स्वत:चा 'रेगन' निवडायला निघालेले भारतीय मतदार!
लेखक-संकलक : सुधीर काळे
sbkay@hotmail.com
Published: Monday, April 28, 2014
भारतात ८१ कोटींपेक्षा जास्त मतदार असून,
२०१४ची निवडणूक ही जगातील सर्वांत जास्त मतदारांनी भाग घेतलेली निवडणूक
ठरली आहे. भारतीय जनता सध्या आपल्या १६व्या लोकसभेसाठी ५४३ खासदार
निवडण्यात गुंतलेली आहे. ७ एप्रिलला सुरू झालेले हे मतदान नऊ टप्प्यांनंतर
१२ मे रोजी संपेल व त्यानंतर १६मे रोजी मतमोजणी सुरू होऊन बहुदा त्याच
दिवशी संध्याकाळपर्यंत भारतीयांना आपला पुढील पाच वर्षांसाठीचा भाग्यविधाता
कोण आहे हे कळेल.
आपली ही पाच आठवडे चालणारी निवडणूक जगातली सर्वात जास्त कालावधी घेणारी आणि आतापर्यंतच्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा जास्त खर्चिक निवडणूक आहे. ३५०० कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार असून, त्यात सुरक्षेवर होणारा खर्च धरलेला नाही. शिवाय विविध राजकीय पक्ष ३००० कोटी खर्च करतील, असा अंदाज आहे. हा खर्च २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूक खर्चाच्या तिप्पट असणार आहे. अमेरिकेने गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केलेल्या ७०० कोटी डॉलर्सच्या खर्चाच्या (४२०० कोटी रुपये) तुलनेत आपला दुसरा क्रमांक लागतो!
१५ व्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असून, त्या आधी नव्या सरकारचा शपथविधी करविण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत.
आजच्या तारखेच्या परिस्थितीनुसार बहुतेक सर्व समीक्षकांचे, संख्याशास्त्रज्ञांचे व वेगवेगळ्या मतचांचण्या घेतलेल्यांचे एकमत आहे की या वेळी नरेंद्र मोदी विजयी होण्याची दाट शक्यता आहे.
भारताचे पंतप्रधान होऊ घातलेले मोदी आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन (१९८१ ते १९८९) यांच्यात बर्याच बाबीत साम्य दिसून येते. दोघांचा जन्म-खास करून मोदींचा-कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात झाला. रेगन व मोदी हे दोघेही राज्यपातळीवर तुफान लोकप्रिय व यशस्वी नेते ठरले आहेत. रेगन कॅलिफोर्नियाचे अधिशासक (गव्हर्नर)[१] होते तर मोदी गेली १२ वर्षें महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. १९११ साली जन्मलेले रेगन वयाच्या ६९ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झाले तर १९५० साली जन्मलेले मोदी विजयी झाल्यास वयाच्या ६४ व्या वर्षी आपले पंतप्रधान होतील. रेगन यांच्याप्रमाणेच मोदीही आपल्या 'मोदीनॉमिक्स' या मुक्त व्यापारव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेचे आणि भ्रष्टाचारविरोधी सुधारणांचे उघड, खंदे पुरस्कर्ते आहेत. रेगन यांच्या 'रेगनॉमिक्स' या संज्ञेची आठवण करून देणार्या 'मोदीनॉमिक्स'ने (मोदींच्या आर्थिक धोरणाने) गुजरातची आर्थिक भरभराट घडवून आणलेली आहे!
काही बाबतीत ते वेगळेही आहेत. उदा. रेगन यांनी पूर्वी हॉलीवूडच्या Love in the Air, Dark Victory, Knute Rockne, All American[२] व King's Row अशा सुमारे वीस चित्रपटांत नायकाच्या भूमिका केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा 'ग्लॅमर' आहे जो मोदींच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही, पण त्यांचे व्यक्तिमत्व काही इतर स्वभावविशेषांमुळे भारतीय जनतेला भावले आहे. रेगन यांनी जेन वायमनशी व तिच्याबरोबर घटस्फोट झाल्यावर नॅन्सी डेव्हिसशी अशी दोन लग्ने केली, याउलट मोदींचा जरी जशोदाबेन यांच्याशी विवाह झालेला असला तरी त्यांनी रा.स्व.संघाच्या कार्याला वाहून घेतल्यामुळे वैवाहिक जीवनाकडे पाठ फिरविली होती. रेगन रोज जास्त तास काम करणार्यातले नव्हते. ते रोज रात्री ८ तास झोप घेत व त्यांना अर्ध्या रात्रीत कुणी उठवले नाही. एकदा आपल्या सहकार्यांना आपल्या धोरणाचे ठळक मुद्दे नीट समजावून सांगितले की त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ते त्या त्या सहकार्यावर सोडत असत. या उलट मोदी रोज १६ तास आपल्या कार्यालयात कार्यमग्न असतात.
रेगन व मोदी यांच्या टीकाकारांमध्येही खूप साम्य आहे. अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगन यांचा जसा तिटकारा करत असे अगदी तस्साच तिटकारा भारतातील आचार-विचाराने स्वत:ला उच्चभ्रू समजणारा वर्ग मोदींचा करतो[३]. एकेकाळी चहा विकणार्या व धड इंग्लिश बोलू न शकणार्या मोदींकडे ही मंडळी तुच्छतेने बघतात. (जणू काही रशियाचे सर्वेसर्वा पुतिन आणि चीनचे सर्वेसर्वा शी चिनपिंग (Xi Jinping) 'फाडफाड' इंग्लिश बोलतात!) रेगन निवडून आल्यास कसा हाहाकार उडेल याबद्दलची एक यादी (आणि घोर ताकीदही) त्यांच्या टीकाकारांनी अमेरिकन जनतेला दिली होती, आपल्याकडेही आपले मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जानेवारी २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून दिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रकारपरिषदेत सांगितले की भाजपने पंतप्रधानपदासाठी निवडलेले उमेदवार नरेंद्र मोदी जर खरोखरच पंतप्रधान झाले तर भारताच्या दृष्टीने तो एक अनर्थ ठरेल. पण जसा रेगन यांच्या कारकीर्दीत सोव्हिएत राष्ट्रसंघाचा पाडाव झाला तसाच चमत्कार चीन-पाकिस्तानच्या संदर्भात मोदींच्या हातूनही घडो अशीच आशा त्यांच्या भारतीय समर्थकांना आहे.
हा अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगनना 'वर्णद्वेष्टा'ही मानत असे. कंबरडं मोडणार्या, संख्येने प्रचंड होत जाणार्या सरकारी नोकरशाहीऐवजी तगड्या, धडधाकट व वाढत्या व्यापारावर विसंबणार्या अर्थव्यवस्थेवर विश्वसणार्या व्यक्तींना समाजवादाकडे झुकणारा उच्चभ्रू वर्ग सर्वसाधारणपणे 'वर्णद्वेष्टा' ही संज्ञा वापरतो. उलट अशी अर्थव्यवस्थाच गरीबांची आणि अल्पसंख्याकांची उन्नती करण्याचा उत्तम मार्ग आहे, असे रेगन आणि मोदी मानतात.[४] प्रचंड संख्येची सरकारी नोकरशाही वैयक्तिक व उद्योगशहांच्या लोभी वृत्तीमुळे व एकमेकांच्या क्षेत्रांत हस्तक्षेप केल्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फैलावण्यास पोषक ठरते व शेवटी अशी नोकरशाही कुठल्याही समस्येचा उलगडा करण्यात असमर्थ ठरते असे रेगन समजत. मोदींचाही भर शासनापेक्षा सुशासनावरच आहे.
गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव असाच आहे.
मोदींचे टीकाकार स्वाभिमानी हिंदूधर्मीय असलेल्या मोदींनाही वर्णद्वेष्टे समजतात. ही संज्ञा जशी रेगनना लागू पडत नव्हती, तशीच ती मोदींनाही लागू पडत नाही. या संज्ञेचा दुरुपयोग मोदींचे राजकीय विरोधक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व त्यातून अल्पसंख्याकांचे अनुमोदन स्वत:कडे खेचण्यासाठी करतात. गुजरातेत हिंदू यात्रेकरूंना नेणार्या रेल्वेला लावलेल्या आगीत ६० लोक मृत्यू पावले. या जाळपोळीला मुस्लिम दंगलखोर जबाबदार होते हे कानावर आल्यावर मुस्लिमविरोधी उग्र दंगल उसळली आणि त्यात शेकडो लोक बळी पडले. मोदींच्या कारकीर्दीवर २००२ सालच्या या मृत्यूंचे सावट पडलेले आहे. दंगलीत सापडलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी संचारबंदी पुकारणे, लष्कराला पाचारण करणे व दंगलखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देणे यासारखी अनेक पावले दंगल आटोक्यात आणण्यासाठी मोदींनी उचलली. तरीही त्यांच्यावर दंगलीपासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे उपाय न योजल्याचेच नव्हे तर दंगलींकडे काणाडोळा केल्याचेही आरोप त्यांच्या विरोधकांनी केले आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एका खास अन्वेषण गटाची (SIT) स्थापना केली. या गटाच्या अन्वेषणातून मोदींविरुद्धचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे उघडकीस आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे जाहीर केले. मोदींच्या राजकीय विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून त्यांच्याविरुद्धची चारित्र्यहननाची व वर्णद्वेष्टे म्हणण्याची मोहीम (आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थही) सुरूच ठेवला आहे.
भारतात इतर धर्म स्थापले जाऊन त्यांची भरभराट झालेली आहे हे भारतीय हिंदू बहुसंख्यांकांच्या सहिष्णुतेला मिळालेले प्रमाणपत्रच आहे. याउलट शेजारच्या पाकिस्तानात व बांगलादेशात तेथील मुस्लिम बहुसंख्यांकांच्या मतांनुसार न वागल्यास तेथील अल्पसंख्यांकाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे व त्या कशाबशा जिवंत आहेत. अल्पसंख्यांकांबाबत असहिष्णू असल्याचे बिनपुराव्याचे आरोप मोदींवर करताना ते दक्षिण आशियातील चालू परिस्थितीतील प्रमाणांकडे दुर्लक्ष करून बोलत असतात.
