे सरहद्दीच्या कुठल्या बाजूच्या वाचकाने कुठला प्रतिसाद दिला आहे हे ओळखणे कठीण होते. अपेक्षेनुसार कांहीं प्रतिसाद अगदी ’कट्टर’ असले तरी बरेच समंजसही आहेत. पण कुणी कट्टर लिहिले आहेत आणि कुणी समंजस हे वरील कारणांमुळे कठीण काम झाले आहे. लेखाइतकेच हे प्रतिसादसुद्धा वाचनीय आहेत. दुवा उघडून सर्वांनी जरूर वाचावेत.
माझेही ४ प्रतिसाद असून त्यातून माझी या लेखाबद्दलची मते स्पष्ट होतात. त्यातला पहिला आहे 'Hats off to the courage of the author Yaqoob Khan for writing such an article! The Kashmir issue is being kept alive only by Pakistani Armed Forces lest its very ‘raison d’etre’ vanishes & they can't continue enjoying good things their present Military job offers them."
दुसरा प्रतिसाद होता, 'Whatever be the magic, but whenever one writes an article discussing 'Kashmir' on both sides of the border between India & Pakistan, one gets maximum responses! I think both the countries are obsessed by Kashmir. Does Kashmir deserve so much obsession? NO!
माझा तिसरा प्रतिसाद विजय कौल या काश्मिरी हिंदू वाचकाच्या प्रतिसादाला होता. 'Kashmir is not a local aberration, it is as global as is Palestine, Chechnya, or for that matter the rising number of festering sores in the name of the game called Jihad.
Let’s make no mistake. Kashmiris continue to be brainwashed and have landed themselves in a hot soup of jihadi imbroglio, after ethnically cleansing their co-kashmiris who did not convert over centuries into Islam.'
या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता. त्यात मी लिहिले होते, 'Very well said, Mr Kaul, yourself a Kashmiri, probably displaced from his own homeland ethnical cleansed by fellow Kashmiris while Indian government just stood by watching! What a pity!'
आणि शेवटचा प्रतिसाद होता झीशान नावाच्या एका वाचकाला उत्तर म्हणून. या वाचकाला सर्वात जास्त लोकांनी लक्ष्य केलेले दिसले. माझ्या प्रति-उत्तरात मी लिहिले होते, "@Zeeshan: Please don’t get emotional!
(1) Just see how many Pakistani artists are working in so-called Bollywood and enjoying prosperity. Also don’t forget that Indians support their talent though they are not Indians.
(2) To your rhetorical question 'And, where do you get the idea of 'improvement of the situation in Indian-Occupied Kashmir'? From Kashmiris or Indians?" I say, "My dear friend, Kashmiris participated overwhelmingly in most of the elections held in J&K voted to a level of 80% turn out trashing the 'Boycott' calls by separatists leaders. What does it tell you?
(3) If Kashmiris are to be given an option of 'Independence', it must be given to every State in India and Pakistan from Kashmir to the North to Tamilnadu to the South & Balochistan to the West to Assam to the East! I am sure both India & Pakistan don’t want to test this option! After all Pakistan has not yet given 'independence' to what it wrongly calls as 'Azad' Kashmir!
Mr Yaqooob Khan Bangash has done a yeoman's service by writing this article and it is in Pakistan’s interest to rea d & study it dispassionately!
पाकिस्तानला आत्मनिरीक्षण-आत्मपरीक्षण करून भारताशी मैत्री केली पाहिजे असे माझे मत पूर्वीपासून आहे. हा (आणि असेच आयाज अमीर, कामरान शफी यांचे) लेख वाचल्यावर ते आणखीच दृढ झाले!
===============
सकाळच्या वाचकांचे प्रतिसाद"
===============
मूळ लेखक - प्रा. याकूब खान बंगाश, लाहोर,
अनुवाद - सुधीर काळे, जकार्ता
प्रा. याकूब खान बंगश हे लाहोरच्या 'फोरमॅन ख्रिश्चन कॉलेज'मध्ये इतिहासाचे प्राध्यापक असून, त्यांचा पहिलाच लेख मी अलीकडे वाचला. खरे तर 'आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?' हे लेखाचे शीर्षक वाचूनच मी त्यांच्या लेखाकडे आकर्षित झालो. वाटले होते की नेहमीप्रमाणे भारताला दोष देणारा लेख असेल. पण तो वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या लेखात लेखकाने पाकिस्तानची विशीतली पिढी काश्मीरबद्दल कशी उदासीन झाली आहे याची चर्चा केलेली आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न बाजूला ठेऊन इतर समस्यांकडे लक्ष देऊन आपले जीवनमान सुधारावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.
खाली मी या लेखाचा केलेला अनुवाद देत आहे. माझे स्वतःचे विचार लेखाच्या शेवटी दिलेले आहेत.
गेल्या वर्षी 'ट्रिब्यून'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या एका लेखात 'पाकिस्तानने काश्मीरबाबतचा आपला पवित्रा, केवळ काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठीच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानच्या कल्याणासाठी, बदालायला हवा', असे प्रा. याकूबसाहेबांनी लिहिले होते [१]! एरवीसुद्धा आम पाकिस्तानी जनतेपेक्षा पाकव्याप्त काश्मिरी जनतेने जास्त प्रगती करून घेतलेली आहेच. जर काश्मीर-तंट्यात पाकिस्तान अडकले नसते तर ते जास्त सुरक्षित, स्थिर, लोकशाही राज्यपद्धतीने सरकार चालविणारे आणि सुधारलेले राष्ट्र बनले असते यात शंकाच नाही, असेही याकूबसाहेबांचे म्हणणे आहे!
फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात याकूबसाहेबांनी आयोजलेल्या चर्चासत्रांच्या शृंखलेत त्यांनी 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हा विषय निवडला होता. भरगच्च भरलेल्या सभागृहात घेतल्या गेलेल्या बलुचिस्तान आणि तालिबान, या दोन विषयांवरील या आधीच्या चर्चेनंतर तशाच तर्हेची आवेशपूर्ण चर्चा काश्मीरवरही होईल, अशी याकूबसाहेबांची अटकळ होती. या चर्चासत्राला आणखी रंगत यावी म्हणून आणि जास्तीचे प्रलोभन म्हणून त्यांनी एके काळी पाकिस्तानी लष्करात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या आणि काश्मीरमधल्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आपल्या एका सहकार्यालाही आपले वैयक्तिक अनुभव आणि विचार सर्वांसमोर मांडण्यासाठी याकूबसाहेबांनी आमंत्रित केले होते. हे सहकारीही सध्या फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.
पण या चर्चासत्रात जे घडले ते बरेच काही नवे सांगून गेले. हा जो गट चर्चासत्राला आला होता त्याला सार्या पाकिस्तानचे प्रातिनिधित्व करणारा गट, असे काही म्हणता येणार नाही. पण हेही तितकेच खरे की पाकिस्तानच्या चारी मुख्य प्रांतांचे आणि गिलगिटचे [२] विद्यार्थी तिथे जमले होते. त्यात पुरुष होते आणि स्त्रियाही होत्या. बहुसंख्य ग्रामीण भागातले होते आणि समाजाच्या
सर्व सामाजिक आर्थिक स्तरातील विद्यार्थी तिथे जमले होते. चर्चासत्राची सुरुवात झाली तेव्हा खूप गर्दी होती पण या विषयात कुणाला फारसा रस नसावा असे याकूबसाहेबांना जाणवले.
पाकिस्तानच्या रूढ किंवा पारंपरिक पवित्र्याबाबत कुणाला काही बोलायचे आहे काय? असे याकूबसाहेबांनी तीन वेळा या विद्यार्थ्यांना विचारले, पण कुणीच तोंड उघडले नाही. आणखी जरा चुचकारल्यावर एका विद्यार्थ्याने एका उदासीन प्रयत्नात म्हटले, 'आपण काश्मीरला कधीच विसरता कामा नये. कारण आपले पाणी काश्मीरमधूनच वहात येते.' या एका प्रतिसादापलीकडे पाकिस्तानच्या पवित्र्याबाबत इतर कुठलाही उल्लेख कुणी केला नाही. कुणी भारतीयांच्या काश्मिरी जनतेवरच्या अत्याचारांचा उल्लेख केला नाही, कुणी फाळणीच्या वेळी न सुटलेल्या या समस्येचा उल्लेख केला नाही किंवा मुस्लिम बांधवांबद्दलही कुणी बोलला नाही. आधीच्या दोन चर्चासत्रांत बलुचिस्तान आणि तालिबान या दोन विषयांवर जशी आवेशपूर्ण चर्चा झाली त्या पार्श्वभूमीवर काश्मीर या विषयावरील चर्चा फारच कंटाळवाणी आणि जोशरहित झाली.
हळू-हळू विद्यार्थी सभेचे ठिकाण सोडून जाऊ लागले. जशी त्यांची संख्या घटू लागली तशी ही चर्चा याकूबसाहेबांना वेळेआधीच आवरती घ्यावी लागली! कारण कुणालाच या चर्चेत स्वारस्य वा आस्था दिसली नाही.