पाकिस्तानप्रणीत दहशतवादाविरुद्ध कठोर धोरण स्वीकारण्याचे आश्वासन मोदींनी दिलेले आहे. हे अमेरिकेच्या धोरणाशी सुसंगत आहे. मुस्लिम दहशतवादी जगातील सर्व बिगर-मुस्लिम राष्ट्रांबरोबर लढत आहेत. त्यात थायलंडमधील बुद्धधर्मीय आले, नायजेरिया, फिलिपीन्स, चेचन्या, सायप्रस, कोसोवो, बोस्निया, मॅसेडोनिया, आयव्हरी कोस्ट, सुदान (व पूर्वी इंडोनेशियाचा भाग असलेल्या) लेस्ते-तिमूर या देशांतील ख्रिश्चनधर्मीय आले, इस्रायलमधील ज्यूधर्मीय आले, संपूर्ण मुस्लिम जगतातील अल्पसंख्यांक आले व शेवटी 'दहशतवादाविरुद्धच्या युद्धा'च्या आघाडीवर असलेल्या भारतातील बहुसंख्यांक हिंदूही आले.
मोदींचा पाकिस्तानविरुद्धच्या खंबीर पवित्रा रेगन यांच्या सोवियेत संघराज्याविरुद्धच्या खंबीर पवित्र्याची आठवण करून देतो व म्हणून मोदींना अमेरिकेने स्वाभाविक मित्र मानणे अमेरिकेच्या हिताचे आहे.
मोदी जर खरोखर भारताचे पंतप्रधान झाले तर तो भारताच्या राजकारणातील एका महत्वाच्या बदलाचे निदर्शक ठरेल. पंतप्रधानपदासाठी मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत नेहरू-गांधी 'राजघराण्या'चे वंशज राहुल गांधी. स्वातंत्र्यप्राप्तीपासून या घराण्याने भारतावर थोडा काळ सोडला तर सातत्याने राज्य केलेले आहे. इटलीत जन्मलेल्या आणि भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधींच्या पत्नी व राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी सध्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. राजीव गांधी इंदिरा गांधींचे सुपुत्र आणि भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे नातू होत.
या सर्व गांधी कुटुंबियांचा महात्मा गांधींशी कांहीच संबंध नाहीं. इंदिरा गांधींनी ज्या गृहस्थाशी लग्न केले त्याने आपले मूळ आडनाव बदलून गांधी ठेवून घेतले आणि पहाता-पहाता या 'गांधी' नावाने जणू जादूच केली आणि ते कायमचे 'नेहरू' या राजवंशाला जोडले गेले. नेहरू राजवंशाच्या (आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या) कारकीर्दीत भारत आपल्या खर्याखुर्या आर्थिक क्षमतेची पातळी कधी गाठूच शकलेला नाही! याचे कारण आहे काँग्रेस पक्षाचे पक्षपाती, भ्रष्ट, बेगडी समाजवादी धोरण! बर्याच लोकांना असे वाटते की 'मोदीनॉमिक्स'मुळे भारताची स्वाभाविक उद्योजकता तिच्या बंधनांतून मुक्त होऊन तिच्यात एक नवा जोश उत्पन्न होईल व त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती उंच भरार्या मारू लागेल. मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला गुजरातचा आर्थिक विकास सर्व विभागांना-खास करून गरीबांना[५]- एक वरदान ठरला आहे. हा भक्कम पुरावा भविष्यकाळातील भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने आशादायक आहे.
अमेरिकेतील काही वर्तुळांतील मंडळींनी मोदींना जणू वाळीतच टाकलेले आहे. अशाच अमेरिकन मंडळींनी एके काळी रेगन यांनाही वाळीत टाकले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील नोकरशहांमध्ये खूप आधीपासून डाव्या विचारसरणीच्या उच्चभ्रूंचा प्रभाव व वर्चस्व आहे. आणि हा उच्चभ्रू गट आजपर्यंत मोदींना अमेरिकेला भेट देण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा नाकारत आलेला आहे. मोदींवर आग पाखडणारे प्रमुख टीकाकार आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहाचे सदस्य कीथ एलीसन. यांनी काही लोकांना हाताशी धरून मोदींना अमेरिकेचा व्हिसा अद्यापपर्यंत तरी यशस्वीपणे नाकारलेला आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात अमेरिकेला भेट देण्याचे टाळावे, असे मला वाटते. आजच्या जागतिक राजकीय पटावर आशिया खंडाचे वाढते महत्व व तेथील चीनचा वाढता प्रभाव पहाता आज तरी अमेरिकेला भारताची जास्त गरज आहे व त्यादृष्टीने हे धोरण चांगलेच ठरेल, असे मला वाटते.
अर्थक्षेत्रातील सरकारी हस्तक्षेप, आपल्या पित्त्यांना पक्षपात करून सवलती देणाचे प्रकार, भ्रष्टाचार अशा गोष्टींना प्रखर विरोध करणार्या मोदींची धोरणे रेगन यांच्या धोरणांशी खूप मिळती-जुळती आहेत. थोडक्यात असे दिसते की भारताला आपले 'देसी' रेगन सापडलेले आहेत! या उलट आपल्या चुकीच्या धोरणांमुळे नोकरशाहीच्या भाराखाली वाकलेल्या अमेरिकेला स्वत:चा 'अमेरिकन मोदी' शोधावा लागणार आहे काय?
रेगन यांच्याबद्दल बरेच लोक म्हणतात की ते एक आदर्श किंवा परिपूर्ण व्यक्ती कधीच नव्हते व त्यांनी खूप चुकाही केल्या. पण ट्रूमनपासून तो ओबामापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षात जर कुणी एका राष्ट्राध्यक्षाने अमेरिकन जनतेला ते अमेरिकन असल्याबद्दल व अमेरिकन राष्ट्राबद्दल अभिमान वाटू दिला असेल तर तो रेगन यांनीच. मला खात्री आहे की मोदींच्या कारकीर्दीनंतर भारतीयांनाही असेच वाटेल.
रेगन यांच्याप्रमाणे मोदीही उपजत लोकनायक आहेत. रेगन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे अनेक डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते (सिनेटर्स व प्रतिनिधीगृहाचे सभासद) “रेगन डेमोक्रॅट्स” म्हणवून घेऊ लागले. मोदी पंतप्रधान झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार-खासदार स्वत:ला “मोदी काँग्रेसजन” म्हणवून घेऊ लागले तर त्यात नवल वाटायला नको!
टिपा व संदर्भ:
[१] राज्यपाल हा शब्द तितकासा योग्य वाटत नाही
[२] या चित्रपटात त्यांनी जॉर्ज “द गिप्पर” गिप या सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचे काम केले होते व त्यामुळे त्यांना 'गिप्पर (Gipper)' असे टोपणनावही पडले.
[३] अमेरिकेत आहेत की नाहीत माहीत नाही, पण गोर्या लोकांच्या, खास करून ब्रिटिशांच्या, होकाराने धन्य पावणारे उच्चभ्रू भारतात आजही आहेत. आयुर्वेद श्रेष्ठ आहे हे पटविण्यासाठी आजही आपल्यातले काही ढुढ्ढाचार्य गोर्या लोकांनी आयुर्वेदाला दिलेले प्रशस्तीपत्रक वापरताना आपण पाहतोच ना?
[४] जसे मोदी “शासन कमी, पण सुशासन हवे” यावर भर देतात तसेच रेगनही म्हणायचे की सरकार हे कुठल्याही समस्येवरचा उतारा नाही, उलट सरकारचे फाजील अस्तित्वच एक समस्या आहे. (In this present crisis, government is not the solution to our problem; government is the problem.) अर्थात हे अगदी टोकाची भूमिका झाली कारण या विधानाने अमेरिकन जनतेची दिशाभूल झाली व ते आता आपल्या सरकारलाच शत्रू मानू लागले आहेत असे मानणारेही अमेरिकन आहेत. सरकार कधी-कधी समस्या असू शकते पण सरकार हीच एक समस्या आहे असे नाही. व्यक्तींमध्ये व भांडवलशहांमध्ये राजकीय भांडणे लावणारी लोभी वृत्तीच समस्या बनू शकते व मग सरकार कुठलीही समस्या सोडवायला असमर्थ बनते हा गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव आहेच.
[५] मोदींनी प्रथमच जाती-धर्माचा उपयोग न करता आर्थिक विकास व सुशासन या मुद्द्यांवर निवडणूक लढविल्यामुळे नेहमीचे मुद्दे वापरता येईनासे झाले, म्हणूनच की काय, पण गुजरातचा आर्थिक विकास हा एक वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. तो गरीबांनाही कसा एक वरदान ठरला आहे हे 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रकाशित झालेल्या खालील लेखात वाचता येईल.
http://indianexpress.com/article/opinion/columns/gujarats-inclusive-growth/99/
loksatta.comhttp://www.loksatta.com/loksabha/sattarth-blog-on-ronald-reagan-narendra-modi-463460/
आपली ही पाच आठवडे चालणारी निवडणूक जगातली सर्वात जास्त कालावधी घेणारी आणि आतापर्यंतच्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा जास्त खर्चिक निवडणूक आहे. ३५०० कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार असून, त्यात सुरक्षेवर होणारा खर्च धरलेला नाही. शिवाय विविध राजकीय पक्ष ३००० कोटी खर्च करतील, असा अंदाज आहे. हा खर्च २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूक खर्चाच्या तिप्पट असणार आहे. अमेरिकेने गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केलेल्या ७०० कोटी डॉलर्सच्या खर्चाच्या (४२०० कोटी रुपये) तुलनेत आपला दुसरा क्रमांक लागतो!
१५ व्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असून, त्या आधी नव्या सरकारचा शपथविधी करविण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत.
आजच्या तारखेच्या परिस्थितीनुसार बहुतेक सर्व समीक्षकांचे, संख्याशास्त्रज्ञांचे व वेगवेगळ्या मतचांचण्या घेतलेल्यांचे एकमत आहे की या वेळी नरेंद्र मोदी विजयी होण्याची दाट शक्यता आहे.
भारताचे पंतप्रधान होऊ घातलेले मोदी आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन (१९८१ ते १९८९) यांच्यात बर्याच बाबीत साम्य दिसून येते. दोघांचा जन्म-खास करून मोदींचा-कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात झाला. रेगन व मोदी हे दोघेही राज्यपातळीवर तुफान लोकप्रिय व यशस्वी नेते ठरले आहेत. रेगन कॅलिफोर्नियाचे अधिशासक (गव्हर्नर)[१] होते तर मोदी गेली १२ वर्षें महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. १९११ साली जन्मलेले रेगन वयाच्या ६९ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झाले तर १९५० साली जन्मलेले मोदी विजयी झाल्यास वयाच्या ६४ व्या वर्षी आपले पंतप्रधान होतील. रेगन यांच्याप्रमाणेच मोदीही आपल्या 'मोदीनॉमिक्स' या मुक्त व्यापारव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेचे आणि भ्रष्टाचारविरोधी सुधारणांचे उघड, खंदे पुरस्कर्ते आहेत. रेगन यांच्या 'रेगनॉमिक्स' या संज्ञेची आठवण करून देणार्या 'मोदीनॉमिक्स'ने (मोदींच्या आर्थिक धोरणाने) गुजरातची आर्थिक भरभराट घडवून आणलेली आहे!
काही बाबतीत ते वेगळेही आहेत. उदा. रेगन यांनी पूर्वी हॉलीवूडच्या Love in the Air, Dark Victory, Knute Rockne, All American[२] व King's Row अशा सुमारे वीस चित्रपटांत नायकाच्या भूमिका केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा 'ग्लॅमर' आहे जो मोदींच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही, पण त्यांचे व्यक्तिमत्व काही इतर स्वभावविशेषांमुळे भारतीय जनतेला भावले आहे. रेगन यांनी जेन वायमनशी व तिच्याबरोबर घटस्फोट झाल्यावर नॅन्सी डेव्हिसशी अशी दोन लग्ने केली, याउलट मोदींचा जरी जशोदाबेन यांच्याशी विवाह झालेला असला तरी त्यांनी रा.स्व.संघाच्या कार्याला वाहून घेतल्यामुळे वैवाहिक जीवनाकडे पाठ फिरविली होती. रेगन रोज जास्त तास काम करणार्यातले नव्हते. ते रोज रात्री ८ तास झोप घेत व त्यांना अर्ध्या रात्रीत कुणी उठवले नाही. एकदा आपल्या सहकार्यांना आपल्या धोरणाचे ठळक मुद्दे नीट समजावून सांगितले की त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ते त्या त्या सहकार्यावर सोडत असत. या उलट मोदी रोज १६ तास आपल्या कार्यालयात कार्यमग्न असतात.
रेगन व मोदी यांच्या टीकाकारांमध्येही खूप साम्य आहे. अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगन यांचा जसा तिटकारा करत असे अगदी तस्साच तिटकारा भारतातील आचार-विचाराने स्वत:ला उच्चभ्रू समजणारा वर्ग मोदींचा करतो[३]. एकेकाळी चहा विकणार्या व धड इंग्लिश बोलू न शकणार्या मोदींकडे ही मंडळी तुच्छतेने बघतात. (जणू काही रशियाचे सर्वेसर्वा पुतिन आणि चीनचे सर्वेसर्वा शी चिनपिंग (Xi Jinping) 'फाडफाड' इंग्लिश बोलतात!) रेगन निवडून आल्यास कसा हाहाकार उडेल याबद्दलची एक यादी (आणि घोर ताकीदही) त्यांच्या टीकाकारांनी अमेरिकन जनतेला दिली होती, आपल्याकडेही आपले मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जानेवारी २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून दिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रकारपरिषदेत सांगितले की भाजपने पंतप्रधानपदासाठी निवडलेले उमेदवार नरेंद्र मोदी जर खरोखरच पंतप्रधान झाले तर भारताच्या दृष्टीने तो एक अनर्थ ठरेल. पण जसा रेगन यांच्या कारकीर्दीत सोव्हिएत राष्ट्रसंघाचा पाडाव झाला तसाच चमत्कार चीन-पाकिस्तानच्या संदर्भात मोदींच्या हातूनही घडो अशीच आशा त्यांच्या भारतीय समर्थकांना आहे.
हा अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगनना 'वर्णद्वेष्टा'ही मानत असे. कंबरडं मोडणार्या, संख्येने प्रचंड होत जाणार्या सरकारी नोकरशाहीऐवजी तगड्या, धडधाकट व वाढत्या व्यापारावर विसंबणार्या अर्थव्यवस्थेवर विश्वसणार्या व्यक्तींना समाजवादाकडे झुकणारा उच्चभ्रू वर्ग सर्वसाधारणपणे 'वर्णद्वेष्टा' ही संज्ञा वापरतो. उलट अशी अर्थव्यवस्थाच गरीबांची आणि अल्पसंख्याकांची उन्नती करण्याचा उत्तम मार्ग आहे, असे रेगन आणि मोदी मानतात.[४] प्रचंड संख्येची सरकारी नोकरशाही वैयक्तिक व उद्योगशहांच्या लोभी वृत्तीमुळे व एकमेकांच्या क्षेत्रांत हस्तक्षेप केल्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फैलावण्यास पोषक ठरते व शेवटी अशी नोकरशाही कुठल्याही समस्येचा उलगडा करण्यात असमर्थ ठरते असे रेगन समजत. मोदींचाही भर शासनापेक्षा सुशासनावरच आहे.
गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव असाच आहे.
मोदींचे टीकाकार स्वाभिमानी हिंदूधर्मीय असलेल्या मोदींनाही वर्णद्वेष्टे समजतात. ही संज्ञा जशी रेगनना लागू पडत नव्हती, तशीच ती मोदींनाही लागू पडत नाही. या संज्ञेचा दुरुपयोग मोदींचे राजकीय विरोधक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व त्यातून अल्पसंख्याकांचे अनुमोदन स्वत:कडे खेचण्यासाठी करतात. गुजरातेत हिंदू यात्रेकरूंना नेणार्या रेल्वेला लावलेल्या आगीत ६० लोक मृत्यू पावले. या जाळपोळीला मुस्लिम दंगलखोर जबाबदार होते हे कानावर आल्यावर मुस्लिमविरोधी उग्र दंगल उसळली आणि त्यात शेकडो लोक बळी पडले. मोदींच्या कारकीर्दीवर २००२ सालच्या या मृत्यूंचे सावट पडलेले आहे. दंगलीत सापडलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी संचारबंदी पुकारणे, लष्कराला पाचारण करणे व दंगलखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देणे यासारखी अनेक पावले दंगल आटोक्यात आणण्यासाठी मोदींनी उचलली. तरीही त्यांच्यावर दंगलीपासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे उपाय न योजल्याचेच नव्हे तर दंगलींकडे काणाडोळा केल्याचेही आरोप त्यांच्या विरोधकांनी केले आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एका खास अन्वेषण गटाची (SIT) स्थापना केली. या गटाच्या अन्वेषणातून मोदींविरुद्धचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे उघडकीस आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे जाहीर केले. मोदींच्या राजकीय विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून त्यांच्याविरुद्धची चारित्र्यहननाची व वर्णद्वेष्टे म्हणण्याची मोहीम (आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थही) सुरूच ठेवला आहे.
भारतात इतर धर्म स्थापले जाऊन त्यांची भरभराट झालेली आहे हे भारतीय हिंदू बहुसंख्यांकांच्या सहिष्णुतेला मिळालेले प्रमाणपत्रच आहे. याउलट शेजारच्या पाकिस्तानात व बांगलादेशात तेथील मुस्लिम बहुसंख्यांकांच्या मतांनुसार न वागल्यास तेथील अल्पसंख्यांकाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे व त्या कशाबशा जिवंत आहेत. अल्पसंख्यांकांबाबत असहिष्णू असल्याचे बिनपुराव्याचे आरोप मोदींवर करताना ते दक्षिण आशियातील चालू परिस्थितीतील प्रमाणांकडे दुर्लक्ष करून बोलत असतात.
पाकिस्तानप्रणीत दहशतवादाविरुद्ध कठोर धोरण स्वीकारण्याचे आश्वासन मोदींनी दिलेले आहे. हे अमेरिकेच्या धोरणाशी सुसंगत आहे. मुस्लिम दहशतवादी जगातील सर्व बिगर-मुस्लिम राष्ट्रांबरोबर लढत आहेत. त्यात थायलंडमधील बुद्धधर्मीय आले, नायजेरिया, फिलिपीन्स, चेचन्या, सायप्रस, कोसोवो, बोस्निया, मॅसेडोनिया, आयव्हरी कोस्ट, सुदान (व पूर्वी इंडोनेशियाचा भाग असलेल्या) लेस्ते-तिमूर या देशांतील ख्रिश्चनधर्मीय आले, इस्रायलमधील ज्यूधर्मीय आले, संपूर्ण मुस्लिम जगतातील अल्पसंख्यांक आले व शेवटी 'दहशतवादाविरुद्धच्या युद्धा'च्या आघाडीवर असलेल्या भारतातील बहुसंख्यांक हिंदूही आले.
मोदींचा पाकिस्तानविरुद्धच्या खंबीर पवित्रा रेगन यांच्या सोवियेत संघराज्याविरुद्धच्या खंबीर पवित्र्याची आठवण करून देतो व म्हणून मोदींना अमेरिकेने स्वाभाविक मित्र मानणे अमेरिकेच्या हिताचे आहे.