१९९० च्या दशकात वाढलेल्या याकूबसाहेबांचा पिंड तसा 'पाकिस्तान टीव्ही'वरच्या काश्मीरबद्दलच्या बातम्यांवर पोसलेला आहे, असे ते म्हणतात. म्हणून या चर्चासत्रात खूपच तावातावाने चर्चा होईल असे त्यांना वाटले होते. कदाचित हा वार्तालाप जर १९९२ साली आयोजला असता तर अगदी उत्कटपणे आणि कळकळीने या विषयावर चर्चा झाली असती. मग आता काय बदलले आहे?
याकूबसाहेबांच्या मते तीन गोष्टी बदलल्या आहेत!
पहिली गोष्ट ही, की पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा सरकारी प्रचाराद्वारा जिवंत ठेवला होता. भारतीय सैन्याच्या काश्मिरी जनतेवरील रोजच्या अत्याचाराच्या, जुलुमाच्या बातम्या-काही खर्या तर काही तिखट-मीठ लावून सांगितलेल्या-ऐकवून पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्ध भावनावेगाने भडकविणे हाच त्यामागचा मूळ हेतू असायचा. फक्त एकुलती एक दूरचित्रवाणी वाहिनी असल्यामुळे आणि जनतासुद्धा 'नियंत्रित' असल्यामुळे जनतेच्या मनात अशी भावना निर्माण करणे पाकिस्तानी सरकारला सोपे होते. सध्या प्रसारमाध्यमांना बरेच स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे आणि जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुधारल्यामुळे सत्य परिस्थिती आता लपून राहिलेली नाही, असे याकूबसाहेब म्हणतात.
दुसरी गोष्ट अशी, की अर्धी पाकिस्तानी जनता आता तिशीपेक्षा तरुण आहे आणि काश्मीरबरोबरच्या नात्यात त्यांना पहिल्यासारखी जवळीक वाटत नाही. काश्मीर समस्या पहिल्या पिढीच्या पाकिस्तान्यांना 'आपली' समस्या वाटत असे. पाकिस्तानच्या दुसर्या पिढीने त्या समस्येकडे एक 'वाडवडिलांकडून वारसाहक्काने आलेली' समस्या म्हणून पाहिले. पाकिस्तानच्या तिसर्या पिढीचे काश्मीरशी फारसे संबंध, फारशी जवळीक राहिलेली नाही. १९४७ साली पाकिस्तान कसर लागलेल्या आपल्या राष्ट्राचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात होता. पण सध्याची सरहद्द शाबूत ठेवणेच किती अवघड झालेले आहे, याची आताच्या तरुण पाकिस्तान्यांना चांगली कल्पना आहे. एक धर्म सोडला तर ज्या भागाचा आपल्या राष्ट्राशी इतर काहीच संबंध उरला नाही, त्या भागाचे आपल्या देशात विलीनीकरण करणे म्हणजे इजिप्तचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासारखे आहे असेच आताच्या तरुण पाकिस्तान्यांना वाटते. आजच्या तरुण पाकिस्तानी पिढीला एकाद्या उदात्त धर्माधिष्ठित कल्पनेच्या आहारी जाण्यात कुठलेच स्वारस्य उरलेले नाही. आपली प्रगती आणि आपले सुख एवढ्याच गोष्टींबाबत तो चिंतित आहे, ही या चर्चासत्राद्वारे बाहेर आलेली तिसरी गोष्ट. आजच्या पाकिस्तानी व्यक्तीला भारताविरुद्ध भांडखोर, आक्रमक प्रवृत्ती ठेवण्यापेक्षा भारतात एकादी चांगली नोकरी किंवा चांगले काम मिळविण्यात त्याला जास्त स्वारस्य उरले आहे, असेच याकूबसाहेबांना वाटते[३].
पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या उदासीनतेचे उत्तम उदाहरण सापडते ते दिफा-ए-पाकिस्तान परिषदेत! या परिषदेला प्रत्येक विषयावर टोकाची विचारसरणी असलेल्या वृद्ध पाकिस्तान्यांच्या एका विभिन्न आणि विजोड अशा टोळक्याचे स्वरूप आले आहे. ही परिषद आता दिवसेंदिवस असंबद्ध आणि कालबाह्य झालेल्या जनतेच्या जुन्या समस्या कशाबशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार्यांची मरणासन्न संघटना उरली आहे. जर पाकिस्तानी जनतेला काश्मीरबाबत खरोखर इतकी काळजी आणि आस्था असती, तर या परिषदेला मेळावे जमवून भारताचा तिरस्कार करण्याची आठवण सतत करून देण्याची आवश्यकताच वाटली नसती!
पाकिस्तान आता आपल्या भूतकाळाशी फारकत घेऊ लागला आहे आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आता एक फलनिष्पत्तीकडे आणि विकासाकडे डोळसपणे पहाणारे, परस्पर सहकारावर भर देणारे आणि शेजारी राष्ट्रांशी शांततेने, सौहार्द्राने रहाणारे राष्ट्र बनू इच्छित आहे. म्हणूनच काश्मीर समस्येवर दोन्ही बाजूंचा फायदा होईल असा समंजस तोडगा काढून आणि जुना अव्यवहारी आणि आदर्शवादी पवित्रा सोडून तसा करार करण्याची संधी घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असे याकूबसाहेब शेवटी सांगतात.
मूळ लेख वाचा या दुव्यावर -
http://tribune.com.pk/story/477777/maybe-we-have-forgotten-kashmir/
टिपा -
[१] Time to forget Kashmir या लेखात याकूबसाहेब यांनी फक्त मनमोहन सिंग यांच्या 'पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर भर न देता आपल्या अंतर्गत समस्यांकडे जास्त निकडीने लक्ष द्यायला हवे', या विधानाचाच उल्लेख करून न थांबता, त्यांनी मौलाना फजलूर रहमान यांच्या पाकिस्तानच्या 'जमीयत उलेमा इस्लाम (फजल गट) या विरोधी पक्षाचे नेते मौलाना फज़ल उर रहमान 'अर्थातच पाकिस्तानला राजनैतिक तोडगा हवा आहे. पण परिस्थिती खूपच बदललेली आहे. आता 'पाकिस्तान कसे वाचवायचे' ही समस्या मोठी झाली असून त्यामुळे काश्मीर जिंकून घेण्याची संकल्पना मागे पडली आहे', या विधानाचाही उल्लेख केला आहे. याकूबसाहेब पुढे म्हणतात, की असे न परवडणारे भांडण करण्याचा मार्ग पाकिस्तानने निवडला नसता तर पाकिस्तानी लष्कर आपल्याच मुलकी सरकारला चार वेळा बरखास्त करण्याइतके मजबूत झालेच नसते. '१९८९पासून प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थिती असली तरी भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरने साक्षरता, आर्थिक प्रगती आणि दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत पाकिस्तानपेक्षाही जास्त प्रगती केलेली आहे. मग ते कशाला पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छितील? पाकिस्तानकडे त्यांना देण्यासारखे काय आहे?' असाही प्रश्न याकूबसाहेब या लेखात विचारतात!
पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते असेही ते लिहितात.
शेवटी ते म्हणतात, की जोवर पाकिस्तान आपले घर सावरत नाही, तोपर्यंत त्याने भारताच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याचे सोनेरी स्वप्न सोडून दिले पाहिजे. कारण जिथे आपल्या ताब्यात असलेल्या कित्येक भागावर आपल्या सरकारचे नियंत्रण नाहीं आणि जिथे पाकिस्तानी जनता आर्थिक आणि सुरक्षेसंबंधीच्या काळजीत व्यग्र आहे तिथे गेली सहा दशके प्रगतीच्या वेगळ्याच कक्षेत असलेला आणखी एक मोठा मुलुख काबीज करण्याची आशा बाळगणे अगदीच हास्यास्पद आहे.
शेवटी ते म्हणतात, की काश्मीरबाबतचा आपला आक्रमक पवित्रा आपण केवळ काश्मीरमधील दुःख भोगणार्या मुस्लिम बांधवांसाठीच नाहीं तर भारतामध्ये असेच दुःख भोगणार्या १४ कोटी मुस्लिम बांधवांच्या हितासाठी सोडला पाहिजे कारण जोवर पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण आक्रमक आणि प्रतिकूल आहे तोपर्यंत हिंदू बहुसंख्य भारतात या मुस्लिमांकडे संशयी नजरेनेच पाहिले जाईल.
४ जुलै २०११ रोजी प्रकाशित झालेला हा संपूर्ण लेख वाचा या दुव्यावर:
http://tribune.com.pk/story/202209/time-to-forget-kashmir/
[२] गिलगिट हा पूर्वीच्या काश्मीर राज्याचा भाग होता व १९४८ सालच्या युद्धबंदीनंतर या काश्मीर संस्थानाचा गिलगिट-बाल्टिस्तानसह ४० टक्के भाग पाकिस्तानकडे राहिला तर जम्मू आणि लडखसह ६० टक्के भारताकडे. (http://en.wikipedia.org/wiki/Gilgit)
[३] आज भारतात बॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणावर पाकिस्तानी कलाकार घुसले आहेत तिकडे पहाता हे खरेच वाटते.
मूळ लेख ७६० शब्दांचा असून त्याला आलेल्या १०४ प्रतिसादांतील शब्दसंख्या आहे ७००० पेक्षा जास्त आहे. सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या वाचकांनी-भारतीय आणि पाकिस्तानी-प्रतिसाद दिलेले आहेत. अनेक वाचकांनी टोपणनावाने प्रतिसाद लिहिलेले असून, त्यात भारतीय मुस्लिम वाचकांचा समावेश असल्यामुळे सरहद्दीच्या कुठल्या बाजूच्या वाचकाने कुठला प्रतिसाद दिला आहे हे ओळखणे कठीण होते. अपेक्षेनुसार कांहीं प्रतिसाद अगदी ’कट्टर’ असले तरी बरेच समंजसही आहेत. पण कुणी कट्टर लिहिले आहेत आणि कुणी समंजस हे वरील कारणांमुळे कठीण काम झाले आहे. लेखाइतकेच हे प्रतिसादसुद्धा वाचनीय आहेत. दुवा उघडून सर्वांनी जरूर वाचावेत.
माझेही ४ प्रतिसाद असून त्यातून माझी या लेखाबद्दलची मते स्पष्ट होतात. त्यातला पहिला आहे 'Hats off to the courage of the author Yaqoob Khan for writing such an article! The Kashmir issue is being kept alive only by Pakistani Armed Forces lest its very ‘raison d’etre’ vanishes & they can't continue enjoying good things their present Military job offers them."
दुसरा प्रतिसाद होता, 'Whatever be the magic, but whenever one writes an article discussing 'Kashmir' on both sides of the border between India & Pakistan, one gets maximum responses! I think both the countries are obsessed by Kashmir. Does Kashmir deserve so much obsession? NO!
माझा तिसरा प्रतिसाद विजय कौल या काश्मिरी हिंदू वाचकाच्या प्रतिसादाला होता. 'Kashmir is not a local aberration, it is as global as is Palestine, Chechnya, or for that matter the rising number of festering sores in the name of the game called Jihad.
Let’s make no mistake. Kashmiris continue to be brainwashed and have landed themselves in a hot soup of jihadi imbroglio, after ethnically cleansing their co-kashmiris who did not convert over centuries into Islam.'
या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता. त्यात मी लिहिले होते, 'Very well said, Mr Kaul, yourself a Kashmiri, probably displaced from his own homeland ethnical cleansed by fellow Kashmiris while Indian government just stood by watching! What a pity!'
आणि शेवटचा प्रतिसाद होता झीशान नावाच्या एका वाचकाला उत्तर म्हणून. या वाचकाला सर्वात जास्त लोकांनी लक्ष्य केलेले दिसले. माझ्या प्रति-उत्तरात मी लिहिले होते, "@Zeeshan: Please don’t get emotional!
(1) Just see how many Pakistani artists are working in so-called Bollywood and enjoying prosperity. Also don’t forget that Indians support their talent though they are not Indians.
(2) To your rhetorical question 'And, where do you get the idea of 'improvement of the situation in Indian-Occupied Kashmir'? From Kashmiris or Indians?" I say, "My dear friend, Kashmiris participated overwhelmingly in most of the elections held in J&K voted to a level of 80% turn out trashing the 'Boycott' calls by separatists leaders. What does it tell you?
(3) If Kashmiris are to be given an option of 'Independence', it must be given to every State in India and Pakistan from Kashmir to the North to Tamilnadu to the South & Balochistan to the West to Assam to the East! I am sure both India & Pakistan don’t want to test this option! After all Pakistan has not yet given 'independence' to what it wrongly calls as 'Azad' Kashmir!
Mr Yaqooob Khan Bangash has done a yeoman's service by writing this article and it is in Pakistan’s interest to rea d & study it dispassionately!
पाकिस्तानला आत्मनिरीक्षण-आत्मपरीक्षण करून भारताशी मैत्री केली पाहिजे असे माझे मत पूर्वीपासून आहे. हा (आणि असेच आयाज अमीर, कामरान शफी यांचे) लेख वाचल्यावर ते आणखीच दृढ झाले!
===============
सकाळच्या वाचकांचे प्रतिसाद"
===============
Sudhir Kale - बुधवार, 6 फेब्रुवारी 2013 - 01:09 PM IST
On 01/02/2013 08:37 PM Babare said: हा काळे लई danger आहे.
का हो बाबारेसाहेब, मी "लई डेंजर" का बरं? आणि तुमच्या नावाचा बरोबर उच्चार काय?
===============
===============
Babare - शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2013 - 08:37 PM IST
हा काळे लई danger आहे.
===============
===============
Sudhir Kale - शनिवार, 19 जानेवारी 2013 - 01:07 PM IST
अवंतिकाताई, आपले साद-प्रतिसाद भरकटू लागले
आहेत कीं काय अशी शंका येते. सर्व गोष्टींची पुरेपूर माहिती असायला मी
नक्कीच विकीपीडिया नाहीं. IRA चे & बास्क प्रदेशाचे उदाहरण केवळ इतर
देशसुद्धा बंडाळीला कसे तोंड देतात एवढ्यापुरतेच होते. मला बास्क
युद्धाबद्दलही तपशीलवार माहिती नाहीं. पण आयर्लंड व बास्क प्रदेशात मी
कामासाठी दोनदा गेलो आहे व त्यावेळी तिथल्या लोकांशी बोलताना थोडी-फार
माहिती मला कळली आहे. जी सीमीत स्वायत्तता ब्रिटनने "नऊ सौ चूहे खाके
बिल्ली हजको चली"च्या थाटात २० पेक्षा जास्त वर्षांनंतर उत्तर आयर्लंडला
दिली ती आपण काश्मीरला दीड-दोन वर्षातच दिली. माझा सार्वमताला कधीच विरोध
नाहीं, संयुक्त राष्ट्राने दिलेल्या निर्णयानुसार अटी पाळून झाल्यावर ते
नक्कीच घेतले जायला हवे. भारत त्यासाठी वचनबद्धच आहेच. फक्त आता १९४८ सालचा
“मतदारसंघ” कुठून आणायचा हा किचकट प्रश्न समोर आहे. आणि काश्मीरला आजादीचा
पर्याय द्यायचा असेल तर भारत-पाकिस्तानमधील प्रत्येक राज्याला तो दिला
जावा असेच प्रत्येक लोकशाहीप्रेमीला वाटेल. पण ते व्यवहार्य आहे का?
जर कुणी बंड केले तर त्याचा बीमोड तर करावा लागणारच असेही मला वाटते!
===============
===============
Sudhir Kale (Part-1 sending a second time) - शनिवार, 19 जानेवारी 2013 - 12:37 PM IST
बाबारे साहेब (नावाचा उच्चार बरोबर आहे
ना?), (भाग-१) पंजाबी, सिंधी, पठाण अशा तर्हेच्या वर्गवारीने एकेका
जमातीच्या स्वभावविशेषाबद्दलचे आडाखे बांधणे हे बरोबर नाहीं व म्हणून मला
तरी ते पटत नाहीं. असेच आडाखे आपण सर्व पाकिस्तान्यांबद्दल मांडतो आणि
तेसुद्धा आपल्याबद्दल मांडतात. असेच चालू ठेवायचे काय?
आपण आपल्या शेजारी रहाणार्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी निकराचे भांडण झाले
तर घर बदलून ती समस्या मिटवून टाकतो, पण तशी "सोय" दोन शेजारी देशांमध्ये
केली जाणे शक्य नाहीं. मग काय करायचे? जन्मभर लढत रहायचे?
आज जन्मजन्मांतरीचे वैरी भासणार्या कट्टर शत्रूराष्ट्रांमध्ये दाट सलोखा
झाल्याचे पहातोच ना? उदा. जर्मनी आणि फ्रांस, फ्रांस आणि इंग्लंड, इ. मग
उद्या भारत व पाकिस्तानमध्ये कां नाहीं दोस्ती होणार?
मला पटलेला एक मुद्दा मी वारंवार मांडत असतो. तो म्हणजे भारत-पाकिस्तानात
युद्धसदृश परिस्थिती चालू ठेवण्यात फक्त एका संस्थेला आस्था आहे आणि ती
संस्था म्हणजे पाकिस्तानी लष्कर. पाकिस्तानी लष्कराने अद्याप एकही युद्ध
जिंकलेले नाहीं पण आपल्या Public Relations द्वारा ते आपला रुबाब मात्र
चांगलाच राखून आहे. (भाग-२ पहा)
Sudhir Kale (In two parts, pl publish together) - शनिवार, 19 जानेवारी 2013 - 10:31 AM IST
बाबारे साहेब (नावाचा उच्चार बरोबर आहे
ना?), (भाग-२) मी नियमितपणे पाकिस्तानी वृत्तपत्रें वाचतो. प्रत्येक
युद्धात हरलेल्या या संस्थेबद्दल पाकिस्तानी वृत्तपत्रांत अर्धे प्रतिसाद
"पाकिस्तानचा एकुलता एक तारणहार" असा सुद्धा केला गेलेला मी वाचला आहे. ती
त्यांची लायकी नसली तरी ते रुबाब बाळगून आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यास
हा रुबाब तर नाहींसा होईलच पण या संस्थेचे महत्वही शून्यावर येईल. असे होऊ
नये म्हणून हे लष्कर शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाना खीळ घालेल. म्हणूनच
अचानक कारगिल युद्ध होते, अचानक २६/११ चा अतिरेकी हल्ला होतो, अचानक
नियंत्रण रेषेवर आपल्या जवानांच्या देहाची विटंबना केली जाते. या सार्या
घटना अतीशय योजनाबद्ध पद्धतीने आखल्या जातात व त्यांवर अंमलही केला जातो.