मोदी जर खरोखर भारताचे पंतप्रधान झाले तर तो भारताच्या राजकारणातील एका महत्वाच्या बदलाचे निदर्शक ठरेल. पंतप्रधानपदासाठी मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत नेहरू-गांधी 'राजघराण्या'चे वंशज राहुल गांधी. स्वातंत्र्यप्राप्तीपासून या घराण्याने भारतावर थोडा काळ सोडला तर सातत्याने राज्य केलेले आहे. इटलीत जन्मलेल्या आणि भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधींच्या पत्नी व राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी सध्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. राजीव गांधी इंदिरा गांधींचे सुपुत्र आणि भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे नातू होत.
या सर्व गांधी कुटुंबियांचा महात्मा गांधींशी कांहीच संबंध नाहीं. इंदिरा गांधींनी ज्या गृहस्थाशी लग्न केले त्याने आपले मूळ आडनाव बदलून गांधी ठेवून घेतले आणि पहाता-पहाता या 'गांधी' नावाने जणू जादूच केली आणि ते कायमचे 'नेहरू' या राजवंशाला जोडले गेले. नेहरू राजवंशाच्या (आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या) कारकीर्दीत भारत आपल्या खर्याखुर्या आर्थिक क्षमतेची पातळी कधी गाठूच शकलेला नाही! याचे कारण आहे काँग्रेस पक्षाचे पक्षपाती, भ्रष्ट, बेगडी समाजवादी धोरण! बर्याच लोकांना असे वाटते की 'मोदीनॉमिक्स'मुळे भारताची स्वाभाविक उद्योजकता तिच्या बंधनांतून मुक्त होऊन तिच्यात एक नवा जोश उत्पन्न होईल व त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती उंच भरार्या मारू लागेल. मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला गुजरातचा आर्थिक विकास सर्व विभागांना-खास करून गरीबांना[५]- एक वरदान ठरला आहे. हा भक्कम पुरावा भविष्यकाळातील भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने आशादायक आहे.
अमेरिकेतील काही वर्तुळांतील मंडळींनी मोदींना जणू वाळीतच टाकलेले आहे. अशाच अमेरिकन मंडळींनी एके काळी रेगन यांनाही वाळीत टाकले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील नोकरशहांमध्ये खूप आधीपासून डाव्या विचारसरणीच्या उच्चभ्रूंचा प्रभाव व वर्चस्व आहे. आणि हा उच्चभ्रू गट आजपर्यंत मोदींना अमेरिकेला भेट देण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा नाकारत आलेला आहे. मोदींवर आग पाखडणारे प्रमुख टीकाकार आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहाचे सदस्य कीथ एलीसन. यांनी काही लोकांना हाताशी धरून मोदींना अमेरिकेचा व्हिसा अद्यापपर्यंत तरी यशस्वीपणे नाकारलेला आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात अमेरिकेला भेट देण्याचे टाळावे, असे मला वाटते. आजच्या जागतिक राजकीय पटावर आशिया खंडाचे वाढते महत्व व तेथील चीनचा वाढता प्रभाव पहाता आज तरी अमेरिकेला भारताची जास्त गरज आहे व त्यादृष्टीने हे धोरण चांगलेच ठरेल, असे मला वाटते.
अर्थक्षेत्रातील सरकारी हस्तक्षेप, आपल्या पित्त्यांना पक्षपात करून सवलती देणाचे प्रकार, भ्रष्टाचार अशा गोष्टींना प्रखर विरोध करणार्या मोदींची धोरणे रेगन यांच्या धोरणांशी खूप मिळती-जुळती आहेत. थोडक्यात असे दिसते की भारताला आपले 'देसी' रेगन सापडलेले आहेत! या उलट आपल्या चुकीच्या धोरणांमुळे नोकरशाहीच्या भाराखाली वाकलेल्या अमेरिकेला स्वत:चा 'अमेरिकन मोदी' शोधावा लागणार आहे काय?
रेगन यांच्याबद्दल बरेच लोक म्हणतात की ते एक आदर्श किंवा परिपूर्ण व्यक्ती कधीच नव्हते व त्यांनी खूप चुकाही केल्या. पण ट्रूमनपासून तो ओबामापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षात जर कुणी एका राष्ट्राध्यक्षाने अमेरिकन जनतेला ते अमेरिकन असल्याबद्दल व अमेरिकन राष्ट्राबद्दल अभिमान वाटू दिला असेल तर तो रेगन यांनीच. मला खात्री आहे की मोदींच्या कारकीर्दीनंतर भारतीयांनाही असेच वाटेल.
रेगन यांच्याप्रमाणे मोदीही उपजत लोकनायक आहेत. रेगन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे अनेक डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते (सिनेटर्स व प्रतिनिधीगृहाचे सभासद) “रेगन डेमोक्रॅट्स” म्हणवून घेऊ लागले. मोदी पंतप्रधान झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार-खासदार स्वत:ला “मोदी काँग्रेसजन” म्हणवून घेऊ लागले तर त्यात नवल वाटायला नको!
टिपा व संदर्भ:
[१] राज्यपाल हा शब्द तितकासा योग्य वाटत नाही
[२] या चित्रपटात त्यांनी जॉर्ज “द गिप्पर” गिप या सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचे काम केले होते व त्यामुळे त्यांना 'गिप्पर (Gipper)' असे टोपणनावही पडले.
[३] अमेरिकेत आहेत की नाहीत माहीत नाही, पण गोर्या लोकांच्या, खास करून ब्रिटिशांच्या, होकाराने धन्य पावणारे उच्चभ्रू भारतात आजही आहेत. आयुर्वेद श्रेष्ठ आहे हे पटविण्यासाठी आजही आपल्यातले काही ढुढ्ढाचार्य गोर्या लोकांनी आयुर्वेदाला दिलेले प्रशस्तीपत्रक वापरताना आपण पाहतोच ना?
[४] जसे मोदी “शासन कमी, पण सुशासन हवे” यावर भर देतात तसेच रेगनही म्हणायचे की सरकार हे कुठल्याही समस्येवरचा उतारा नाही, उलट सरकारचे फाजील अस्तित्वच एक समस्या आहे. (In this present crisis, government is not the solution to our problem; government is the problem.) अर्थात हे अगदी टोकाची भूमिका झाली कारण या विधानाने अमेरिकन जनतेची दिशाभूल झाली व ते आता आपल्या सरकारलाच शत्रू मानू लागले आहेत असे मानणारेही अमेरिकन आहेत. सरकार कधी-कधी समस्या असू शकते पण सरकार हीच एक समस्या आहे असे नाही. व्यक्तींमध्ये व भांडवलशहांमध्ये राजकीय भांडणे लावणारी लोभी वृत्तीच समस्या बनू शकते व मग सरकार कुठलीही समस्या सोडवायला असमर्थ बनते हा गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव आहेच.
[५] मोदींनी प्रथमच जाती-धर्माचा उपयोग न करता आर्थिक विकास व सुशासन या मुद्द्यांवर निवडणूक लढविल्यामुळे नेहमीचे मुद्दे वापरता येईनासे झाले, म्हणूनच की काय, पण गुजरातचा आर्थिक विकास हा एक वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. तो गरीबांनाही कसा एक वरदान ठरला आहे हे 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रकाशित झालेल्या खालील लेखात वाचता येईल.
http://indianexpress.com/article/opinion/columns/gujarats-inclusive-growth/99/
loksatta.comhttp://www.loksatta.com/loksabha/sattarth-blog-on-ronald-reagan-narendra-modi-463460/
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. 'लोकसत्ता' त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
- Sudhir काळे, from JakartaAnil-ji, Modi-ji is like my another favourite leader Late Balasaheb Thackeray. Either one eulogizes him or hates him, but no one can be indifferent to him. I belong to the former category. That's all. (Sudhir Kale, Jakarta)14 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaदुसऱ्या लेखाचा दुवा आहे: http://www.loksatta.com/loksabha/blog-everything-about-narendra-modi-406110/?nopagi=114 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from JakartaThose who liked my above अर्तीच्ले may like to read my earlier 4 articles on Sattartha blog as per links below: 1) http://www.loksatta.com/loksabha/sattarth-blog-who-will-be-next-prime-minister-of-india-as-per-kale-model-379913/ 2) BLOG : everything about narendra modi | Loksatta 3) http://www.loksatta.com/loksabha/sattarth-blog-about-allegations-on-narendra-modi-answers-429620/ 4) http://www.loksatta.com/loksabha/sattarth-blog-on-coverage-of-narendra-modi-in-pakistan-media-445382/14 days ago · (0) · (0) · reply (0)
- anil from Buldanaलेख अतिशय सुंदर पण तेवढाच पूर्वग्रह दुषित आहे. अहो मोदींनी या निवडणुकीची तयारी चार सहा महिन्यात केलेली नाही. गेल्या साडे तीन वर्षात ठरवून व डावपेचाचे धोरण म्हणून संसदेत मुद्दाम गोंधळ घालण्याचा कार्येक्रमच मोदिपक्षाने राबविलेला होता. जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्थेला यशस्वीपणे राबविणाऱ्या पंतप्रधान मनमोहनजी यांना कमजोर ठरविल्या गेले. ही दुसरी बाजू विचारात न घेत म्हणे मजबूत सरकार! आणि होय, अहंकाराची विजय यात्रा नि उद्दामपणाचे हुंकार भरणारे लोकनायक होत नसतात.16 days ago · (2) · (2) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaयुवराज पाटील-जी व उल्हास-जी, धन्यवाद. मिलिंद-जी, तुम्हाला असे वाटणे सहाजीक आहे कारण या लेखातील कांहीं माहिती मी ज्या लेखापासून घेतली आहे त्याची माहिती मी लेखाखाली 'इतर संदर्भ'मध्ये दिली होती पण ती कांहीं कारणाने प्रसिद्ध झाली नाही. ती माहिती अशी: इतर संदर्भ: १. विकीपिडियातून कांहीं माहिती व आकडेवारी घेतली आहे. २. Is India about to elect its Reagan? by David B Cohen in Daily Caller (http://dailycaller.com/2014/04/14/is-india-about-to-elect-its-reagan/) सुधीर काळे, जकार्ता17 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaयुवराज पाटील-जी व उल्हास-जी, धन्यवाद. मिलिंद-जी, सहाजीकच आहे. माझ्या लेखाच्या शेवटी मी खालील दिली होती ती राहिलेली दिसते ती येणेप्रमाणे: ----------- इतर संदर्भ: १. विकीपिडियातून कांहीं माहिती व आकडेवारी घेतली आहे. २. "Is India about to elect its Reagan?" by David B Cohen in Daily Caller या लेखावरूनी कांहीं माहिती घेतलेली आहे. (http://dailycaller.com/2014/04/14/is-india-about-to-elect-its-reagan/)17 days ago · (0) · (0) · reply (0)
- Yuvraj Patil from Puneकाळे साहेब आपले विश्लेषण अचूक आहे..आज आपल्या देशाला मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे..ते जर पंतप्रधान झाले नाहीत तर ते आपल्या देशाचे दुर्दैव ठरेल .. पुढील ५ ते १० वर्ष आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाची आहेत आणि जर मोडी पंतप्रधान झाले तर देशाचा सर्वांगीण विकास होण्यास नक्कीच मदत होईल ..असेच उत्तम विश्लेषण लिहित जा..अभिनंदन ..!!!17 days ago · (2) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaहा लेख ज्यांना रेगन माहीत होते त्यांच्याचसाठी आहे. प्रत्येक लेख प्रत्येकासाठी कसा असेल? शिवाय या लेखात मी माझी मते मांडली आहेत. त्या प्रत्येक मताशी प्रत्येक वाचक सहमत कसा असेल? ती माझी अपेक्षाही नाहीं व कधीच नसते. त्यात मोदी हे असे व्यक्तिमत्व आहे की ते कांहींना अतीशय आवडतात व तितक्यांनाच त्यांच्याबद्दल कमालीचा द्वेष वाटतो. आपण दोघे विरुद्ध बाजूला आहोत हे उघड आहे, पण नेहमी असे राजकीय विषयावर लेखन करणार्याला माझ्यासारख्याला ते कांहीं नवीन नाहीं. असो.18 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleमाझी प्रतिक्रिया देण्याचा उद्देश आहे कि तुम्ही भारतीय जनता त्यांचा रेगन शोधायला निघाली आहे हा जो जावई शोध लावला आहे त्याचा समाचार घेणे हा आहे. या लेखाचे नाव "मला मोदी पंतप्रधान का हवेत" असे असते तर गोष्ट वेगळी होती. स्वत:ची इच्छा तमाम भारतीयांची इच्छा आहे असे म्हणणे चुकीचे आहे. शिवाय रेगन कोण? त्याने काय केले? तो लोकप्रिय का होता? ह्याची य्ताकिंचीत हि माहिती भारतीय जनतेल नाही. रेगन आणि राजीव गांधींचे संबंध चांगले होते हे कितीजणांना माहिती आहे?18 days ago · (2) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमराठेसाहेब, मोदी हे चीनमध्ये खूप लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी अलीकडे चीनला भेट दिली होती त्यावेळी "लाल गालिचा"वर त्यांचे स्वागत केले गेले होते. याचे कारण म्हणजे छोट्या-छोट्या गुजराथी व्यावसायिकांनी खूप प्रमाणावर चिनी यंत्रसामग्री व उपयंत्रे खरेदी केलेली आहेत. आपल्या भूमिकेपासून जराही मागे न हटता ते त्यांच्या या लोकप्रियतेचा नक्की फायदा करून घेतील असे मला वाटते. असे कां वाटते? Just gut feeling, for whatever it is worth. पण मोदी 'खमके' असल्याचा नक्की फायदा होईल असे वाटते. (No, I'm not BJP advisor)20 days ago · (0) · (1) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaधन्यवाद, उल्हास-जी, चला माझ्या वाचकांमध्ये एक तरी मोदींचा प्रशंसक निघाला. पण काल मतदान केल्यावर त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह दाखविले व कांही वाक्ये ते बोलले या तांत्रिक कारणावरून निवडणूक आयुक्तांनी त्यांच्यावर FIR दर्ज करून त्यांचा पत्ता काटला आहे की काय अशी शंका येत आहे. त्यामुळे येथीला कांहीं लोकाना आनंद होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयुक्त अशा फुसक्या तांत्रिक कारणाचे अवडंबर बनवून भारताला एका भक्कम व सक्षम नेतृत्वापासून वंचित करेल काय?20 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमराठे-जी, तुम्ही या निवडणुकीत मतदान केले आहे कीं नाहीं मला माहीत नाहीं. मी तरी करू शकलेलो नाहीं. पण मी भारतीय नागरिक असून त्याचा मी अभिमानही बाळगतो. यावेळी मतदान करू शकलो नसलो तरी विद्यमान उमेदवारांतून माझ्या देशाचा पंतप्रधान बनण्यास कोणती व्यक्ती सर्वात लायक आहे याबद्दल मला मते आहेत. त्यानुसार मला मोदी सर्वात योग्य व्यक्ती वाटतात. तुम्हाला कोणती व्यक्ती योग्य वाटते ते न सांगता तुम्ही माझ्या राज्यघटनेच्या (अ)ज्ञानावर कां घसरलात! नाव घ्यायला भीती, लाज वाटते म्हणून? निर्णय घेता येत नाहीं म्हणून?20 days ago · (1) · (0) · reply (0)
- ulhas from Lortonमग काय मराठेना करप्शन करून ,लुटणारी कॉंग्रेसच आवडते का?मोदींना तुम्ही हातात सत्ता हि दिली नाही आणि सदाशिव पेठेत पाणी येत नाही म्हणून ,मोदींना काय घरातून येउन पाणी भरावे असे वाटते कि काय ?तुम्हाला अजित पवारंची भाषा ,पाणी नाही तर ,मुतु,काय धरणात ?हे असे लोक मोडी पेक्षा जास्त आवडतात काय ?अरे प्रथम सत्ता देऊन तरी पहा ?बाजारात ,तुरी ,आणि भट,भटणीला मारी "घट्टदाल करते कि पातळ ?अशी अवस्था आहे सर्व मुर्खांची ,कश्यात काय नाही आणि होण्या अगोदर त्यची वित्माबना चालू आहे कारण तो उच्च जातीचा नाही हे सपष्ट आहे20 days ago · (1) · (3) · reply (4)k Down Voted