अशा वेळी आपण जर शांतता-पर्व रद्द केले तर या कपटी, लबाड लष्कराच्या
सेनानींच्या अभद्र योजनांना आपण नकळत यश देत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे!
याविरुद्ध आपल्या सरकारने उघड विधाने करून पाकिस्तानी लष्कराचे भांडे फोडून
मुलकी सरकारला "आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लष्कराला सांभाळा" असेच
सांगितले पाहिजे व तशी वागणूक ठेवली पाहिजे.
===============
===============
Avantika - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 06:13 PM IST
Sudhir ji,
I think you missed my point about IRAs. I knew that you haven't studied
IRA issues because if you had, you wouldn't have included them in the
discussion. As I said before, Britain realized that brutally attacking
them won't solve the issue and they started "understanding" why they
were so angry. That was my point. And now the same people who did
bombings in England recently shook hands with the queen of England. And
nobody in the world learned from it.I didn't understand why you copied
and pasted the numbers about the IRA.I was not arguing if IRA killed
people or not. I wanted to show how the terrorism was stopped.
Please answer why Junaghad was attacked by Indian army when the muslim
king declared that he wanted join Pakistan.Also, I am not sure why
article 370 was considered essential, if kashmir was part of India. Even
then, politicians had realized the uniqueness and complications of the
issue.
===============
===============
Babare - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:35 PM IST
मी बर्याेपैकी वरच्या हुद्द्यावर असलेल्या
एका जकार्तास्थित पाकिस्तानी गृहस्थाशी बोलत होतो. त्यावेळी मी नुकतेच नवाज
शरीफ यांच्या "आपण भारताला आपला सगळ्यात मोठा शत्रू समजणे थांबविले
पाहिजे"...वगैरे पाक्यांचे सगळे बकवास असते..विशेषतः पंजाबी पाकिस्तानी तर
महा गोडबोलू आणि नेमका पाठीत खंजीर खुपसणारे.. पठाण त्यामानाने शब्दाला
जगणारे..उगाच काही फेकू नका..त्यांच्याशी बोलून आपला वेळ वाया
घालाव्ण्यासारखे आहे.
===============
===============
Sudhir Kale - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:33 PM IST
अवंतिका मॅडम, जुनागडमध्ये जसे सार्वमत झाले
तसे काश्मीरमध्येही झाले असतेच. भारत सरकारने तसे वचनही दिलेले होते. पण
पाकिस्तानने केलेली चढाई नडली. या करणीला केवळ पाकिस्तानच जबाबदार आहे.
आझादी मिळण्याचा पर्यायच नव्हता व आजही नाहीं आहे. त्यामुळे तो प्रश्नच
उपस्थित होत नाहीं. कुणी बंडाळी केली तर ती कुठल्याही देशाचे सरकार मोडून
काढणारच मग भारताने का मोडून काढू नये?
===============
===============
Sudhir Kale (3 parts, pl publish together) - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:18 PM IST
अवंतिका मॅडम, भाग-१: संस्थानांच्या
विलीनीकरणाचा विषय चर्चिला जात असताना आझादीचा विषय कशाला?
जुनागडला सार्वमत घेतले गेले व विषय संपला. काश्मीरमध्येही सार्वमत घेतले
गेले असते पण पाकिस्तानच्या सैन्याने आधीच चढाई केली व भारतालाही सैन्य
पाठवावे लागले. संयुक्त राष्ट्रात हा तंटा नेण्याची चूक नेहरूंनी केली पण
संयुक्त राष्ट्रात संमत झालेल्या ठरावात आक्रमक पाकिस्तानने आपले सैन्य
मागे घ्यायचा आदेश होता. तो जर पाकिस्तानने पाळला असता तर हा विषय
तेंव्हांच संपला असता. पण तसे झाले नाहीं व म्हणून सार्वमत घेतले गेले
नाहीं. ते “जम्मू-काश्मीर” राज्यात जसे घेतले गेले नाहीं तसेच
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर संस्थानातही घेतले गेले नाहीं. आज
अशा सार्वमताला कांहीं अर्थच उरलेला नाहीं कारण हिंदूचे स्थलांतर
झाल्यामुळे मतदारसंघच शिल्लक उरलेला नाहीं. आणि “चॅदम हाऊस” अहवालानुसार आज
पाकिस्तानात जायला काश्मिरी तयारच नाहींत. पाकिस्तानला आता माहीत आहे कीं
काश्मीर कुठल्याही मार्गाने आपल्याला मिळणार नाहीं म्हणून तेही आता
आजादीच्या वार्ता करत आहेत. पण संस्थानांच्या विलीनीकरणात आजादी हा पर्याय
नव्हताच! (भाग-२ पहा)
===============
अवंतिका मॅडम, भाग-२: IRA बद्दल माझा अभ्यास
पुरेसा नसल्यामुळे मी खालील उतारे देत आहे. माझा मुद्दा फक्त बंडाळी
मोडताना होणार्याब रक्तपाताचा होता. इथे ३००० लोकांच्या मृत्यूचा उल्लेख
खाली आहे.
http://www.infoplease.com/spot/northireland1.html
Although armed hostilities between Catholics and Protestants largely
subsided after the 1921 agreement, violence erupted again in the late
1960s; bloody riots broke out in Londonderry in 1968 and in Londonderry
and Belfast in 1969. British troops were brought in to restore order,
but the conflict intensified as the IRA and Protestant paramilitary
groups carried out bombings and other acts of terrorism. This continuing
conflict, which lingered into the 1990s, became known as "the
Troubles."
Despite efforts to bring about a resolution to the conflict during the
1970s and 80s, terrorist violence was still a problem in the early 90s
and British troops remained in full force. More than 3,000 people have
died as a result of the strife in Northern Ireland.
अवंतिका मॅडम, भाग-३: On Feb. 5, 2010, with
the signing of the Hillsborough Castle Agreement, Gordon Brown of
Britain and Brian Cowen, prime ministers of England and Ireland,
respectively, created a breakthrough in the Northern Ireland peace
process. According to the terms of the accord, Britain will hand over
control of the six counties' police and justice system to Northern
Ireland. The shift to local control of the courts, prosecution system,
and police has been the most important and contentious of the issues
plaguing the tenuous power-sharing government. The agreement passed its
first test on March 9, when the Northern Ireland Assembly voted its
support 88–17, setting the stage for the April 12 power transfer
deadline. "For the first time, we can look forward to policing and
justice powers being exercised by democratic institutions on a
cross-community basis in Northern Ireland," Cowen said.
आज “जम्मू-काश्मीर” राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कारभार
करत आहे.
Avantika - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:42 AM IST
Sudhir ji,
I don't think you have read in detail how the issue of IRA was solved by
Great Britain. Instead of attacking and killing them, they understood
their problems and tried honestly to solve them and the issues were
resolved. The simplest and the best way to reduce terrorism is not to
get involved in it. That's exactly Indian government and public is
unable to understand. In Punjab, they did the same thing, got involved
in the things then shouldn't have and then paid a very heavy price.
You didn't comment on the Gir issue.(i.e., It was run by a muslim king
and population majority was Hindu. When he declared that he was going to
join Pakistan, Indian government attacked the land and took control. So
your argument about Hari Singh is not consistent and is very weak in my
opinion. May be you can explain better. You can also watch Arundhati
Roy's videos on youtube to see what her opinions are. She sounds
reasonable and articulate.
===============
===============
Sudhir Kale - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 09:01 PM IST
Mr Rupe, thanks for your words of
appreciation. Ms Tanvi, I am happy that my comments made you look at
issues a bit differently. I reiterate that there is nothing
extraordinarily wrong that we are doing in J&K. All countries
(including Pakistan, UK & Spain & many others) deal with
insurgency & sedition activities in the same way. So we should stop
feeling guilty about it!
===============
===============
tanvi - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 05:17 PM IST
सर, स्पष्टीकरण आवडल. तुमचे लेख खूप आशावादी
असतात. वाचताना अस वाटत कि काश्मीर प्रश्न उद्याच सुटेल कि काय. पण
वस्तुस्तिथी तशी नाही. तुमच्यासारखा विचार करणारे काही लोक
पाकिस्तानमध्येहि जन्मायला हवेत.
===============
===============
Vishwanath Rupe विश्वनाथ रूपे (मुणगे) - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 04:58 PM IST
खूप सुंदर लेख ..नुसती बोलणी ..करून काही
होणार नाही
पाक ने खरेच डोळे उघडण्याची वेळ आहे. किती दिवस ढोंग करणार? आजची तरुण
पिढी डोळस आहे आणि सत्या सत्याचा विचार करणारी आहे. अपेक्षा आहे कि काश्मीर
स्थिती बदलेल..