- Aniruddha Marathe from Bentonvilleहो का नाही? मोदींनी आश्वासन दिले आहे कि ६० वर्षांचा विकास ५ वर्षात मग २ तास पाणी पुरवठा व्हावा अशी माफक अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे?20 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleभ्रष्टाचाराचे म्हणाल तर पुरती आणि येद्दीयुराप्पांना विसरलात? मोदींनी येद्दीयुराप्पांना पक्षात का परत घेतले?20 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleमोदींनी स्वत:च्या पुस्तकात शुद्रन्बद्दल काय लिहिले आहे ते आपण वाचले आहे का?20 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleमोदींच्या कर्मयोगी या पुस्तकातील हा उतारा बघा! लोकसत्ताने हे छापावे कारण विषय महत्वाचा आहे! आणि माझ्यावर जातीयवादी असल्याचा आरोप होतो आहे. अशावेळी मला माझी बाजू मांडू देत. http://ibnlive.in.com/news/modis-book-karmayog-offends-dalits/53024-3.html20 days ago · (0) · (1) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleएकीकडे म्हणता "मोदी चीनशी अधीक दृढ मैत्री करून आपल्यातल्या समस्या सोडवितील असे मला वाटते." आणि त्या अगोदर असे म्हणाला आहात कि "आता मोदी काय करतात ते अजून कळायचे आहे. (सुधीर काळे)" म्हणजे वाचकांनी यातून नक्की काय अर्थ घ्यायचा?20 days ago · (2) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleएकीकडे मोदींना सोडले अशी आवई उठवता आणि दुसरीकडे राजीव गांधींना शिखांच्या हत्याकांडाबद्दल दोषी ठरवता? एक काय तो विचार पक्का करा!20 days ago · (1) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleभाजपा नेते कायम असे म्हणत आले आहेत कि चीन भारताचा मुळ्या शत्रू आहे. आणि आपण म्हणता कि मोदी चीन शी मैत्री करणार? कमाल आहे! तुम्ही कधीपासून भाजपा चे परराष्ट्र धोरण ठरवायला लागलात? हिंदुस्तान तिमेस मधील हि बातमी वाचा http://www.hindustantimes.com/india-news/newdelhi/india-should-be-tough-with-china-on-ladakh-issue-yashwant-sinha/article1-1049026.aspx20 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleतसेच तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरलात आणि ती म्हणजे भारतीय संविधान नागरिकांना पंतप्रधान निवडण्याचा अधिकार देत नाही. नागरिकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे पंतप्रधान नाही. यासाठी घटना वाचा विकिपीडिया नको. पंतप्रधान निवडण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींचा आहे. त्यामुळे ज्याचा अधिकारच मला नाही त्याचा पर्याय मी कसा सांगणार? लोकसत्ता ने प्रसिद्ध करावे!20 days ago · (1) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमुळीच नाहीं. मोदींना ’म्या पामरा’ने नव्हे तर आपल्या सवोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. आता नवा कांहीं पुरावा आला तर पुढे बघू. पण आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ज्याला ’पिंजर्याीतला पोपट’ म्हटले आहे त्या अन्वेषण विभागाने खूप खटपट करूनही हाती कांहींच आले नाहीं. मला तर वाटते की मोदींचा असा छळवाद जर झाला नसता तर त्यांनी गुजरातला अजून कितीतरी जास्त प्रगत केले असते.21 days ago · (0) · (1) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaश्री. बेलव्ह्यू, सोवियेत संघराज्यसुद्धा एका अण्वस्त्रधारी राष्ट्र होते (व राशिया आजही आहेच). पण एका बाजूला अंतर्गत उठावामुळे, दुसर्या बाजूला पैशाचे सोंग आणता न ये हे कळल्यामुळे व तिसर्या बाजूला अमेरिकेच्या आक्रमक धोरणामुळे त्याचे तुकडे झाले हे खरेच. तालीबानच्या कृपेने आता पाकिस्तानचेही तसे होऊ घातलेच आहेत. राल्फ पीटर्स या अमेरिकन लष्करी तज्ञाने याबद्दल लिहिलेलेही आहे. मोदी चीनशी अधीक दृढ मैत्री करून आपल्यातल्या समस्या सोडवितील असे मला वाटते.21 days ago · (0) · (1) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमराठेसाहेब, तुम्ही इथे पाठविलेल्या प्रश्नमंजूषेला उत्तर म्हणून एक लेखच लिहावा लागेल. तो घेतो आता मी लिहायला. दरम्यान तुम्हाला मोदी जर पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती नाहीत असे वाटत असेल तर तुमचा विकल्प कोण आहे-राहुल, केजरीवाल, ममता, मुलायम, लालू, जयललिता-यावर तुम्ही लिहा! (सुधीर काळे)21 days ago · (1) · (2) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-२: मुख्य मुद्दा हा आहे की आज भारताला पंतप्रधान म्हणून आता उपलब्ध उमेदवारांत कोण सर्वात योग्य आहे? माझे मत अगदी हेगडे यांच्याशी जुळते म्हणून मी त्यांच्या नावाचा पुरस्कार करतो. तुम्ही कुठल्या नांवाचा पुरस्कार करता? कीं फक्त मोदींना विरोध करू पहाता? या जगात कुणीच आदर्श व्यक्ती नसते. आपल्याला उपलब्ध उमेदवारांतून योग्य व्यक्ती निवडायची आहे. आपल्याला राहुल जास्त आवडतो? केजरीवाल? मोदी म्हणतात तसे फक्त मोदी हटाओ हा आपला एक कलमी कार्यक्रम आही काय? माझा मुद्दा आहे मोदी आज सर्वोत्तम विकल्प आहेत. (काळे)21 days ago · (1) · (1) · reply (0)ulhas Up Voted
- Sudhir काळे, from Jakartaभाग-१:मराठेसाहेब, आपण पुन्हा तेच तेच मुद्दे लिहीत आहात. मी आधीच लिहिले होते की अर्थशास्त्र हे अंकगणितासारखे शास्त्र नाहीं ज्यात २ २=४ असे उत्तर येते. तसे असते तर प्रत्येक अंदाजपत्रकावर उलटसुलट मते व्यक्त झालीच नसती. गांधी हे नाव फिरोज जहांगीर या पारशी व्यक्तीने (मुस्लिम नव्हे) इंदिरा गांधींशी विवाह करण्यापूर्वी घेतले हे तर खरेच आहे. त्याचा उपयोग त्यांना फारसा जरी झाला नसला तरी त्या नांवाचा (दुरु)पयोग झाला नाहीं असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? उगीच कमी महत्वाच्या मुद्द्यांवर कशाला वातंड? भाग-२पहा21 days ago · (0) · (1) · reply (0)
- k from Bellevueआपले संदर्भ थोडे विचित्र आहेत, आणि दावे स्वप्नवत. उदा. "पण जसा रेगन यांच्या कारकीर्दीत सोव्हिएत राष्ट्रसंघाचा पाडाव झाला तसाच चमत्कार चीन-पाकिस्तानच्या संदर्भात मोदींच्या हातूनही घडो अशीच आशा त्यांच्या भारतीय समर्थकांना आहे." म्हणजे नक्की काय? दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांना भारत कसे काय तोंड देणार आहे? तुम्हाला खरोखरच असा काही 'चमत्कार' घडण्याची आशा वाटत असेल तर कठीण आहे!21 days ago · (2) · (0) · reply (1)Aniruddha Marathe Up Voted
- Marathi Vachakअसा चमत्कार घडू शकतो, भारत देशाला कमी लेखू नका. त्यासाठी India Checkmates America 2017. Author: General S.Padmanabhan (Former Chief of the Army Staff, India) हे पुस्तक अवश्य वाचा. आज भारत जी प्रगती करतो आहे ते बघून विकसित देशांच्या पोटात गोळा आला आहे. त्याचा परिपाक म्हणजे मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला. त्यामुळे एक शक्तिशाली खमक्या नेता सर्वोच्च पदावर येणे गरजेचे झाले आहे. तो नेता मोदी18 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमराठेसाहेब, प्रायमरीमध्ये एकमेकांच्या उरावर बसणारे उमेदवार नंतर एक होतात. तेंव्हा (थोरले) जॉर्ज बुश काय म्हणाले याला संदर्भाशिवाय काडीचीही किंमत नाहीं! रेगनही प्रायमरीत थोरल्या बुशसाहेबांबद्दल कांही-बाही बोलले असतील पण नंतर एका तिकिटावर लढले. इथे मोदी-रेगन तूलना ही एक उदाहरण म्हणून घ्यायची आहे.21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from JakartaDear Mr Marathe, Just hear what Padmabhushan Dr B M Hegde, former Vice-Chancellor, Manipal University has to say about Modi. He calls him a SStatesman, not just a politician and tells us all why he thinks like that! https://www.facebook.com/photo.php?v=10203956790188034&set=vb.1470800530&type=2&theater We are discussing Modi and not Reagan as primary objective. So all of you who are doubtful of Modi's claim as our next PM, please listen to what he says.21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleभारतात विकासाचा प्रादेशिक असमतोल खूप आहे त्याबद्दल मोदिनोमिक्स काय म्हणते? वाढत्या नागरीकरणाचा देखील मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल मोदिनोमिक्स काय म्हणते? तसेच झोपडपट्ट्यान्मधिल नागरी सुविधा कशा पुरवणार? त्यासाठी पैसा कुठून आणणार? यावर मोदिनोमिक्स काय म्हणते? हे सगळे सोडून आपल्याला इंदिराजींच्या आडनावाचा प्रश्न कोठून आठवला?21 days ago · (1) · (3) · reply (0)Ajit M Down Voted
- Aniruddha Marathe from Bentonvilleमोदींचे परराष्ट्रीय धोरण कॉंग्रेस च्या पेक्षा वेगळे कसे असेल ते हि सांगा! म्हणजे मोडी नक्की काय वेगळे करणार? उद्या पुन्हा संसदेवर हल्ला झाला तर मोदी पाकिस्तान वर हल्ला करणार का? मोदी याबद्दल काहीच म्हणत नाहीत. एवढेच नव्हे ते तर काश्मीर खोऱ्यातही जात नाहीत!21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleअन्न सुरक्षा विधेयकाला भाजप ने विरोध केला त्याचे काय करणार? शिक्षण हा मुलभुत अधिकार आहे त्याला भाजपा ने विरोध केला मग सर्व बालकांना शिक्षण कसे पुरवणार? खेड्यांचे सोडा पण पुण्यात देखील सदाशिव पेठेत दोन तास जेमतेम पाणी येते त्याला मोदिनोमिक्स चे उत्तर काय? लोकसत्ताने हे सर्व प्रसिद्ध करावे. तुम्ही मोदींच्या आंधळ्या भक्तांना लेख लिहायची सुविधा देत निदान आमचे मत तरी प्रसिद्ध करा. तुम्ही आत्तापर्यंत करत आला आहात पण हा माणूस फारच प्रश्न विचारतो असे समजून हे छापायचे बंद कराल म्हणून हि विनंती!21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleपूर्वी भाजपा गांधीवादी समाजवादाचे गोडवे गायचा मग मोदिनोमिक्स नि गांधीवादी समाजवादात काय फरक आहे? तसेच मोदिनोमिच्स म्हणजे नक्की काय? आज असंघटीत शेतमजूर, कामगार या बाबब्त मोदिनोमिक्स काय म्हणते हे सांगाल? Retail मधली परकीय गुंतवणूक भाजपा करणार नाही मग परकीय चलन कसे मिळवणार? कॉंग्रेस ने प्रत्येक भारतीयाला वैद्यकीय सुविधा देण्याचे ठरवले आहे? त्यावर मोदिनोमिक्स काय म्हणते? भारतातील प्रत्येकाल वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजे का? उत्तर हो असेल तर मोदी त्यासाठी काय करणार?21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha MaratheBanerjee report प्रमाणे गोध्रा ची आग हा अपघात होता तसेच गुजरात चे तत्कालीन गृहमंत्री हरेन पंड्या ज्यांची पुढे हत्या झाली त्यांनी असा सल्ला दिला होता कि गोध्रातील मृतदेहांना हलवू नये कारण त्याने दंगल होऊ शकेल. मोदींनी ते ऐकले नाही. हरेन पंड्या भाजपा चे होते कॉंग्रेस चे नाही. मोदींनी आपल्याच पक्षाच्या गृहमान्त्र्याचे का ऐकले नाही? हि घटना आपण सोयीस्कर रित्या विसरलात? लोकसत्ताने या comments प्रसिद्ध कराव्यात. किती एकांगी लेख आहे हा!!21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Maratheपूर्वी कुमार केतकरांचे एकांगी लेख लोकसत्ता प्रसिद्ध करीत असे आणि आता मोदींची भलावण करणारे लेख? I understand that this is opinion page not editorial page but still where is a chance for rebuttal?21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Maratheमोदिनोमिक्स हि संकल्पना मोदींच्या प्रचार यांत्रानेनी ठरवली रेगानोमिक्स वरून. रेगानोमिक्स हि संकल्पना देखील रेगनची प्रसिद्धी एन्कॅश करण्यासाठी राबवली गेली. यामागील जी अर्थशास्त्राची विचारसरणी आहे त्याला "supply side Economics " असे म्हणतात. Keynes ला विरोध करणारी हि विचारप्रणाली आहे. kaaLesaकाळेसहेब आपण अपूर्ण संशोधन केलेत किंवा जाणूनबुजून मोदींना पूरक एवढीच माहिती पुरवलीत असे स्पष्ट आहे! लोकांना पूर्ण सत्य सांगा असे केले नाहीत तर तुम्ही ज्या कॉंग्रेस ला विरोध करता त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleलोकसत्ताने पूर्वी मुंबईच्या अर्थशास्त्रातील प्राध्यापकाचा गुजरात आणि इतर राज्यातील विकास यावरील लेख प्रसिद्ध केला होता. तो लेख अभ्यासपूर्ण होता. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मोदींची हास्यास्पद प्रशंसा करणारे लेख प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन कळत नाही. अशा लेखा ऐवजी संघाच्या प्रसिद्धी प्रमुखांना लेख लिहायला सांगायचा होता. निदान निष्पक्षपातिपणाचा मुखवटा तरी नसता अशा लेखावर! तसेच इंदिरा गांधींच्या नवऱ्याने नाव बदलले अशी विवादास्पद विधाने आत्ताच्या निवडणुकीवरील लेखात करण्याचे प्रयोजन काय?21 days ago · (2) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleकाळेसहेब आपण मान्य करता कि रेगन ने वित्तीय तुट वाढवली, आपण मान्य करता कि रेगन ने बेकायदा स्थलांतर केलेल्या लोकांना माफी दिली आपण मान्य करता कि रेगन ने taxes वाढवले हे सगळे मान्य करता आणि हे हि मान्य करता कि मोदी हे करणार नाहीत आणि तरीही असे म्हणता कि भारतीय लोक त्यांचा रेगन मोदिंमध्ये शोधत आहेत म्हणून? How absurd? Will Loksatta publish this comment? तुम्ही स्वत:च तुमच्या विरोधी बोलत आहात असे नाही वाटत? तसेच हा लेख भारतातल्या निवडणुकींवर आहे अमेरिकेतल्या वित्तीय तुटीवर नाही!21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from BentonvilleMr. Kale do you know that Reagan's VP George HW Bush called Reganomics as Voodoo economics? Please check your main reference Wikipedia or Daily Caller? Reading Time magazine does not make anyone expert in American politics! Also there was no accusation that Rajiv Gandhi abetted violence against Sikhs.If you agree that Reagan carried fiscal deficits of gigantic proportion why you compare Modi to him? Absurd!!!21 days ago · (0) · (1) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaराणेसाहेब, आपले मतभेद असू शकतील, आहेतच. पण एक सांगतो. १९६२ साली इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतल्यापासून तिथल्या लायब्ररीत TIME हे नियतकालिक वाचायची जी गोडी लागली की आजपर्यंत मी विनाखंड ते नियतकालिक वाचत आलेलो आहे व त्यामुळे अमेरिकेबद्दल मला बर्यापैकी माहिती आहे!21 days ago · (1) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमराठेसाहेब, अमेरिकेत Reganomics चे जितके प्रशंसक आहेत तितकेच त्या अर्थशास्त्राचे टीकाकारही आहेत. अर्थशास्त्रासारखी शास्त्रे गणितासारखी ‘एक-उत्तरी’ नसतात तर ‘पानी तेरा रंग कैसा?’सारखी असतात हे प्रत्येक अर्थसंकल्पानंतरच्या अर्थशास्त्रातल्या कांहीं तज्ञांच्या प्रशंसेवरून तर कांहीं तज्ञांच्या टीकेवरून सर्वांना दिसतेच! (सुधीर काळे)21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-२: १९८४ साली शिख समाजाचा नरसंहार झाला त्यावेळी दिल्लीत राष्ट्रपती राजवट होती, पण कुणी राजीव गांधींना खाटीक किंवा मौतका सौदागर कां म्हटले नाहीं? ते कॉन्ग्रेसचे नेते होते म्हणून? शिवाय ’डेली कॉलर’ची जातकुळी मी शोधली नाहीं. रेगन हे भारतविरधी असले तरी कर्तृत्ववान होते व म्हणून मला ते आवडत. म्हणून मी हा लेख निवडला.21 days ago · (0) · (3) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-१: मोदींना खाटीक, मौतका सौदागर वगैरे नांवांनी संबोधून त्यांच्यावर टीका केली जाते. पण ते मुख्यमंत्री होण्यापूर्वीही गुजरातेत खूप दंगली होत असत. त्याच्यावर एक स्वतंत्र लेखच मी लिहायच्या विचारात आहे. १९६९च्या 'The Hindustan Times' मधील एका लेखानुसार गुजराथेतील १९६९च्या दंगलीत बळी पडलेल्यांची अधिकृत संख्या ५००० तर अनधिकृत बळींची संख्या १५,००० ते २५,००० समजली जाते. पण त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना कुणी खाटीक, मौतका सौदागर म्हटले नाहीं. (भाग-२ पहा) (सुधीर काळे)21 days ago · (0) · (0) · reply (1)
- k from Bellevueआधीच्या गुन्हेगारांना "गुन्हेगार" म्हटलेच पाहिजे, तसे होत नसेल तर तेही चूकच आहे. पण म्हणून मोदींना तुम्ही निर्दोष कसे काय ठरवता? की "कोन्ग्रेसने सुद्द्धा चूक केलीये, मग आमच्या मोदींनाच का बरं ओरडता?" असा तुमचा हास्यास्पद दावा आहे? तुमच्या लेखनात संतुलित विचारांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो.21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमला मोदींचा भाट म्हणणार्यांनी विकल्पांकडे पहावे. आज निवडणुकीच्या रिंगणात जे उभे आहेत त्यात मोदी सोडल्यास दुसरा पात्र उमेदवार कोण आहे? राहुल? केजरीवाल? मुलायम? लालू? ममता? जयललिता? ते स्वत: स्वच्छ आहेत, भ्रष्टाचारी नाहींत. मोदी यांनी सुशाननाचा वापर करून गुजरातचा विकास केलेला आहे. मला ही जमेची बाजू भक्कम वाटते.21 days ago · (2) · (2) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaमराठेसाहेब, “रेगनच्या काळात अमेरिकेच्या वित्तीय तुटीत सर्वाधिक वाढ झाली होती आणि रेगनने सत्ता सोडताना दिलेल्या भाषणात या विषयी खेद व्यक्त केला होता!” आजही परिस्थिती काय आहे? एक क्लिंटन सोडल्यास इतर प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने अमेरिकेची उधारीचे ceiling वाढवलेच आहे. रेगन यांच्या कारकीर्दीत जपान सावकार होते व आता चीन सावकार आहे. दारूगोळा, गहू, संगणक (व आजकाल तेल) याखेरीज अमेरिकेत काय बनते? सारे आयात होतानाच दिसते. हेच या उधारीचे कारण असावे काय?21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-२: कट्टर भारतविरोधी निक्सन-किसिंजर या जोडगोळीने चीनशी मैत्री करून अमेरिकन धोरणाला नवी दिशा दिली. निक्सन हे खरे द्रष्टे राष्ट्राध्यक्ष होते. पण रेगन यांनी सोवियेत संघाचा खातमा करून ती पूर्ण केली हे तर खरेच. आता मोदी काय करतात ते अजून कळायचे आहे. (सुधीर काळे)21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-१: माझे मोदीप्रेम (किंवा रेगनप्रेम) आंधळे मुळीच नाहीं. खरे तर रेगन यांनी पाकिस्तानला अणूबॉम्ब कसा कुमार्गाने मिळवून दिला हे मी ’न्यूक्लियर डिसेप्शन’चे भाषांतर केल्यामुळे मला खूप विस्तृतपणे माहीत आहे. त्यांना मी भारतविरोधी समजतो व त्यांच्याबद्दल मला एका पैशाचेही प्रेम नाहीं. पण मोदींचे जसे India First हे धोरण आहे तसेच रेगन यांचे US First हे धोरण होते व त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन त्याच मापनाने (yardstickने) केले पाहिजे असे मी मानतो. (भाग-२ पहा)21 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-२ नरसिंह राव हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान होते, पण आडनाव ‘चुकीचे’ असल्यामुळे त्यांना त्यांच्याच कॉन्ग्रेस पक्षाने अडगळीत टाकले. त्यांचे दिल्लीत कुठे स्मारक आहे? त्यांच्या नांवाने किती कल्याणकारी योजना कॉन्ग्रेस पक्षाने सुरू केल्या आहेत? आणि गांधी-नेहरूंच्या नांवाने किती योजना सुरू आहेत? (सुधीर काळे)22 days ago · (2) · (1) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaभाग-१ देशाचा नेता सर्व बाबतीत ज्ञानी असूच शकत नाहीं. त्याची हुशारी असते योग्य सल्लागार नेमण्यात व त्यांच्या सल्ल्यांचे योग्य व व्यवहारी मूल्यमापन करून निर्णय घेण्यात. एक उच्च दर्जाचा