===============
===============
सुधीर काळे - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 09:02 AM IST
अवंतिकाताई, काश्मीरसारखी समस्या फक्त
भारतापुरतीच मर्यादित आहे असे नाहीं. भारताप्रमाणेच आयर्लंड आणि
स्पेनमध्येही रक्तलांछित लढे चालू आहेत. इतरत्रही चालू आहेत. आयर्लंडच्या
"आयरिश रिपब्लिकन आर्मी"ने खूपच प्रभावीपणे व नेटाने लढा दिला. तो मोडून
काढायला ब्रिटिश सैन्य तिथे तैनात केले होते! अलीकडेच कुठे जराशी शांतता
आलेली आहे. स्पेनच्या 'बास्क' या प्रांताला काश्मीरसारखीच आजादी हवी आहे,
पण तिथेही स्पॅनिश सेना व पोलीस लढत आहेत, बॉम्ब फुटत आहेत व रक्त वहात
आहे! पण म्हणून इंग्लंड व स्पेनने त्या प्रांतांना आजादी दिलेली नाहीं.
स्पेनने थोडी थातुर-मातुर स्वायत्तता दिलेली आहे (जशी आपणही काश्मीरला
दिलेली आहे). तरी भारताला उगीचच अपराधीपणाचे ओझे खांद्यावर घेऊन वागण्याची
गरज नाहीं. (The Basque Country or Basque Autonomous Community was
granted the status of nationality "within Spain", attributed by the
Spanish Constitution of 1978 to separate ethnic realities.) म्हणजे काय?
फक्त मखलाशी!
===============
===============
Sudhir Kale (in 2 parts, pl publish together) - बुधवार, 16 जानेवारी 2013 - 09:23 PM IST
Ms Avantika, Part-1: Democracy does not
give a right to any State to secede! At the time of partition, there
were innumerable Princely States in the then undivided India. The areas
which were beyond the Princely States were split on the basis of
population. But the Princely States were given a choice to either merge
with India or Pakistan. None was given the choice to remain independent.
(If the choice of ‘independence’ had been given, we would be having
50-odd states of “United States of India”!) If Plebiscite is (ever) held
on the basis of these choices by a miracles, I am sure that Kashmiris
will vote for merger with India. Pakistan-occupied Kashmir (PoK) has
remained demographically unchanged since partition (unlike in J&K in
India, most of the Hindu population was forced to leave). As it is
having overwhelming Muslim population, it is “assumed”, perhaps wrongly,
that the Muslim population there is happy to be ruled by Pakistan.
Chatham Report says it is not so! (Pl see part-2)
Ms Avantika, Part-2: The only reason why Pakistan has NOT yet taken such a plebiscite in PoK to build moral pressure on India? Because they are clear about the outcome that will show that PoK is not at all keen to remain in Pakistan! So Kashmiris can vote for one of these two choices if ever a plebiscite is held which stipulates some pre-conditions which will never be fulfilled. That is why I said that plebiscite is a dream, a good dream. But today taking a plebiscite is meaningless because the Hindu population of J&K has been forced out from their homes. A plebiscite today is meaningless as a major portion of the Kashmiri population which was supposed to vote is no more in Kashmir. Plus Pakistan has not fulfilled an important pre-requisitse to plebiscite viz. vacating the occupied part of the Valley. But if & when it is held, rest assured that Kashmiris will vote to remain in India! Can we hold a plebiscite in Punjab, Assam, Nagaland, etc? Surely we can. But will we? We better not!
===============
Ms Avantika, Part-2: The only reason why Pakistan has NOT yet taken such a plebiscite in PoK to build moral pressure on India? Because they are clear about the outcome that will show that PoK is not at all keen to remain in Pakistan! So Kashmiris can vote for one of these two choices if ever a plebiscite is held which stipulates some pre-conditions which will never be fulfilled. That is why I said that plebiscite is a dream, a good dream. But today taking a plebiscite is meaningless because the Hindu population of J&K has been forced out from their homes. A plebiscite today is meaningless as a major portion of the Kashmiri population which was supposed to vote is no more in Kashmir. Plus Pakistan has not fulfilled an important pre-requisitse to plebiscite viz. vacating the occupied part of the Valley. But if & when it is held, rest assured that Kashmiris will vote to remain in India! Can we hold a plebiscite in Punjab, Assam, Nagaland, etc? Surely we can. But will we? We better not!
===============
Avantika - बुधवार, 16 जानेवारी 2013 - 06:45 PM IST
Sudhir ji,
If India was considered a democracy, why did Indian government commit
fraud in the elections in 1986? Also, if we are a democracy, why
kashmiris are NOT allowed to decide their own fate. Your point about
Hari Singh is very weak because the kingdom of Gir had Hindu majority
and a muslim king. When he decided to join Pakistan, Indian government
attacked the area and took complete control. The issues of other states
like Punjab are experienced because of Indian government's brutal
policies. If the government acts with some sanity, we wouldn't have so
many problems. Just see the comments here. Nobody even seems to
understand what democracy means and how it was used in other nations.
===============
===============
Sudhir Kale - मंगळवार, 15 जानेवारी 2013 - 05:41 PM IST
तन्वी मॅडम: भाग-१- मी कांहीं युद्धकुशल
सेनानी नाहीं पण सारासार विचार करून खालील मुद्दे इथे लिहिण्याचे धाडस
करतो. पाकिस्तानशी संबंध कसे असावेत याचा विचार करायचा असेल तर खालील
विषयांवर-ते कितीही अप्रिय असले तरी-चर्चा व्हायलाच हवी! (१) वेगाने पुढे
जात असलेली शांततेची वाटचाल पाकिस्तानी लष्कराला कधीच पाहवणार नाहीं! कारण
त्यांचे महत्व आणि “कमाई” कमी होईल याची त्यांना सार्थ भीती वाटते. सोवियेत
महासंघाचे तुकडे झाल्यावर सर्वात आधी काय झाले? अमेरिकेने व पश्चिम
युरोपीय देशांनी सैन्यबलात आणि संरक्षण खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केली.
असे पाकिस्तानात झाले तर वैभवात आणि थाटात आयुष्य कंठणार्या् आजच्या
सेनाधिकार्यां्ना ते कसे चालेल? ते नक्की त्यात मोडता घालतीलच. पण त्यावेळी
आपण शांतीचे प्रयत्न सोडून दिल्यास त्यांचे उद्देश आपण सफल करून
दिल्यासारखेच आहे. म्हणून अशा वेळी आपण मुलकी सरकारला समर्थन देत “तुमच्या
खोडसाळ सेनाधिकार्याआच्या कटाकडे आम्ही लक्ष न देता शांतीच्या वाट चालत
राहू” हा संदेश द्यायला हवा असे मला वाटते. (भाग-२ पहा)
===============
तन्वी मॅडम: भाग-२- (२) आज जर भारत
पाकिस्तानात युद्ध पेटले तर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना ते “निर्णायक”
अवस्थेपर्यंत लढता येणार नाहीं. म्हणून युद्ध हा पर्याय होऊच शकत नाहीं.
(३) पूंचसारख्या खोडसाळ कुरबुरी झाल्या तर तिथल्या सेनाधिकार्या्ला पलटवार
करण्याचे सर्वाधिकार आपल्या सरकारने दिले आणि त्याने केलेल्या कृत्याला
पूर्ण समर्थन दिले तर असे विषय तिथल्या तिथेच संपतील. (४) २६/११ सारखी
दुस्साहसे पाकिस्तानने केली तर मुलकी सरकारला बजावून पण विश्वासात घेऊन
आपल्या वायुदलाने त्यांच्या आतंकवादी “मुजाहिदीन” निर्माण करणार्या
“कारखान्यांना” उडवून लावण्यासारखा केंद्रित हल्ला चढविल्यास (focused air
attack) पाकिस्तानी सेनाधिकार्यांवर वचक बसेल आणि असली दुस्साहसे ते करणार
नाहींत. (समाप्त)
tanvi - सोमवार, 14 जानेवारी 2013 - 04:31 PM IST
शांतता कोणाला नको आसते.पण एका t v show
मध्ये एक expert म्हणाले होते पाकिस्तान बरोबर deal कारण खूप मुश्किल आहे
कारण तो बेजबाबदार देश आहे. आगदी बरोबर आहे.डोकेफिरूशी कसलीही बोलणी करण
मूर्खपणाच आहे.
===============
===============
Sudhir Kale - सोमवार, 14 जानेवारी 2013 - 09:49 AM IST
I would strongly recommend to every Indian
to read a fabulous book "Being Indian" written by our current
Ambassador to Bhutan, Mr Pavan Kumar Verma. It lists all the bad traits
of us Indiana & tries to explain their roots. It includes why we are
corrupt, why we commit treason by 'selling' our country to invaders,
why democracy t has been so successful in India (it is the fastest way
to ‘prosper’) & how we are still 'comfortable' within ourselves even
after committing serious sins like treason. It holds a mirror in front
of our eyes! I started to translate it with permission from Mr Verma,
but have shelved that project till I retire!
===============
===============
vishwanata hulsure - सोमवार, 14 जानेवारी 2013 - 12:32 AM IST
निष्कर्ष वाचायला मिळतील. ज्यांना ३९ पानी
अहवाल वाचायला वेळ नसेल त्यांनी त्या अहवालाच्या शेवटी असलेले
"Conclusions" ची एक-दोन पाने तरी जरूर वाचावीत. काश्मिरी जनतेला अजीबात
पाकिस्तानात जायचे नाहीं. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. तसे स्वातंत्र्य
देऊ केल्यास भारत/पाकिस्तानातील किती राज्ये विभक्त व्हायला तयार होतील
याचा हिशेब व्यक्तिनिहाय वेगळा येईल. पण तो सुखावह नक्कीच नाहींय्. मग
जम्मू-काश्मीरचे कौतुक कशाला? पंजाबला वेगळं होऊ द्यायचं? पूर्वेकडील अनेक
राज्यांना वेगळं होऊ द्यायचं? विचार करा जरा!
===============
===============
Sudhir Kale (4 parts, publish all together) - रविवार, 13 जानेवारी 2013 - 11:33 AM IST
विजय-जी, (भाग-१/४) तुम्ही उपस्थित केलेले
प्रतिहल्ला न करण्याच्या आपल्या धोरणाचे आणि जवानांच्या विधवांच्या दु:खाचे
प्रश्न अतीशय वाजवी आहेत. त्यातूनही आपले जवान आणि सेनापती खरोखर अतीशय
शूर असताना अशी पाळी यावी याचे नक्कीच वैषम्य वाटते. जेंव्हां शिवाजी
महाराज, थोरले बाजीराव पेशवे, थोरले माधवराव पेशवे, लाल बहादुर शास्त्री
(१९६५), इंदिरा गांधी (१९७१), वाजपेयी (कारगिल) यांच्यासारखे कणखर नेतृत्व
लाभले तेंव्हा आपला विजय झाल्याचे आपण पहातोच. पण आपले राजकीय नेतृत्व शूर
आणि निर्णय घेण्याबाबत तत्पर आणि निश्चयी आहे काय या प्रश्नाचे उत्तर
साधारणपणे नकारार्थीच मिळेल. कारण ते paralysis by analysis या रोगामुळे
गारद होते. नुकतेच आपले दोन जवान नियंत्रण रेषेवर निर्दयपणे मारले गेले,
त्यांच्या पार्थिवाची विटंबना झाली ही कुणालाही संताप आणणारीच घटना आहे. पण
ज्या सरकारने १६६ निष्पापांचा बळी घेणार्या २६/११ च्या घटनेनंतर-सारे जग
आपल्या पाठीशी उभे असतानासुद्धा-निषेधापलीकडे कांहींच केले नाहीं त्या
सरकारकडून आपण कसली अपेक्षा करायची? पण आपण आताच्या सरकारलाच कशाला बोल
लावायचा? (भाग २ पहा)
Vijay - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 06:35 PM IST
विजय-जी: भाग-२/४ "Mild-and-meek Hindu" अशी
आपली प्रतिमा सार्याय जगात आधीपासूनच आहे! अगदी पृथ्वीराज चौहान
यांच्यापासून! आपण खूप शूर आहोत पण आपण आणि आपले नेते निर्दय, खुनशी कधीच
होऊ शकले नाहींत. आपण साधारणपणे क्षमाशील आहोत, एक वेळ भाऊबंदकीत सूड घेऊ
पण परकीय आक्रमकांविरुद्ध सूड घेतल्याची उदाहरणे फारशी नाहींत. जर आपण तसे
असतो तर पूर्वी राजपूत योद्धे जसे आपल्या बायकांचा जोहार करून केसरिया
पुकारून शत्रूवर तुटून पडत तसे आपणही आक्रमक झालो असतो. पण आपण असे शत्रूवर
कधी तरी तुटून पडलो होतो काय? लाहोर आक्रमण व बांगलादेशमुक्तीच्या मोहिमा
सोडल्यास मला तरी अशी घटना आठवत नाहीं. असे असण्यात तसे कांहीं चूक आहे असे
नाहीं. पण अशा क्षमाशील राष्ट्राने स्वत:ला बदलले तरी पाहिजे किंवा "हम तो
ऐसे हैं भैय्या" म्हणत स्वत:च्या क्षमाशील कृत्यांची इतर राष्ट्रांच्या
निर्घृण कृत्यांशी तूलना करून वाईट तरी वाटून घेऊ नये.
आपण जर आपापसात सतत यादवी युद्धात गर्क असलेल्या अफगाणी सेनेसारखे लढाऊ,
(माथेफिरू म्हणता येण्याएवढे) शूर आणि कडवे असतो तर आपल्या देशात बहामनी,
मोंगल आणि शेवटी इंग्लिश सत्ता आलीच नसती! (भाग ३ पहा)
विजय-जी: (भा-३/४) सार्याॉ जगावर सत्ता
गाजविणार्यात ब्रिटिश सेनेला अफगाणिस्तानवर युनियन जॅक फडकावण्यात अपयश आले
हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच त्यांनी रशियन सेनेच्या आणि त्या पाठोपाठ
अमेरिकन आणि नाटो सेनेच्या पदरी अपयश टाकले हेही आपण पहातोच. आज थायलंड,
इराण आणि अफगाणिस्तान ही तीन आशियाई राष्ट्रे कधीही पारतंत्र्याच्या
जोखडाखाली नव्हती त्या यादीत भारताचेही नांव दिसले असते. या उलट आपल्याला
तर ब्रिटिश साम्राज्याच्या राजमुकुटाच्या कोंदणातले रत्न म्हणून हिणवले
जाते!
व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचा जो पराजय झाला त्याबद्दल मी कुठेतरी वाचले आहे
कीं अमेरिका या युद्धात हरली कारण अमेरिकन सरकारने या युद्धाचे नियंत्रण
सायगॉनकडे न देता वॉशिंग्टनकडे ठेवले व युद्धभूमीवरील वस्तुस्थितीबद्दल
फारशी माहिती नसलेल्या सरसेनापतींनी आणि राजकीय नेत्यांनी paralysis by
analysis ला बळी पडून पराभव करून घेतला. आपले काश्मीर नियंत्रणरेषेवरील
युद्ध कुठून लढले जात आहे? पूंचमधून कीं दिल्लीवरून? शास्त्रींनी आणि
इंदिराजींनी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सेनापतीना दिले तेंव्हा ज. चौधरी
आणि फी.मा. मानेकशॉ यांनी विजय मिळवलाच. (भा ४ पहा)
===============
विजय-जी: (शेवटचा भाग) पण या विजायांतून
कांहींही पदरी पडून न घेता ते विजय आपल्या दुबळ्या राजकीय नेतृत्वाने वायाच
घालविले तेही. त्यावेळी सिमला करारात आपण जिद्दीने उभे राहिलो असतो अतर
काश्मीर प्रश्न तेंव्हाच सुटला असता. (काश्मीर प्रश्न सुटल्यास आपले महत्व
शून्य होईल म्हणून मुलकी सरकारची तयारी असूनही) पाक लष्कर हा प्रश्न सोडवू
देत नाहीं.) असाच आपला निर्णय घेण्यातील कमकुवतपणा आपल्याला पाकिस्तानी
अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या विमान चांचेगिरीतही दिसून आला. paralysis by
analysis मुळे अमृतसरला योग्य निर्णय ताबडतोब न घेतल्यामुळेच ते विमान
कंदाहारला जाऊ शकले आणि आपल्याच पोलिसंनी/जवानांनी पकडलेले अतिरेकी एकाद्या
नववधूला जशी पाठराखीण पाठवायची आपल्याकडे पद्धत होती तश्शीच शर्मनाक
’पाठराखण’ अतिरेक्यांना कंदाहारपर्यंत पोचवून आणताना जसवंतसिंगना करावी
लागली.
जोपर्यंत आपण ऐतिहासिक घटनांतून कांहींच शिकत नाहीं तोवर हे असेच चालायचे.
राष्ट्रपातळीवर गरज पडेल तेंव्हां क्रूर, निर्दय आणि कधीही क्षमा न करणारे
धोरण राबवायला आपण शिकलेच पाहिजे जेणे करून आपल्या शत्रूंना आपल्याबद्दल
(कींव न वाटता) भीती आणि दरारा वाटेल.
काश्मीर हे पाकिनी केलेला बागुल बुवा आहे,
ज्या याकुब खान चा लेख तुम्ही अनुवादित केला आहे त्याचाच बंधूनी आपल्या
सानिकांची शिरे कापली. जो पर्यंत पाकिस्तान संपत नाही तो पर्यंत काश्मीर
प्रश्न संपणार नाही. ह्या आधीचा तुमच्या काही पोस्टिंग मध्ये तुम्ही
पाकिस्तानशी dialogue सुरु करावा असे सुचित केले आहे. मी तुमचा मत्सर कशाला
करू तुम्ही काही M J Akbar, Inder Malhotra, Jag Narayan वगैरे नाही आहात.
===============
===============
Sudhir Kale - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 02:45 PM IST
मंगेश-जी, श्रीरंग-जी आणि तुम्हासारख्या
काश्मीरला प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या वाचकांच्या प्रतिसादांना मी खूप
महत्व देतो. मी स्वत: मात्र काश्मीरला अद्याप भेट दिलेली नाहीं. “आम्हाला
स्वतंत्र काश्मीरच हवे” असे काश्मिरींचे मत आहे असे चॅदम अहवालही सांगतो.
(खरंच या लेखाच्या किती वाचकांनी हा अहवाल वाचला आहे?)