अर्थशास्त्रज्ञ जेंव्हां आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम पंतप्रधानांच्या हाताखाली काम करत होता तेंव्हां भारतात आर्थिक क्रांती झाली पण तोच अर्थशास्त्रज्ञ जेंव्हां आपला पंतप्रधान झाला तेंव्हां देशाला policy paralysis झाला हेही आपण पाहिले आहे. सुधीर काळे (भाग-२ पहा)22 days ago · (2) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaएकूण मतदार किती आहेत, रेगन किती साली जन्मले, त्यांच्या दोन बायकांची पूवाश्रमींची नावे काय होती, रेगन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांची नांवे काय होती एवढी (आणि तत्समच) माहिती मी विकीपीडियावरून घेतली आहे आणि अशा बाबतीत तिथे बरोबर माहिती मिळते असा माझा अमुभव आहे. (सुधीर काळे, जकार्ता)22 days ago · (0) · (0) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaअहो मराठेसाहेब, सध्या तरी मोदी बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या स्थलांतरितांना ‘स्वगृही’ परत पाठविण्याच्या विचारात आहेत! पण आपल्याला माहीत असेलच कीं रेगनच नव्हे तर सध्या अमेरिकेचे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष-रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक-बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेल्या स्थलांतरितांना कायदेशीर मान्यता द्यायला निघालेले आहेत.22 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilledaily caller हि अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या लोकांची website आहे. टकर कार्लसन नामक व्यक्तीने उभी केलेली. कोणीही त्याच्या नावावर search करा आणि बघा हि व्यक्ती काय आहे. गंमत म्हणून हा video बघा! http://www.thewire.com/politics/2012/10/jon-stewart-not-impressed-tucker-carlsons-race-baiting/57595/22 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleरेगन च्या काळात अमेरिकेच्या वित्तीय तुटीत सर्वाधिक वाढ झाली होती आणि रेगन ने सत्ता सोडताना दिलेल्या भाषणात या विषयी खेद व्यक्त केला होता! ये लेखा चे संदर्भासाठी आपण जो विकिपीडिया चा अभ्यास केलात, त्याच विकिपीडिया वर जर आपण रेगन चा अभ्यास केला असतात तर आपण हि ओढूनताणून केलेली तुलना किती हास्यास्पद आहे हे आपल्यालाच उमगले असते. लोकसत्ता स्वत:ला निष्पक्षपाती वृत्तपत्र समाजात असेल तर त्यांनी हि प्रतिक्रिया छापण्याची हिंमत दाखवावी आणि यापुढे असले ब्लोग छापून आपली नाचक्की करू नये!22 days ago · (0) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleइंदिरा गांधींच्या गांधी आडनावाचा महात्मा गांधींशी काहीही संबंध नाही हे तमाम भारतीयांना माहिती आहे. तो मुद्दा सध्याच्या निवडणुकीत ही नाही. असे असताना इंदिरा गांधींच्या नवर्याने त्यांचे नाव बदलले हे इथे सांगण्याचे प्रयोजन काय आहे? उजव्या विचारसरणीचे अनेक लोक इंदिरा गांधीनेचे पती मुसलमान होते असा अपप्रचार करीत असतात. काळे साहेब तुम्हाला अप्रत्यकाश रीतीने हे च सुचवायचे आहे का? लोकसत्ता या वृत्तपत्राने आशा प्रकारच्या लिखाणाला प्रसिद्धी द्यावी का? याचा गांभीर्याने विचार करावा!22 days ago · (2) · (0) · reply (0)
- k from Bellevueथोडा बालिश प्रयत्न वाटतो मोदींची भलावण करण्याचा. प्रतिक्रियांनी उत्तम प्रत्युत्तर दिले आहे. आणि खरच जर मोडी रेगनप्रमाणे असतील, तर त्यांना टाळलेलेच बरे, नाही का? जिते ९२% भारतीय अजूनही unorganized labor खाली मोडतात, तिथे रेगन किंवा मोदी मोडेल काय उपयोगी ठरणार आहे काळे साहेब?22 days ago · (1) · (0) · reply (0)Aniruddha Marathe Up Voted
- Aniruddha Marathe from Bentonvilleउद्या रेगन प्रमाणे मोदी बेकायदा स्थलांतर केलेल्या बांगलादेशी मुसलमानांना कायदेशीर मान्यता देणार का?22 days ago · (0) · (2) · reply (0)
- rajaram rane from Mumbaiलेखकाने बादरायण संबंध जोडला आहे! त्यांना अमेरिकन राजकारणाची विशेष माहिती नाहीसे दिसते.22 days ago · (2) · (1) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleअहो विकिपीडिया हे तुमच्या आमच्या सरख्यांनी केलेला कोश आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कोणतेही मान्यताप्राप्त प्रकाशन विकिपीडिया चा संदर्भा कधी ही देत नाही! नेचर किंवा सायन्स सारख्या मासिकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये विकिपीडिया चा संदर्भा असतो का?22 days ago · (2) · (0) · reply (0)
- Aniruddha Marathe from Bentonvilleकाळे साहेब धन्य आहे तुमच्या आंधळ्या मोदी प्रेमाची! शो रेगाण च्या कला एक ही दंगल झाली नाही हे तुम्ही विसरलात वाटते? रेगाण च्या काळात लेबनन मधून अमेरिकन सैन्याला माघार घ्यायला लागली होती ह्याची जाणीव तुम्हाला आहे का? रेगन ने अमेरिकेत बेकायदा स्थलांतर केलेल्या लोकांना कायदेशीर मान्यता दिली होती हे तुम्हाला माहीत आहे का? रेगन ने अनेकवेळा कर वाढवले होते हे तुम्हाला माहीत आहे का?22 days ago · (2) · (1) · reply (0)Vivek Up Voted
- Sudhir काळे, from Jakartaमाझ्या लेखाच्या खाली खालील खुलासेवजा माहिती मी दिली होती ती चुकून टाकायची राहिलेली दिसते ती येणेप्रमाणे: ----------- इतर संदर्भ: १. विकीपिडियातून कांहीं माहिती व आकडेवारी घेतली आहे. २. "Is India about to elect its Reagan?" by David B Cohen in Daily Caller या लेखावरूनी कांहीं माहिती घेतलेली आहे. (http://dailycaller.com/2014/04/14/is-india-about-to-elect-its-reagan/) धन्यवाद, काळे22 days ago · (0) · (0) · reply (0)
- केशवकुमारमोदी चहावाले होते व त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून त्यांचा तिटकारा केला जातो हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांचा तिटकारा केला जातो तो त्यांच्या ओव्हइगो व इतर कारणांमुळे. पटो वा न पटो पण रेगॉनॉमिक्स वा थॅचरीजम हि आर्थिक तत्वज्ञान होती. मोदींकडे असे कोणतेही आर्थिक तत्वज्ञान नाही. उद्योगपतींच्या गळ्यात गळे घालणे वा त्यांना सवलती देणे हे आर्थिक तत्वज्ञान नाही. भ्रष्टाचाराविरूध्द त्यांनी काही केल्याचा पुरावा नाही. "दिरा गांधींनी ज्या गृहस्थाशी लग्न केले त्याने आपले मूळ आडनाव बदलून गांधी ठेवून घेतल22 days ago · (14) · (7) · reply (0)sachin Down Voted
- NileshNever seen any article where a reference provides extension of an opinion (Check Ref No. 3). Desperate attempt to compare Mode and Regan. There is nothing call Modinomics , it looks writer has no idea what kind of intellectual base was behind Regonomics. This article shows more differences than similarities !22 days ago · (2) · (3) · reply (0)Aniruddha Marathe Up Voted
- केशवकुमार"अगदी तस्साच तिटकारा भारतातील आचार-विचाराने स्वत:ला उच्चभ्रू समजणारा वर्ग मोदींचा करतो[३]. एकेकाळी चहा विकणार्या व धड इंग्लिश बोलू न शकणार्या मोदींकडे ही मंडळी तुच्छतेने बघतात. " हे आपले मत पूर्णपणे चुकीचे आहे. मोदींचा तिटकारा त्यांच्या ओव्हरइगोमुळे व इतर कारणांमुळे केला जातो त्यांना इंग्रजी येत नाही वा ते चहावाला होते म्हणून नाही. रेगनॉमिक्स वा थॅचरीझम ही पटो वा न पटो पण आर्थिक तत्वज्ञाने होती. मोदींकडे अजून तरी असे कोणतेही आर्थिक तत्वज्ञान नाही. केवळ उद्योगपतींच्या गळ्यात गळे घालणे व त्यांना22 days ago · (5) · (2) · reply (0)
- Sudhir काळे, from Jakartaइतर संदर्भ: १. विकीपिडियातून कांहीं माहिती व आकडेवारी घेतली आहे. २. Is India about to elect its Reagan? by David B Cohen in Daily Caller (http://dailycaller.com/2014/04/14/is-india-about-to-elect-its-reagan/)22 days ago · (1) · (1) · reply (4)
- Yogeshत्यांना हे नाही दिसत कि महाराष्ट्र च्या शेतकर्यांना गुजरात मध्ये जाऊन कापूस विकावा लागतो, कारण तिथे जास्त भाव मिडतो, मराठे ला हे नाही आटवत कि २००२ पासून गुजरात मध्ये किती दंगल झाल्या. १ पण नाही , आणि महाराष्ट्रात रावेर, चोपडा , धुळे , मिरज , अरे नावा पुरता मराठे ,14 days ago · (0) · (0) · reply (0)
- Yogeshमोडी समोर राजकारण करतात ते तुमच्या पवार सारखे पतीमागून कॉंग्रेस च्या पाठीत खंजीर खुपसून पंत प्रधान पदाचे स्वप्न नाही बघत, ८ खाजादारांवर. आणि मराठा आहेत न तुम्ही मग हीच का मराठी , अरे तुमच्या सारख्या लोकांना बगून स्वतः माझ्या शिवरायांना सुद्धा लाज वाटत असेल कि हाच का तो मराठी समाज ज्या मध्ये मी जन्म घेवून स्वराज्य आणले होते ,14 days ago · (0) · (0) · reply (0)
- Yogeshअरे जे भ्रष्ट आहेत त्यांना पुन्हा परत निवडून देणार, अरे एक वेळेस पण दुसरा पर्याय नाही बघणार, काळे साहेब अनिरुद्ध मराठे ना बोलू द्या , कारण १७ ला तर निकाल येइलच हे कितीही ओरडले तरी, काय फरक पडणार आहे आणि यांना घटना माहित असती तर घटनेने (न्यायालयाने ) निर्दोष केलेल्या व्यक्तीला दोष दिलाच नसता.14 days ago · (0) · (0) · reply (0)
No comments:
Post a Comment