असेच स्वतंत्र खलिस्तान आपल्या कांहीं शीख बांधवांनाही हवे होते, नागा
नागरिकांनाही ’नागालॅन्ड’चे वेगळे राज्य हवे होते. पण आपण कुणालाच असे
वेगळे राज्य दिले नाहीं. मग काश्मीरचे लाड कशाला?
प्रमोद-जी, नुसते शिक्षण नव्हे तर ’स्त्रीशिक्षणा’तच यशाची गुरुकिल्ली आहे.
जितक्या पाकिस्तानी स्त्रिया शिकतील तितकी त्यांची पुढील पिढी सुधारेल.
“जिच्या हाती पाळण्याची दोरी” हेच सांगते!
विजय-जी, माझे लेख कांहींना आवडतात. त्यामुळे असेल पण तुमचे बरेच प्रतिसाद
मला मत्सरापोटी दिलेले वाटतात. जळू नका, स्वत: लिहायला सुरुवात करा. मला
“काळे मामा” म्हणणे हाही त्यातलाच प्रकार. मी कधीही माझ्या वाचकांना असे
संबोधत नाहीं. निनादने मला “काका” म्हटले कारण तो मला माझ्या इतर
संस्थळावरील लेखनामुळे ओळखतो. पण तुम्ही नाहीं ओळखत मला!
===============
===============
K B Kale - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 10:07 AM IST
Viyayanna, This article is about Kashmir so stay with it.
===============
===============
Vijay - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 05:21 PM IST
काळे मामा;
ज्या दोन जवानांचा पाकिनी नुकताच खून केला त्यांचा विधवांना विचारा के
पाकिंशी कुठल्या स्तरावर चर्चा करावी? पाकीन वर विश्वास ठेवावा का ठेवू
नये? क्रिकेट खेळावे का खेळू नये? त्या अभागी विधवांचा निर्णय मला तरी
मान्य असेल.
===============
===============
pramod dalal - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 09:34 AM IST
फोडा -तोडा चे राजकारण ची फळे आज पाकिस्तान
आणि हिंदुस्तान भोगत आहे ,शिक्षण हाच दुवा आहे ,शिक्षित समाज दोन्ही
देशांना एका पातळीवर आणेल तो हिंदुस्थान साठी सुदिन असेल.
===============
===============
Mangesh Bendkhale ,Kolhapur - शनिवार, 5 जानेवारी 2013 - 02:26 PM IST
सुधीर सर मी राजा राणी travels मध्ये ८-९
वर्षे senior tour manager म्हणून काश्मीर खोऱ्या मध्ये वर्षातील ४ -५
महिने काम करण्यास मिळाले त्या वेळी वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांशी संबंध
आले मैत्री झाली पण मला एक हि कश्मीरी व्यक्ती पाकीस्थानात जाण्यास उचूक
असणारी दिसली नाही आगदी यावर मी त्यांच्याशी अनेकदा बोललो सुद्धा. पण
बहुसंख्या आगदी ७०-७५ % लोक मात्र काश्मीर स्वतंत्र झाले पाहिजे आसे माझ्या
जवळ स्पष्ट शब्दात बोलले
===============
===============
Sudhir Kale - शनिवार, 5 जानेवारी 2013 - 12:19 PM IST
It is India's because Hari Singh opted for
it & that was the understanding at the time of partition about all
Princely States.
Anyway, what is the alternative you are suggesting? Creation of DSI
(Divided States of India)? If it is clear that Kashmiris don't want to
join Pakistan, that's that!
By the way, did you read the Chatham House report? Hardly any districts
on both sides of the border opt for joining Pakistan.
Anyway I am going to be overseas for a week so may not be able to access
e-Sakal.
===============
===============
Avantika - शनिवार, 5 जानेवारी 2013 - 08:05 AM IST
Sudhir ji,
I think you are again missing the point. Kashmiris can select anything
based on THEIR choices. I never commented on that. The main issue is
regarding the article. The author is NOt stating that Kashmir is NOT a
Real issue. He is only showing the practical issues Pakistan might face
and therefore, he is discouraged.
What do you think? Do you think Kashmir belongs to India? If the answer
is Yes, on what basis?
===============
===============
Sudhir Kale (+5) - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 07:28 AM IST
अवंतिका मॅडम, (भाग-१) कधी-कधी मला वाटते
कीं आपण स्वत: उगीचच अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबून जातो. काश्मिरींना मुळीच
पाकिस्तानात जायचे नाहींय.
http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/0510pp_kashmir.pdf
हा दुवा उघडून आपण जर तिथला मजकूर वाचलात तर तुम्हाला नक्कीच थोडेसे बरे
वाटेल.
(१) इंग्लंडमधील "चॅदम हाऊस" या संस्थेने संपूर्ण काश्मिरी जनतेचे
(पाकव्याप्त काश्मीर व "जम्मू आणि काश्मीर") मत चाचपण्याचा प्रकल्प हाती
घेतला होता त्याचे निष्कर्ष वाचायला मिळतील. ज्यांना ३९ पानी अहवाल वाचायला
वेळ नसेल त्यांनी त्या अहवालाच्या शेवटी असलेले "Conclusions" ची एक-दोन
पाने तरी जरूर वाचावीत. काश्मिरी जनतेला अजीबात पाकिस्तानात जायचे नाहीं.
त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. तसे स्वातंत्र्य देऊ केल्यास
भारत/पाकिस्तानातील किती राज्ये विभक्त व्हायला तयार होतील याचा हिशेब
व्यक्तिनिहाय वेगळा येईल. पण तो सुखावह नक्कीच नाहींय्. मग जम्मू-काश्मीरचे
कौतुक कशाला? पंजाबला वेगळं होऊ द्यायचं? पूर्वेकडील अनेक राज्यांना वेगळं
होऊ द्यायचं? विचार करा जरा!
===============
===============
अवंतिका मॅडम, (भाग-२)
(२)
http://www.2point6billion.com/news/2010/05/28/chatham-house-pakistan-option-unpopular-with-kashmiris-5787.html#comments
या दुव्यावर चॅदम हाऊस अहवालावर २०१० साली झालेली चर्चा वाचायला मिळेल.
त्या चर्चेत मीसुद्धा हिरीरीने भाग घेतला होता व माझे प्रतिसाद तिथे
वाचायला मिळतील.
हे प्रतिसाद (भाग्-१ व २) मी आतापर्यंत तीन वेळा लिहिले पण अद्याप
मॉडरेटर्सचे तिकडे लक्ष गेलेले नसावे. बघू यावेळी नशीब साथ देते का!
===============
===============
Sudhir Kale - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 08:13 PM IST
Mr Vijay, thanks. For a moment I wondered
whether your keyboard is programmed to throw my name automatically when
you type 'K' as a part of 'predictive' text.
I had asked this question to Mr Sachin so that he tells me which exact
incident or incidents he is referring to. I am still waiting for his
reply.
===============
===============
Avantika - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 06:26 PM IST
Just because the article is stating
something that is good for India, it is published without any real
analysis of the root cause of the issue. Basically, Indians are
continuing brutal occupation of kashmir, and Pakistan, because of its
internal struggles and monumental socio-religious issues, is unable to
forward the matter at this stage. Really sad to see that even Indians
are completely unaware about 1986 elections in Kashmir and how Indian
government rigged it. Indian army is creating hell for the kashmiris and
is involved in rapes and murders.
Indian government is creating this false impression that Kashmiris want
Indian control. That is complete nonsense.
===============
===============
Sudhir Kale - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 06:09 PM IST
Mr Vijay,
Who is this "Kale" in the pair off "Hari Singh and Kale" you have
referred to? I don't remember having carried out any atrocities in
J&K! Or is it a spelling mistake?
===============
===============
Vijay - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 05:35 PM IST
In my earlier post I meant "Hari Singh and Kashmir".
My apologies!
===============
===============
Vijay - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 05:03 PM IST
Mr. Kale, If you "Google" Hari Singh and
Kale, atrocoties commted by both Pakistanis and Indian Armys etc. all
the points raised by Mr. Sachin and much more wil pop up.
===============
===============
Sudhir Kale - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 03:43 AM IST
Dear Mr Sachin, thanks A lot. May I
request you to provide the relevant links regarding point no. 2.
Unfortunately my own two posts about Chatham House study are not getting
published though I posted already twice. I will try again later.
===============
===============
Sachin - बुधवार, 2 जानेवारी 2013 - 09:58 PM IST
The author is missing some of the key
points about Kashmir:(Just like most of the Indian Journalists)
1. Pakistani guy is only claiming that currently Pakistan is unable to
pursue that ambition, he is not saying the original issue itself is
invalid. (They are currently helpless because of other issues created by
Americans, Russians, and Islamists like Taliban and Northern Alliance.)
2. Kashmir was never part of India. It was a kingdom.Pakistani tribes
tried attacking it to take control when they realized that India might
control it. Hari Sing, because of the brutal attack agreed to join
India. It was decided that India will use elections for the kashmiris to
decide if they want to stay with India, which they never did. In fact,
in 1986, Indian government rigged the elections and created hell for
kashmiris with brutal army control. (Read how Army killed so many
Kashmiris on the net. They have found mass graves with more than 10,000
bodies)
===============
===============
hanumant bansode mumbai - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 10:15 PM IST
काळे साहेब, कोणत्याही विषयाचे तुम्ही अतिशय सुंदर विवेचन करता! छान लेख.
धन्यवाद सर या लेखाबद्दल.
===============
===============
Sudhir Kale - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 08:10 PM IST
Mr Vijay, slow down, will you? Slow down!
Where have I ever said that I am trying to change the mindset of
anybody? It was YOU who used the word "मानसिकता"! I don't have the
leadership qualities or charisma to change the mindset of anybody-in
India or in Indonesia. I read and if I find something good, something
different, I introduce it to the readers. You are attaching to me too
much importance that I don't deserve. I have some opinions which I
present. Some agree with me, some disagree. But you are trying to
attempt a "leg glance" or a "late cut" to "deflect" a non-existent ball!
Have some mercy, please!
===============
===============
Vijay - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 07:28 PM IST
Mr. Kale; I have following two comments on
your post of 01/01/2013.
1) Trying to change mindset will be seen as interfering in internal
affairs of another country. Also by the same logic Pakistanis will have
the right to advocate Jihadi thinking in our youth and we will have no
moral grounds to object.
2) Also have you tried to change mindset of young Muslim’s in Bali, the
country where you live? Have you made any efforts to change the mindset
of Aburahman Rohim son of Abu Bakar Bashir who is serving a 15-year
sentence for helping set up a paramilitary training camp in Aceh in
2010. But inside he is still surrounded by acolytes and young prisoners,
and boasts in a written interview with The Sunday Age that he is ”busy
spreading the word of Allah to the people. Aburahman Rohim is a senior
teacher at the Ngruki School his father founded. He defends the teaching
of jihad, saying: ”More than 60 verses of the teaching of jihad are in
the Koran. Should we delete those verses?”
===============
===============
Sudhir Kale (Author) - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 03:09 PM IST
विजय-जी, दोन महत्वाचे मुद्दे! मी
बर्याेपैकी वरच्या हुद्द्यावर असलेल्या एका जकार्तास्थित पाकिस्तानी
गृहस्थाशी बोलत होतो. त्यावेळी मी नुकतेच नवाज शरीफ यांच्या "आपण भारताला
आपला सगळ्यात मोठा शत्रू समजणे थांबविले पाहिजे" अशा अर्थाच्या निवेदनाची
तारीफ करणारे एक पत्र "जकार्ता पोस्ट"मध्ये लिहिले होते. त्यावर उद्देशून
हे गृहस्थ म्हणाले कीं आपण एकाद्या सदनिकेत किंवा घरात रहात असलो आणि
शेजार्या शी खूप कडाक्याचे भांडण झाले आणि लक्षात आले कीं आपल्यातून आता
विस्तवसुद्धा जाणार नाहीं तेंव्हां आपण घर बदलू शकतो, पण अशी सोय दोन
देशांना नसते. शेजारी राष्ट्रे कायमची आपली शेजारीच रहातात. त्यामुळे तंटे
सोडवून मैत्री करणे आवश्यकच असते. हे आता दोन्ही बाजूंना पटले आहे असे
त्याचेही मत!. दुसरी बाब हीं कीं आपल्या देशाचे संरक्षण करणे हा जर आपला
business असेल तर सरहद्दीपलीकडे काय चालले आहे हे पहाणे हाही आपला
business आपोआपच होतो. पाकिस्तानला वाचविणे आपल्या हिताचे असेल तर आपण ते
केले पाहिजे. मी फक्त माझ्या वाचनात आलेले मुद्दे इथे आपल्यासारख्या
वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी इथे मांडतो. सर्व वाचकांना २०१३च्या शुभेच्छा.
===============
===============
Shrirang - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 11:56 PM IST
धन्यवाद सर या लेखाबद्दल. मी काही
महिन्यांपूर्वीच श्रीनगर व भोवताल फिरून आलो. आजकाल अतिरेकी कारवायांमध्ये
जोरदार घसरण झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होते व स्थानिकांना रोजगार
मिळतोय. श्रीनगर व आजू बाजूला जेवढी शुद्ध शाकाहारी भोजनालये दिसली तेवढी
तर महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात दिसणार नाहीत. जागोजाग शाळा व
महाविद्यालये व्यवस्थित चालू असलेली दिसली. गेल्या दोन दशकात विविध केंद्र
सरकारांनी राबवलेले सबुरीचे धोरण आता फळे देवू लागले आहे. अन यामुळे
पाकिस्तानचा कांगावा काश्मीरमध्ये चालणे कमी होत आहे. सदर लेखात जे
सांगितले आहे की सीमेपलीकडील नव्या पिढीला या मुद्द्यावर विशेष स्वारस्य
उरलेले नाही ते आपल्यासाठीही तेवढेच हिताचे आहे जेवढे त्यांच्या....
===============
===============
Vijay - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 07:37 PM IST
Mr. Kale we need to mind our own business
and protect our country. Why is it our job to try to change the mindset
of young pakistanis, again which is impossible? These people cannot
think! Look at the Unites States, they tried to change Middle East and
after two major wars, Iraq and Afghanistan, 3 trillion dollaes, 10,000
dead Americans, 300,000 injured Americans they have nothing to show.
Again Pakistan is not ours to save, it is the most untrustworthy country
on the face of the earth.
===============
===============
Sudhir Kale - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 04:05 PM IST
Mr Shinkar, I agree. Education of masses,
particularly mass education of women, will make a quantum change in
thinking of young Pakistanis. As more & more Malala Yusufzais stand
up & get good education in science, technology, economics, etc, a
new 'army' of educated mothers will create a new generation of
Pakistanis that thinks totally differently. This brave little girl, I
think, represents new Pakistani mentality
===============
===============
mandar - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 03:47 PM IST
आत्ता पाकिस्तानची अंतर्गत स्थितीच खराब आहे
म्हणून सर्व शांततेची कबुतरे उडवत आहेत. सिअचीन मधून दोघेही मागे जाऊ,
व्यापार सुरु करू, क्रिकेट खेळू, विसा धोरण शिथिल करू, वगैरे. पण भारता
बद्दल द्वेष गेला नाहीये. ते एकही पाऊल मागे घ्यायला तयार नाहीत. भारताला
मोस्ट फेवोरीते चा दर्जा द्यायला, २६/११ च्या खटल्यात, अतिरेकी हस्तांतर
करण्यास, कैदी सोडायला, क्रीक हद्द मान्य करायला, हिंदुनवरचे अत्याचार बंद
करण्यासाठी टाळाटाळ. आजही सर्व राजकीय पक्ष द्वेशाचीच भाषा करतात. लोकांचे
ताजे ओपिनिओन तसेच आहे.
===============
===============
Vijay - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 06:49 PM IST
पाकिस्तानी अथवा कुठल्याही मुस्लिम देशाची मानसिकता बदलणे शक्य नाही. Egypt , Libya
मध्ये काय झाले? ज्या American राजदूताने लिबियाला मदत Kelli त्याला Thani ठार मारला
===============
===============
Sachin Thawari - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 01:42 PM IST
Yes, it is true that young generation want
to fly everywhere.So why not Pakistani youth.They too want free from
all issues.
===============
===============
Prathamesh, Nagpur - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 12:38 PM IST
पाकिस्तानने आत्मपरीक्षण करून भारताशी
असलेले शत्रुत्व सोडून द्यावे इथपर्यंत ठीक आहे, पण पाकिस्तानातल्या इतक्या
गोंधळातही याकूब भारतातल्या मुसलमानांची चिंता करताहेत आणि आपल्या
देशबांधवांना करायला सांगत आहेत. भारतीय हिंदूंना मात्र त्यांच्या
पाकिस्तानातल्या बांधवांवर कसले अत्याचार होताहेत ह्याची जाणीव असूनसुद्धा
तिकडे ते काणाडोळा करत आहेत. ही अतिशोकाची गोष्ट आहे.
===============
===============
Dr Sandeep Gunjal, Navi Mumbai - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 08:40 AM IST
काळे साहेब, कोणत्याही विषयाचे तुम्ही अतिशय सुंदर विवेचन करता!
===============
===============
Ajay Pavashe - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 07:07 AM IST
छान लेख. पाकिस्तान ने खरेच डोळे उघडण्याची
वेळ आहे. किती दिवस ढोंग करणार? आजची तरुण पिढी डोळस आहे आणि सत्यासत्याचा
विचार करणारी आहे. अपेक्षा आहे कि काश्मीर स्थिती बदलेल, सकारात्मकतेने
....!
===============
===============
shrikant - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 06:09 AM IST
It's amazing yet understandable that
people of Pakistan are now foucssing on their 'own development and
continuation of freedom' instead of talking and interfering in Kashmir.
===============
===============
Amit Shinkar - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 06:03 AM IST
Nice article Mr. Sudhir. The next
generation is now very well aware about the outcomes of the "Hate
Politics" initiated by the Britishers and followed by the Congress party
in Hindustan... same thing applies to the youth of Pakistan as well...
Wait for few more years,,, as the more and more population will get
educated, the so called politicians can't make Us fool anymore... and
that day would be the Foundation day of our India, dreamed by Us!!! Jai
Hind!!!
===============